शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

उत्पादकता वाढविण्याकरिता बीज प्रक्रिया करणे गरजेचे

By admin | Updated: July 8, 2014 23:33 IST

पारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब न करता आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करणे काळाची गरज आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढवायचे असेल तर बीज प्रक्रिया करुन बियाण्यांची पेरणी करावी,

काचेवानी : पारंपरिक पीक पद्धतीचा अवलंब न करता आधुनिक पद्धतीचा वापर करून शेती करणे काळाची गरज आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढवायचे असेल तर बीज प्रक्रिया करुन बियाण्यांची पेरणी करावी, असा सल्ला कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.कृषी पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी बीज प्रकियेसंबंधी सांगितले की, सर्व शेतकऱ्यांनी बियाण्यांची पेरणी करण्यापूर्वी घरी बीज प्रक्रिया करुनच पेरणी करावी. बीज प्रक्रिया करण्याकरिता १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम (३ टक्के) मीठ घालून एकत्रित करावे. घरचे किंवा घेतलेले बियाणे या मिश्रणात घालून हलविल्याने पाण्याच्या वर तरंगणारे पोचट तनाचे आणि रोगट बियाणे काढून टाकावे. तळाशी असलेले बियाणे स्वच्छ पाण्याने धुवावे. यानंतर ते बियाणे घरी असलेल्या सावलीत वाळवावे. या बियाण्यांना १ टक्के पारायुक्त (थॉयरम किंवा कॅप्टन औषध) चोळून बियाण्यांची गादी वाफ्यावर पेरणी करावी.गादी वाफ्यावर बियाण्यांची पेरणी केल्यास पाणी देणे सोपे जाते. झाऱ्यांनी पाणी दिले जाते. यात पेरणीचा लागत खर्च कमी लागतो. १५ दिवसांची रोपे झाली की रोवणी करता येते. रोपे काढण्याकरिता पैशाची बचत होते आणि रोपांची नासाडी होत नाही.गाडी वाफे तयार करुन रोपे तयार करण्याची पद्धती आधुनिक नसल्याने शेतकरी याकडे लक्ष देत नाही. बियाण्यांची पेरणी आजही परंपरागत पद्धतीनेच केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी त्रास सहन करावा लागतो. कृषी विभागाच्या वतीने गावागावात शिबिरे व शेतकऱ्यांच्या सभा घेवून मार्गदर्शन केले जात आहे. काही शेतकरी याचे अनुकरण करीत असल्याचे पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी लोकमतला सांगितले. बीज प्रक्रिया आणि गादी वाफे तयार करताना क्षेत्रीय कृषी सहायक व पर्यवेक्षक यांना विचारुन सल्ला घेवून किंवा प्रत्यक्षात शेतात बोलावून मार्गदर्शन घ्यावे, असाही सल्ला शेतकऱ्यांना पारधी यांनी दिला आहे.श्री पद्धतीसंबंधी त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांकरिता श्री पद्धत वरदान ठरणारी पद्धत आहे. श्री पद्धतीने रोवणी केल्यास दोन रोपांचे अंतर २५-२५ सेमी असावे. संकरीत किंवा सुधारित शेती करताना शतकऱ्यांना दोन किलो धानात एक एकर शेती पूर्ण केली जाते. एका ठिकाणी एक रोप लावायचा असून लावलेल्या बांधीत पाणी ठेवू नये. त्याच बरोबर बांधी वाळू देवू नये, ही काळजी घेणे गरजेचे असल्याचे कृषी पर्यवेक्षक पारधी यांनी सांगितले.श्री पद्धतीमध्ये रोपाला जागा अधिक असल्याने वातावरणातील हवा रोपाच्या खोलवर पोहचते. त्यामुळे त्या रोपाची वाढ जोमाने होत असते. काही दिवसांनी फुटण्याची संख्या अधिक होते आणि उत्पादनात भरपूर वाढ होते, असा विश्वास पर्यवेक्षक डी.एस. पारधी यांनी व्यक्त केला. सर्व शेतकऱ्यांनी बियाण्यांची पेरणी करताना गादी वाफ्यांचा उपयोग करावे आणि रोवणी करताना अधिकाधिक शेतकऱ्यांनी श्री पद्धतीचा वापर करावे, असे आवाहन पारधी यांनी केले आहे. (वार्ताहर)