शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या टप्प्यात ७७ गावांची निवड

By admin | Updated: March 30, 2016 02:01 IST

जलसंकटात सापडलेल्या तलावांच्या जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून पहिल्या टप्प्यात ९४ गावांमध्ये ११०५ कामे हाती घेऊन त्यापैकी ९२२ पूर्ण करण्यात आली.

जलयुक्त शिवार : २५७९२ हेक्टर सुरक्षित सिंचन क्षमता निर्माणगोंदिया : जलसंकटात सापडलेल्या तलावांच्या जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून पहिल्या टप्प्यात ९४ गावांमध्ये ११०५ कामे हाती घेऊन त्यापैकी ९२२ पूर्ण करण्यात आली. आता १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षातील दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील ७७ गावांची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या वर्षाच्या टप्प्यात गोंदिया तालुक्यातील-१०, गोरेगांव-११, तिरोडा-९, अर्जुनी/मोरगाव-९, आमगांव-९, देवरी-११, सालेकसा-८, सडक/अर्जुनी-१० अशा एकूण ७७ गावांची निवड करण्यात आली आहे. जलसमस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासोबत सिंचनासाठी शाश्वत जलसाठे निर्माण करणे हा या जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश आहे. चालू आर्थिक वर्षातील ११२ कामे प्रगतीपथावर आहेत. पहिल्या टप्प्यातील या कामांवर २५ मार्च २०१६ पर्यंत ३२ कोटी ७२ लाख रु पये खर्च करण्यात आले आहेत. सन २०१६-१७ या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात ७७ गावांमध्ये जलस्त्रोत मजबूज करण्यासाठी कामे केली जाणार आहेत. प्रत्येक नागरिक त्या दृष्टीने जलसाक्षर होत असून जलसमृध्दीतून आर्थिक समृध्दीकडे जाण्यासाठी आता या अभियानाला लोकचळवळीचे स्वरु प प्राप्त झाले आहे. विविध तलाव, नाले, साठवण बंधारे, बोडीतील २ कोटी ६४ लाख रु पयांचा १ लक्ष ११ हजार ६०० घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. या कामातून २५ हजार ७९२ हेक्टर एवढी मोठी सुरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत सलग समतल चर, मातीनाला बांध, मजगी दुरूस्ती, गॅबियन पध्दतीचे बंधारे, शेततळी, सिमेंट नाला बांध बांधणे व दुरु स्ती करणे, साखळी सिमेंट बंधारा, नाला खोलीकरण व सरळीकरण, केटी वेअर, तलावातील गाळ काढणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वन तलाव, भात खाचरे दुरु स्ती, साठवण बंधारे, बोडी खोलीकरण/जुन्या बोडी दुरु स्ती, तलाव खोलीकरण/तलाव दुरूस्ती, माजी मालगुजारी तलाव दुरु स्ती, लघु पाटबंधारे तलाव दुरूस्ती अशी एकुण ११०५ कामे होती घेण्यात आली. त्यापैकी ९२२ कामे पूर्ण करण्यात आली. पूर्ण झालेल्या कामातून निर्माण झालेला जलसाठा १८ हजार ५४ सहस्त्र घनमीटर आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दुबार पिकांसाठी लाभदायकगाव शिवारातील पाणी गावातच साठविल्यामुळे जमीनीवरील आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शाश्वत जलसाठा निर्माण होण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून तयार झालेल्या जलसाठ्यामुळे कृषी उत्पादन क्षमता वाढली आहे. दुबार पिक घेण्यास या अभियानाचा महत्वाचा हातभार लागला आहे. उत्पादन क्षमतेत झालेली वाढ व दुबार पिक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे.