शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 22:37 IST

मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच शनिवारीपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात अधिक वाढ झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुढील आठ दिवस तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देनवतपाला सुरुवात। वाढत्या तापमानाने शहरवासीय हैराण, पुन्हा आठ दिवस उन्हाच्या झळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच शनिवारीपासून (दि.२५) नवतपाला सुरूवात झाल्याने तापमानात अधिक वाढ झाली आहे. शनिवारी जिल्ह्यात या हंगामातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पुढील आठ दिवस तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वाढत्या तापमानामुळे जिल्ह्यावासीय चांगलेच त्रस्त झाले असून याचा दैनदिन कामांवर सुध्दा परिणाम होत आहे.जिल्ह्यातील सर्वाधिक ४४.४ तापमानाची नोंद यंदा २१ मे रोजी झाली. त्यानंतर तापमानाचा हा रेकार्ड मोडत शनिवारी (दि.२५) ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मे महिन्यातील हे सर्वाधिक तापमान होय. मागील सात आठ वर्षातील तापमानाच्या आकडेवारी नजर टाकल्यास यंदा मे महिन्यात सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने जिल्हावासीय चांगलेच हैराण आहे.तर कधी ढगाळ वातावरण सुध्दा निर्माण होत असल्याने उकाडा वाढत आहे. त्यामुळे कुलर,पंखे सुध्दा काम करीत नसल्याने अंगाची लाहीलाही होत आहे.वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेस शहरातील रस्ते सामसुम होत आहे. आवश्यक काम असेल तरच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. शनिवारपासून नवतपाला सुरूवात झाली. या कालावधी सरासरी तापमानात ३ ते ४ अंश सेल्सिअस वाढ होत असते. त्यामुळे हे नऊ दिवस म्हणजे अतिशय उष्ण असतात. नवतपा सुरू झाल्यानंतर शेतकरी सुध्दा शेतीच्या मशागतीच्या कामे पहाटेपासून सुरू करुन सकाळी दहा वाजेपर्यंत आटोपत असतात. मात्र यंदा सरासरी तापमान हे ४३ अंश सेल्सिअसच्यावर असल्याने नवतपात जिल्ह्याचे तापमान ४५ अंशावर जाण्याचा अंदाज वर्तविला जात होता. तो अंदाज सुध्दा खरा ठरत आहे. नवतपामुळे जिल्ह्यावासीयांना ४ जूनपर्यंत उन्हाच्या झळा सहन कराव्या लागणाऱ्या आहे.त्यामुळे कधी एकदाचा उन्हाळा संपतो आणि पावसाळ्याला सुरूवात होवून उकाड्यापासून दिलासा मिळतो, याकडेच नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Temperatureतापमान