शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

सेनेच्या आंदोलनकर्त्यांना अटक-सुटका

By admin | Updated: August 3, 2016 00:19 IST

सरकारने शेतकरी व सामान्य जनतेची दिशाभूल केली. याशिवाय सोंड्याटोला उपा सिंचन प्रकल्पाला शासनाच्या दिरंगाईचा फटका

प्रकरण सिहोऱ्यात रास्ता रोको आंदोलनाचे : २६ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल चुल्हाड (सिहोरा) : सरकारने शेतकरी व सामान्य जनतेची दिशाभूल केली. याशिवाय सोंड्याटोला उपा सिंचन प्रकल्पाला शासनाच्या दिरंगाईचा फटका बसला असता शिवसेना कार्यकर्त्यांनी सिहोऱ्यात रास्ता रोको व जेलभरो आंदोलन केले. यात २६ कार्यकर्ते व शेतकरी विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले. आंदोलनकर्त्यांची रात्री उशिरा अटक व सुटका करण्यात आली. रेंगेपारच्या पुनर्वसनाच्या मागणी वरून राजकीय पुढाऱ्यांनी वैनगंगा नदी घाटात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला होता. तेच आता खासदार व आमदार झाली आहेत. याशिवाय केंद्र व राज्यात सत्ता असताना घरकुलाचां प्रश्न सोडविण्यात येत नाही. तुुमसरच्या निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी सिंदपुरी वासियांची घरकुल व तलाव दुरूस्तीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगितले होते. परिसरात विज पुरवठा करणारे तीन फिडर बंद आहेत. यामुळे नागरिकांना अल्प दाब विजेचा पुरवठा होत आहे. विजेच्या लपंडावाचे रोजचेच गाऱ्हाणे नागरिकांचे आहेत. जिल्ह्यात एकाच पक्षाचे तीन आमदार असताना बंद असणाऱ्या चांदपुर पर्यटन सुरू करण्यासाठी प्रयत्न केले नाही. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला १५ लाखांचा निधी देण्यात आल्याचा गवगवा होत आहे. निधी खेचून आणल्याचे बॅनर्स लावण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात हा निधी ३१ मार्च २०१७ पर्यंत पाणीपट्टी करांच्या वसुलीमधून विदर्भ पाटबंधारे विभागाला परंतु करायचे आहे. वीज जोडणी प्रकल्पांची झाली असता धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले नाही. जलाशय भरत नाही तोपर्यंत वीजपुरवठा खंडित होऊ देणार नाही, याकरिता शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्यासह शेखर कोतपल्लीवार, होमराज राऊत, कमलाकर निखाडे, विनोद रहांगडाले, हेमराज शिंदे, भोजराज तुरकर, मनोज चौबे, अमित मेश्राम, दिलीप बिसने, कुंजीलाल पटले, राकेश शरणागते यांच्यासह २६ जणाविरूद्ध सिहोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)