शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

दुसऱ्या टप्प्यात ७७ गावांची निवड

By admin | Updated: March 30, 2016 02:01 IST

जलसंकटात सापडलेल्या तलावांच्या जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून पहिल्या टप्प्यात ९४ गावांमध्ये ११०५ कामे हाती घेऊन त्यापैकी ९२२ पूर्ण करण्यात आली.

जलयुक्त शिवार : २५७९२ हेक्टर सुरक्षित सिंचन क्षमता निर्माणगोंदिया : जलसंकटात सापडलेल्या तलावांच्या जिल्ह्यात जलक्रांती करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातून पहिल्या टप्प्यात ९४ गावांमध्ये ११०५ कामे हाती घेऊन त्यापैकी ९२२ पूर्ण करण्यात आली. आता १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षातील दुसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्यातील ७७ गावांची निवड करण्यात आली आहे. दुसऱ्या वर्षाच्या टप्प्यात गोंदिया तालुक्यातील-१०, गोरेगांव-११, तिरोडा-९, अर्जुनी/मोरगाव-९, आमगांव-९, देवरी-११, सालेकसा-८, सडक/अर्जुनी-१० अशा एकूण ७७ गावांची निवड करण्यात आली आहे. जलसमस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासोबत सिंचनासाठी शाश्वत जलसाठे निर्माण करणे हा या जलयुक्त शिवार अभियानाचा उद्देश आहे. चालू आर्थिक वर्षातील ११२ कामे प्रगतीपथावर आहेत. पहिल्या टप्प्यातील या कामांवर २५ मार्च २०१६ पर्यंत ३२ कोटी ७२ लाख रु पये खर्च करण्यात आले आहेत. सन २०१६-१७ या वर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात ७७ गावांमध्ये जलस्त्रोत मजबूज करण्यासाठी कामे केली जाणार आहेत. प्रत्येक नागरिक त्या दृष्टीने जलसाक्षर होत असून जलसमृध्दीतून आर्थिक समृध्दीकडे जाण्यासाठी आता या अभियानाला लोकचळवळीचे स्वरु प प्राप्त झाले आहे. विविध तलाव, नाले, साठवण बंधारे, बोडीतील २ कोटी ६४ लाख रु पयांचा १ लक्ष ११ हजार ६०० घनमीटर गाळ लोकसहभागातून काढण्यात आला आहे. विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली. या कामातून २५ हजार ७९२ हेक्टर एवढी मोठी सुरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. या अभियानाअंतर्गत सलग समतल चर, मातीनाला बांध, मजगी दुरूस्ती, गॅबियन पध्दतीचे बंधारे, शेततळी, सिमेंट नाला बांध बांधणे व दुरु स्ती करणे, साखळी सिमेंट बंधारा, नाला खोलीकरण व सरळीकरण, केटी वेअर, तलावातील गाळ काढणे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, वन तलाव, भात खाचरे दुरु स्ती, साठवण बंधारे, बोडी खोलीकरण/जुन्या बोडी दुरु स्ती, तलाव खोलीकरण/तलाव दुरूस्ती, माजी मालगुजारी तलाव दुरु स्ती, लघु पाटबंधारे तलाव दुरूस्ती अशी एकुण ११०५ कामे होती घेण्यात आली. त्यापैकी ९२२ कामे पूर्ण करण्यात आली. पूर्ण झालेल्या कामातून निर्माण झालेला जलसाठा १८ हजार ५४ सहस्त्र घनमीटर आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दुबार पिकांसाठी लाभदायकगाव शिवारातील पाणी गावातच साठविल्यामुळे जमीनीवरील आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. शाश्वत जलसाठा निर्माण होण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून तयार झालेल्या जलसाठ्यामुळे कृषी उत्पादन क्षमता वाढली आहे. दुबार पिक घेण्यास या अभियानाचा महत्वाचा हातभार लागला आहे. उत्पादन क्षमतेत झालेली वाढ व दुबार पिक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होत आहे.