शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

५० टक्के अनुदानावरील बियाणे उपलब्ध

By admin | Updated: July 8, 2014 23:31 IST

अनेक दिवसांपासून शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र पाऊस पडण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांवर ओढवलेले हे संकट बघून जिल्हा परिषद प्रशासनाने दुबार पेरणीसाठी ५० टक्के अनुदानावर आठ क्विंटल

अधिकारी-पदाधिकाऱ्यांना निर्देश : एक एकर शेतजमिनीसाठी पाच किलो बियाणे देणारगोंदिया : अनेक दिवसांपासून शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. मात्र पाऊस पडण्याचे नाव घेत नाही. शेतकऱ्यांवर ओढवलेले हे संकट बघून जिल्हा परिषद प्रशासनाने दुबार पेरणीसाठी ५० टक्के अनुदानावर आठ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे. तसेच मागणीनुसार बियाण्यांचा पुरवठा केला जाईल, असे जि.प. कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी सांगितले आहे. सोमवार (दि.३० जून) रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जि.प. चे अध्यक्ष विजय शिवणकर व कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा सामना करण्यासाठी संबंधितांची तत्काळ बैठक बोलावली होती. यात जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्याचे प्रमुख पीक धान असून त्यानुसार पाऊस पडणे गरजेचे होते. मात्र दोन आडवड्यांपासून पाऊस गायब झाले. पेरलेले बियाणे सडले तर पाण्याअभावी काही बियाणे उगवलेच नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले. त्यामुळे सदर बैठकीत जर दोन दिवसात पाऊस पडले नाही तर जिल्हा परिषदेच्या निधीतून १० लाख रूपये खर्चून बियाणे खरेदी करण्यात येतील व शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर वितरीत केले जातील, असा निर्णय घेण्यात आला होता. जि.प. ने घेतलेल्या निर्णयानुसार, सध्या हलक्या वाणाचे आठ क्विंटल हायब्रिड बियाणे खरेदी करण्यात आले आहे. हे आठ क्विंटल बियाणे १५० एकर शेतीसाठी पर्याप्त असल्याचे कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी सांगितले आहे. एका एकरला पाच किलो बियाणे पुरतील. याशिवाय शेतकऱ्यांची जसजसी मागणी असेल तसतसे बियाण्यांची खरेदी करून त्यांचा पुरवठा केला जाईल. अतिरिक्त बियाणे खरेदी केले व शेतकऱ्यांनी त्या बियाण्यांची उचल केली नाही तर कंपनी खरेदी केलेले बियाणे परत घेत नाही. त्यामुळे सध्या आठच क्विंटल बियाणे जि.प. ने खरेदी केलेले आहे. मात्र शेतकऱ्यांची मागणी असल्यास आणखी बियाणे खरेदी करून ते ५० टक्के अनुदानावर वितरीत केले जातील, असा विश्वास कटरे यांनी व्यक्त केला. सोमवार (दि.७) रोजी जि.प. च्या कृषी विभागात अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेवून त्यांना शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहचविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ५० टक्के अनुदानावर उपलब्ध झालेल्या या हलक्या जातीच्या हायब्रिड बियाण्यांचीच शेतकऱ्यांनी पेरणी करण्यासाठी उचल करावी, असेही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)