शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

हंगाम लोटला पण शेतकºयांना ताडपत्र्या मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:31 IST

कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्री वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या १० आॅगस्ट २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्दे२५ लाखांचा निधी पडून : सदस्याने वेधले सभागृहाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्री वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या १० आॅगस्ट २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासाठी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र खरीप हंगाम संपत येत असताना शेतकºयांना ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.जिल्हा परिषदेने ताडपत्री खरेदी करीता सन २०१६-१७ ची अखर्चित तरतूद १५ लाख रुपये व सन २०१७-१८ मधील तरतूद १० लाख रुपये असे एकूण २५ लाख व शेतकºयांच्या हिस्सातील २५ लाख रुपये अशा एकूण ५० लाख रुपयांच्या ताडपत्री खरेदीला मंजूरी दिली. या मंजुरीला ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही या योजनेचे लाभार्थी कोण हे अद्याप पुढे आले नाही. असा मुद्दा जि.प. सदस्य परशुरामकर यांनी उपस्थित केला आहे.जि.प. सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यात हा मुद्दा परशुरामकर यांनी लावून धरला. तेव्हा जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाºयांना कुठलेच उत्तर देता आले नाही. जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात गंभीर दुष्काळ असल्याने मध्यम दुष्काळ हा शब्द वगळून पूर्ण जिल्ह्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा.जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांनी पाठविलेला अहवाल शासनाने मान्य करावा अशी मागणी जि.प. सदस्य परशुरामकर, रमेश अंबुले, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे यांनी चर्चेत भाग घेऊन केली. सभापती पी.जी.कटरे यांनी सुद्धा सदस्याच्या मागणीचे समर्थन करुन त्या आशयाचे ठराव पारीत करण्यात आला. ताडपत्रीच्या व शेतकºयांच्या मुद्यावर जि.प. कृषी अधिकारी वंदना शिंदे व कृषी अधीक्षक इंगळे हे सदस्यांचे समाधान करु शकले नाहीत. हंगाम संपत आला तरी शेतकºयांना ताडपत्र्यांचे वाटप झाले नाही. अर्जुनी मोरगावचे सभापती अरविंद शिवणकर यांनीही कृषी विभागाला खडेबोल सुनावले.१४१२ शेतकºयांचे अर्जगोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १ हजार ६६६ शेतकºयांना हंगामासाठी आयएसआय ट्रेडमार्कच्या ताडपंत्र्याचे शेतकºयांना वाटप करण्यात येणार आहे. आधी शेतकºयांना ताडपत्री खरेदी करायची असून खरेदीचे देयक जि.प.कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर त्यांना दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ताडपत्री द्याची आहे. परंतु आतापर्यंत १४१२ शेतकºयांचे अर्ज आले आहेत. २५४ लाभार्थ्यांना आणखी ताडपत्रीसाठी लाभार्थी म्हणून घेता येईल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.