शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
6
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
7
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
8
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
9
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
10
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
11
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
12
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
13
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
14
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
15
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
16
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
17
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
18
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
19
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
20
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट

परवानगी नसताना सुरू ठेवली विज्ञान शाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:37 IST

येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी यंदा श्री स्वामी विद्यालय व अंजनाबाई पारधी कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव या शाळेमधून परीक्षेस बसणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना टी.सी. सुध्दा डोंगरगाव शाळेमधूनच मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रभारी प्राचार्य कारणीभूत : एका शाळेचे विद्यार्थी दुसºया शाळेच्या नावे परीक्षेला बसणार

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी यंदा श्री स्वामी विद्यालय व अंजनाबाई पारधी कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव या शाळेमधून परीक्षेस बसणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना टी.सी. सुध्दा डोंगरगाव शाळेमधूनच मिळणार आहे. ही आश्चर्यचकीत करणारी बाब असून यासाठी प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी कारणीभूत असल्याचे बोलले जाते.सुकडी-डाकराम येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी व बारावीच्या कला शाखेला शासनाची मान्यता आहे. पण विज्ञान शाखा सुरु केली तेव्हा विज्ञान शाखेला शासनाची कोणत्याच प्रकारची मान्यता नव्हती. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.सदर विज्ञान शाखेची तुकडी स्थानिक जि.प. शाळेमध्ये सुरु करण्यात आली. तशा प्रकारचा प्रस्ताव तत्कालीन प्राचार्य ए.झेड. नंदेश्वर यांनी जि.प. गोंदियाच्या शिक्षण विभागाला पाठविला होता. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी यांनी पदभार सांभाळला. पण त्यांनी जि.प. गोंदियाकडे कोणतीच विचारपूस किंवा पाठपुरावा न केल्यामुळे तो प्रस्ताव जि.प. शिक्षण विभागात पडून राहिला.दरम्यान अकरावीनंतर बारावी विज्ञान शाखेचे वर्ग सुरु झाले. दोन वर्ष लोटून सुध्दा विज्ञान शाखेची परवानगी मिळाली नव्हती. ही बाब प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी यांना माहीत होती. पण काहीतरी करून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नागपूर बोर्डात जावून विचारपूस केली.त्यावेळी बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान न करता तुम्ही जवळच्या शाळेच्या नावाने विद्यार्थी परीक्षेला बसवा, असा सल्ला देण्यात आला. तेव्हा शिक्षण उपसंचालक नागपूर व शिक्षण संचालक पुणे यांना पत्र व्यवहार करुन बारावी विज्ञान शाखेच्या मुलांना तात्पुरती परीक्षा देण्यासाठी मंजुरी देण्यात आली.विद्यार्थ्यांच्या नुकसानीसाठी प्रभारी प्राचार्य जवाबदार असल्याचा आरोप आहे. शाळेमध्ये गटबाजी करणे, मी करेन तो कायदा अशा भूमिकेतून वावरणारे प्रभारी प्राचार्य पारधी यांच्या धोरणामुळे सुकडी-डाकराम येथील विद्यार्थ्यांना डोंगरगाव शाळेच्या नावाने परीक्षा देण्याची वेळ आल्याचा आरोप आहे.बारावीच्या परीक्षा केंद्रासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास मेश्राम, पत्रकार जांभूळकर व प्राचार्य ए.झेड. नंदेश्वर, प्रा.एस.ए. कापगते यांनी मेहनत घेतली. मात्र आता या शाळेला विज्ञान शाखेची परवानगी नसल्यामुळे विज्ञान शाखेचे विद्यार्थ्यांना डोंगरगाव शाळेच्या नावाने परीक्षा बसण्याची वेळ आली आहे.