शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

हंगाम लोटला पण शेतकºयांना ताडपत्र्या मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 23:31 IST

कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्री वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या १० आॅगस्ट २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

ठळक मुद्दे२५ लाखांचा निधी पडून : सदस्याने वेधले सभागृहाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कृषी विभागांतर्गत जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ५० टक्के अनुदानावर ताडपत्री वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या १० आॅगस्ट २०१७ रोजीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. यासाठी ५० लाख रुपयांचा निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र खरीप हंगाम संपत येत असताना शेतकºयांना ताडपत्र्यांचे वाटप करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.जिल्हा परिषदेने ताडपत्री खरेदी करीता सन २०१६-१७ ची अखर्चित तरतूद १५ लाख रुपये व सन २०१७-१८ मधील तरतूद १० लाख रुपये असे एकूण २५ लाख व शेतकºयांच्या हिस्सातील २५ लाख रुपये अशा एकूण ५० लाख रुपयांच्या ताडपत्री खरेदीला मंजूरी दिली. या मंजुरीला ३ महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही या योजनेचे लाभार्थी कोण हे अद्याप पुढे आले नाही. असा मुद्दा जि.प. सदस्य परशुरामकर यांनी उपस्थित केला आहे.जि.प. सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. यात हा मुद्दा परशुरामकर यांनी लावून धरला. तेव्हा जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाºयांना कुठलेच उत्तर देता आले नाही. जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रात गंभीर दुष्काळ असल्याने मध्यम दुष्काळ हा शब्द वगळून पूर्ण जिल्ह्यात गंभीर दुष्काळ जाहीर करावा.जिल्हाधिकारी व कृषी अधीक्षक यांनी पाठविलेला अहवाल शासनाने मान्य करावा अशी मागणी जि.प. सदस्य परशुरामकर, रमेश अंबुले, सुरेश हर्षे, राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे यांनी चर्चेत भाग घेऊन केली. सभापती पी.जी.कटरे यांनी सुद्धा सदस्याच्या मागणीचे समर्थन करुन त्या आशयाचे ठराव पारीत करण्यात आला. ताडपत्रीच्या व शेतकºयांच्या मुद्यावर जि.प. कृषी अधिकारी वंदना शिंदे व कृषी अधीक्षक इंगळे हे सदस्यांचे समाधान करु शकले नाहीत. हंगाम संपत आला तरी शेतकºयांना ताडपत्र्यांचे वाटप झाले नाही. अर्जुनी मोरगावचे सभापती अरविंद शिवणकर यांनीही कृषी विभागाला खडेबोल सुनावले.१४१२ शेतकºयांचे अर्जगोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यातील १ हजार ६६६ शेतकºयांना हंगामासाठी आयएसआय ट्रेडमार्कच्या ताडपंत्र्याचे शेतकºयांना वाटप करण्यात येणार आहे. आधी शेतकºयांना ताडपत्री खरेदी करायची असून खरेदीचे देयक जि.प.कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर त्यांना दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. जिल्ह्यातील १६६६ शेतकºयांना ताडपत्री द्याची आहे. परंतु आतापर्यंत १४१२ शेतकºयांचे अर्ज आले आहेत. २५४ लाभार्थ्यांना आणखी ताडपत्रीसाठी लाभार्थी म्हणून घेता येईल असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.