शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हंगाम लोटला पण शेतकºयांना ताडपत्र्या मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:31 IST

कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्री वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या १० आॅगस्ट २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्दे२५ लाखांचा निधी पडून : सदस्याने वेधले सभागृहाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्री वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या १० आॅगस्ट २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासाठी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र खरीप हंगाम संपत येत असताना शेतकºयांना ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.जिल्हा परिषदेने ताडपत्री खरेदी करीता सन २०१६-१७ ची अखर्चित तरतूद १५ लाख रुपये व सन २०१७-१८ मधील तरतूद १० लाख रुपये असे एकूण २५ लाख व शेतकºयांच्या हिस्सातील २५ लाख रुपये अशा एकूण ५० लाख रुपयांच्या ताडपत्री खरेदीला मंजूरी दिली. या मंजुरीला ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही या योजनेचे लाभार्थी कोण हे अद्याप पुढे आले नाही. असा मुद्दा जि.प. सदस्य परशुरामकर यांनी उपस्थित केला आहे.जि.प. सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यात हा मुद्दा परशुरामकर यांनी लावून धरला. तेव्हा जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाºयांना कुठलेच उत्तर देता आले नाही. जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात गंभीर दुष्काळ असल्याने मध्यम दुष्काळ हा शब्द वगळून पूर्ण जिल्ह्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा.जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांनी पाठविलेला अहवाल शासनाने मान्य करावा अशी मागणी जि.प. सदस्य परशुरामकर, रमेश अंबुले, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे यांनी चर्चेत भाग घेऊन केली. सभापती पी.जी.कटरे यांनी सुद्धा सदस्याच्या मागणीचे समर्थन करुन त्या आशयाचे ठराव पारीत करण्यात आला. ताडपत्रीच्या व शेतकºयांच्या मुद्यावर जि.प. कृषी अधिकारी वंदना शिंदे व कृषी अधीक्षक इंगळे हे सदस्यांचे समाधान करु शकले नाहीत. हंगाम संपत आला तरी शेतकºयांना ताडपत्र्यांचे वाटप झाले नाही. अर्जुनी मोरगावचे सभापती अरविंद शिवणकर यांनीही कृषी विभागाला खडेबोल सुनावले.१४१२ शेतकºयांचे अर्जगोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १ हजार ६६६ शेतकºयांना हंगामासाठी आयएसआय ट्रेडमार्कच्या ताडपंत्र्याचे शेतकºयांना वाटप करण्यात येणार आहे. आधी शेतकºयांना ताडपत्री खरेदी करायची असून खरेदीचे देयक जि.प.कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर त्यांना दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ताडपत्री द्याची आहे. परंतु आतापर्यंत १४१२ शेतकºयांचे अर्ज आले आहेत. २५४ लाभार्थ्यांना आणखी ताडपत्रीसाठी लाभार्थी म्हणून घेता येईल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.