शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

सिमेंट बंधाऱ्यांसाठी जागा अयोग्य

By admin | Updated: June 13, 2015 00:56 IST

जलशिवार योजनेंतर्गत लघूसिंचन पाटबंधारे (स्थानिक स्तर) उपविभाग गोंदिया व कृषी विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीवर ..

शेतकऱ्यांची ओरड व तक्रारी : कंत्राटदार व अधिकाऱ्यांची लाभासाठी धावपळकाचेवानी : जलशिवार योजनेंतर्गत लघूसिंचन पाटबंधारे (स्थानिक स्तर) उपविभाग गोंदिया व कृषी विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीवर नाल्यावर सिमेंट बंधारे तयार करण्यात येत आहेत. मात्र बहुतेक ठिकाणी अयोग्य जागेची निवड करण्यात आल्याने ते निरर्थक ठरणार आहेत. अंदाजपत्रकानुसार कामे होणार नसून लाखो रूपयांच्या निधीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंत्राटदार व निर्देशित अधिकाऱ्यांची स्थिती ‘सोने पे सुहागा’ होणार असल्याचे दिसत आहे.काचेवानी, बरबसपुरा गावांसह विविध ठिकाणी नाल्यांवर सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम केले जात आहे. बरबसपुरा सीमेत सिमेंट नाला बनत आहे. त्या बांधकामात अंदाजपत्रकानुसार गिट्टीचा वापर न करता निकृष्ट दर्जाच्या गिट्टीचा वापर करण्यात येत होते. त्यामुळे लघू सिंचन पाटबंधारे (स्थानिक स्तर) गोंदियाचे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी हे काम तोडून दुसऱ्यांदा तयार करण्याचे आदेश दिले होते. काही लोकांनी तक्रारी केल्याने अधिकाऱ्यांनी काम थांबविण्याचे प्रयत्न केले. मात्र कंत्राटदार व सहायक अभियंता यांनी साटेलोटे करून माल कमाओ अभियान सुरू केल्याने अशा तक्रारी दडपल्या जात आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नसते तर कंत्राटदार व नियंत्रक अभियंता यांनी निकृष्ट दर्जाचे काम करून निधी दडपला असता. नाल्यावर बंधारे तयार करताना दोन बंधाऱ्यातील अंतर ५०० ते ८०० मीटर दरम्यान असणे गरजेचे होते. परंतु कंत्राटदार व संबंधित नियंत्रक विभागप्रमुख याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अंदाजपत्रकात दर्शविलेल्या ठिकाणी बांधकाम करणे आवश्यक होते. मात्र अनेक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येत आहेत.जल शिवारांतर्गत शासनाने पाठविलेला निधी कसातरी खर्च व्हावा, अशी धारणा कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांची आहे. मात्र याचा लाभ शेतकऱ्यांना किती प्रमाणात होणार की नाही, हे पाहण्याची गरज त्यांना वाटत नाही, असे शेतकऱ्यांनी लोकमतला सांगितले. बंधाऱ्याची पाळ तयार करताना जास्तीत जास्त लागणाऱ्या साहित्याची बचत कशी होईल व यातून अधिकाधिक लाभांश कसा मिळविता येईल, अशी योजना कंत्राटदार व अधिकारी तयार करीत आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार करण्यात येणारे बंधारे खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे काय? याची चौकशी करून बांधकाम करण्यात यावे. तसेच याकडे संबंधित गावचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)बरबसपुरा व काचेवानी येथील शेतकऱ्यांच्या तक्रारीबंधाऱ्यांचे अंदाजपत्रक तयार करताना आणि जागांची निवड करताना त्या परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे बरबसपुरा नाल्यावर सिमेंट बंधारे तयार करताना शेतकऱ्यांची ओरड सुरू झाली. तसेच लघू सिंचन विभाग व कृषी विभागाला तक्रारी सादर करण्यात आल्या. बरबसपुरा येथील लिचडे कुटुंबीयांनी तक्रार करून आक्षेप नोंदविला आहे. काचेवानी शिवारातील नाल्यांवर सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून मोतीलाल पटले व इतर शेतकऱ्यांनी तक्रारी सादर केल्या आहेत. तसेच बंधाऱ्याची जागा योग्य नसल्याने नुकसान आपल्या शेतातील पिकांना होईल, असे त्यांनी सांगितले. असे प्रकार सर्वच ठिकाणी दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.