शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

महिलेच्या हत्येचे रहस्य अद्यापही कायम

By admin | Updated: July 31, 2015 02:03 IST

येथील कापगते कॉम्प्लेक्समध्ये २० दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या एका महिलेची हत्या झाली. मात्र अद्यापही तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही.

गोंदिया : येथील कापगते कॉम्प्लेक्समध्ये २० दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या एका महिलेची हत्या झाली. मात्र अद्यापही तिच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नाही. या हत्येमुळे नगरीतील रहिवाशांमध्ये दहशत कायम आहे.प्राप्त माहितीनुसार सतत वर्दळ असलेल्या कापगते कॉम्प्लेक्समध्ये ९ जुलै रोजी नितू सुरेश पशिने यांची भर दिवसा त्यांचे घरी हत्या झाली. हत्या झाल्याक्षणापासून पोलीस यंत्रणा मारेकऱ्यांच्या शोधकामात गुंतली. सीआयडी, स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक पोलीस कामाला लागले परंतु अजुनपर्यंत ते मारेकऱ्यांचा शो तपास करू शकले नाही.हत्या झाल्याक्षणी चोरी अथवा दरोड्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र तपासात चोरी किंवा दरोडा असल्याचे निष्पन्न झाले नाही. त्यानंतर पोलिसांच्या तपासाची दिशा बदलली. विविध पैलूंवर पोलीस तपास केला. मृतकाचे घरात एक कुत्रा आहे. तो सदैव अनोळखी व्यक्तींवर भुंकायचा. मात्र हा कुत्रा हल्ली भुंकत नसल्याचे दिसून आले. मारेकऱ्यांनी घटनास्थळी कुठलाही पुरावा सोडला नाही. मारेकऱ्यांनी हत्याराचा वापर केला ती हत्यारे शोधण्यासाठी पोलिसांनी मृतकाचे घरच्या विहिरीतील पाणी आटविले. मात्र याठिकाणी सुद्धा हत्यार सापडले नाहीत. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या श्वान पथकाने लाखांदूर-साकोली मार्गावरील टी-प्वार्इंट पर्यंतचा भाग दाखविला. तो पुढे जाऊ शकला नाही.पोलिसांनी तपासासाठी वेगवेगळ्या चमू तयार केल्या आहेत. तपासकार्य अद्यापही सुरूच आहे. पोलिसांनी जनतेला या प्रकरणात सहकार्य करण्याचे आवाहन केले. नितू पशिने यांच्या हत्येसंबंधी काही उपयुक्त माहिती असल्यास लेखी स्वरुपात पाकीटमध्ये गुप्त पद्धतीने माहिती देण्याचे आवाहन केले आहे.पोलिसांकडून नागरिकांना जाहीर आवाहननितू पशिने यांच्या हत्येसंबंधी नागरिकांना काही उपयुक्त माहिती असल्यास ती लेखी स्वरुपात पाकीटात गुप्तपणे द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयित व्यक्ती, घटनेच्या वेळेदरम्यान सकाळी १० ते दुपारी २ वाजतादरम्यान पशिने यांच्या घराच्या आत जाताना अथवा घरातून बाहेर पडताना एखाद्या व्यक्ती पाहिले असल्यास, त्यांच्या घराच्या आसपास कोणाला फिरताना पाहिले असल्यास, घटना प्रत्यक्ष पाहिली असल्यास, इतर काहीही गुन्ह्याबाबत महत्वाची माहिती असल्यास गुप्तपणे कळवावे. पाकिटावर त्यावर आपले नाव/ओळख लिहिण्याची आवश्यकता नाही, असे अर्जुनी मोरगाव पोलिसांकडून करण्यात आले आहे. यातून काही सुगावा मिळविण्याचा प्रयत्न आहे.