शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
2
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
3
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
4
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
5
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
6
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
7
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
8
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
9
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
10
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
11
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
12
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
13
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
14
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
15
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
16
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
17
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
18
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
19
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
20
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!

सेकंड अनलाॅक आता २०० लोकांच्या उपस्थितीत हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:34 IST

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरली. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात ठरवून असलेले विवाह सोहळे ...

गोंदिया : कोरोनाची दुसरी लाट ओसरली. आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. अशात ठरवून असलेले विवाह सोहळे आता त्यापूर्वी आटोपून घेण्यासाठी वर-वधू पित्यांची धावपळ सुरू झाली आहे. शासनाने विवाह सोहळ्यांसाठी परवानगी बंधनकारक केली आहे. त्यामुळे लग्नाची कामे सोडून वर-वधू पित्यांना परवानगीसाठी शासकीय कार्यालयात ये-जा करावी लागत आहे. लग्न समारंभासाठी २०० वऱ्हाडींच्या अटींचे पालन करणे गरजेचे आहे. विवाह सोहळा आटोपण्यासाठी सर्वप्रथम उपविभागीय अधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतरच विवाह करता येणार आहे. तसेच दोन्ही पक्षाकडील २०० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. याशिवाय ज्या सभागृहात-लॉनमध्ये विवाह सोहळा घेण्यासाठी मुभा देण्यात आली आहे, तेथे अर्जासोबत वधू-वराचे आधार कार्ड, त्यांचे फोटो, लग्नाची पत्रिका, ज्या सभागृहात विवाह होणार आहे त्याचे परवानगी पत्र द्यावे लागते. तसेच याच अर्जाची एक प्रत पोलीस ठाण्यात द्यावी लागते.

................

लग्न समारंभासाठी या आहेत अटी

मंगल कार्यालय : खुल्या प्रांगणातील लॉन किंवा बंदिस्त कार्यालयातील विवाह सोहळे प्रांगण, लॉन, मंगल कार्यालय, हॉटेलमधील आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल अशी अट घालून दिली आहे.

....

लॉन : खुल्या प्रांगणात होणाऱ्या विवाह सोहळ्यात प्रांगण किंवा लॉनमध्ये ५० टक्के, परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती लग्न समारंभात उपस्थित राहू शकतील. बंदिस्त कार्यालय, हॉटेलात उपस्थिती संख्या ५० टक्के असणार आहे.

विशेष म्हणजे, सभागृहाचे सॅनिटायझेशन व मास्कचा वापर अनिवार्य आहे.

................................

मंगल कार्यालय चालकांत उत्साह

मंगल कार्यालयात २०० लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्यास प्रशासनाने परवानगी दिल्याने आता आमचा बंद असलेला रोजगार सुरू होणार अशी आशा आहे. लोकांचे लग्न समारंभ आटोपले असले तरी आता एक- दोन लग्न समारंभ आपल्या मंगल कार्यालयातून होणार आहेत.

- पुष्पकांत बहेकार, मंगल कार्यालय चालक

...............

ऐन लग्नाच्या मोसममध्ये कोरोनाचा कहर होता. त्यामुळे मंगल कार्यालय बंदचे आदेश दिले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने जिल्हा प्रशासनाने मंगल कार्यालय सुरू करण्याचे आदेश दिलेत. परंतु, पावसाळ्यात लग्न समारंभ अत्यंत कमी आहेत.

- कैलाश शेंडे, मंगल कार्यालय चालक

............

रोजी सुरू झाल्याने बॅंडवालेही जोरात

लग्न समारंभ सुरू झाल्याने आता आमची रोजीरोटी सुरू झाली. परंतु, पावसाळा असल्याने लग्न समारंभ अत्यंत कमी आहेत. लग्नाच्या तारखा नसल्याने प्रशासनाने मुभा देऊनही आम्ही रिकामेच आहोत.

- आशिष तलमले, बॅंड चालक

........

जेव्हा लग्न समारंभ होते, तेव्हा आम्हाला परवानगी नव्हती. आता लग्नाच्या तारखाच नसताना जिल्हा प्रशासनाने लग्नाची मुभा दिली आहे, अशा वेळेस आम्हाला रोजगाराचा शोध असतानाही लग्नच नाहीत तर काम कसे करणार.

- अंकेश गणवीर, बॅंड चालक

.....................

लग्नाच्या तारखा

यंदा लग्नाच्या तारखा नसल्याने तुळशी विवाहापर्यंत लग्न समारंभासाठी वाट पाहावी लागणार आहे.

.........

कोट

आज समाज कितीही मॉडर्न झाला असला तरीही प्रत्येकच धर्म व जातीत विवाह सोहळ्यात पारंपरिक काही नियमांचे पालन केले जातेच. यात विवाह सोहळ्यांसाठी शुभमुहूर्त बघितलाच जातो. हिंदू धर्मात पंडितांकडून शुभ दिवस व वेळ बघूनच विवाह ठरविले जातात. जोडप्याच्या भावी सुखी संसारासाठी आजही प्रत्येकच घरात विवाहाचा शुभ मुहूर्त बघितला जातोच.

-पंडित गोविंद शर्मा