शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

सिमेंट बंधाऱ्यांसाठी जागा अयोग्य

By admin | Updated: June 13, 2015 00:56 IST

जलशिवार योजनेंतर्गत लघूसिंचन पाटबंधारे (स्थानिक स्तर) उपविभाग गोंदिया व कृषी विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीवर ..

शेतकऱ्यांची ओरड व तक्रारी : कंत्राटदार व अधिकाऱ्यांची लाभासाठी धावपळकाचेवानी : जलशिवार योजनेंतर्गत लघूसिंचन पाटबंधारे (स्थानिक स्तर) उपविभाग गोंदिया व कृषी विभागांतर्गत कंत्राटी पद्धतीवर नाल्यावर सिमेंट बंधारे तयार करण्यात येत आहेत. मात्र बहुतेक ठिकाणी अयोग्य जागेची निवड करण्यात आल्याने ते निरर्थक ठरणार आहेत. अंदाजपत्रकानुसार कामे होणार नसून लाखो रूपयांच्या निधीचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंत्राटदार व निर्देशित अधिकाऱ्यांची स्थिती ‘सोने पे सुहागा’ होणार असल्याचे दिसत आहे.काचेवानी, बरबसपुरा गावांसह विविध ठिकाणी नाल्यांवर सिमेंट बंधाऱ्यांचे बांधकाम केले जात आहे. बरबसपुरा सीमेत सिमेंट नाला बनत आहे. त्या बांधकामात अंदाजपत्रकानुसार गिट्टीचा वापर न करता निकृष्ट दर्जाच्या गिट्टीचा वापर करण्यात येत होते. त्यामुळे लघू सिंचन पाटबंधारे (स्थानिक स्तर) गोंदियाचे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी हे काम तोडून दुसऱ्यांदा तयार करण्याचे आदेश दिले होते. काही लोकांनी तक्रारी केल्याने अधिकाऱ्यांनी काम थांबविण्याचे प्रयत्न केले. मात्र कंत्राटदार व सहायक अभियंता यांनी साटेलोटे करून माल कमाओ अभियान सुरू केल्याने अशा तक्रारी दडपल्या जात आहेत. उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले नसते तर कंत्राटदार व नियंत्रक अभियंता यांनी निकृष्ट दर्जाचे काम करून निधी दडपला असता. नाल्यावर बंधारे तयार करताना दोन बंधाऱ्यातील अंतर ५०० ते ८०० मीटर दरम्यान असणे गरजेचे होते. परंतु कंत्राटदार व संबंधित नियंत्रक विभागप्रमुख याकडे दुर्लक्ष करीत आहेत. अंदाजपत्रकात दर्शविलेल्या ठिकाणी बांधकाम करणे आवश्यक होते. मात्र अनेक ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी बंधाऱ्यांचे बांधकाम करण्यात येत आहेत.जल शिवारांतर्गत शासनाने पाठविलेला निधी कसातरी खर्च व्हावा, अशी धारणा कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांची आहे. मात्र याचा लाभ शेतकऱ्यांना किती प्रमाणात होणार की नाही, हे पाहण्याची गरज त्यांना वाटत नाही, असे शेतकऱ्यांनी लोकमतला सांगितले. बंधाऱ्याची पाळ तयार करताना जास्तीत जास्त लागणाऱ्या साहित्याची बचत कशी होईल व यातून अधिकाधिक लाभांश कसा मिळविता येईल, अशी योजना कंत्राटदार व अधिकारी तयार करीत आहेत, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी तयार करण्यात येणारे बंधारे खरोखरच शेतकऱ्यांच्या हिताचे आहे काय? याची चौकशी करून बांधकाम करण्यात यावे. तसेच याकडे संबंधित गावचे सरपंच व पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)बरबसपुरा व काचेवानी येथील शेतकऱ्यांच्या तक्रारीबंधाऱ्यांचे अंदाजपत्रक तयार करताना आणि जागांची निवड करताना त्या परिसरातील शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे बरबसपुरा नाल्यावर सिमेंट बंधारे तयार करताना शेतकऱ्यांची ओरड सुरू झाली. तसेच लघू सिंचन विभाग व कृषी विभागाला तक्रारी सादर करण्यात आल्या. बरबसपुरा येथील लिचडे कुटुंबीयांनी तक्रार करून आक्षेप नोंदविला आहे. काचेवानी शिवारातील नाल्यांवर सिमेंट बंधाऱ्याचे काम सुरू झाले असून मोतीलाल पटले व इतर शेतकऱ्यांनी तक्रारी सादर केल्या आहेत. तसेच बंधाऱ्याची जागा योग्य नसल्याने नुकसान आपल्या शेतातील पिकांना होईल, असे त्यांनी सांगितले. असे प्रकार सर्वच ठिकाणी दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.