शहरं
Join us  
Trending Stories
1
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
2
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
3
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
4
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
5
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
6
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
7
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
8
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
9
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
10
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
11
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
12
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
14
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
15
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
16
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
17
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
18
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
19
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
20
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!

परवानगी नसताना सुरू ठेवली विज्ञान शाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:37 IST

येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी यंदा श्री स्वामी विद्यालय व अंजनाबाई पारधी कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव या शाळेमधून परीक्षेस बसणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना टी.सी. सुध्दा डोंगरगाव शाळेमधूनच मिळणार आहे.

ठळक मुद्देप्रभारी प्राचार्य कारणीभूत : एका शाळेचे विद्यार्थी दुसºया शाळेच्या नावे परीक्षेला बसणार

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी-डाकराम : येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी यंदा श्री स्वामी विद्यालय व अंजनाबाई पारधी कनिष्ठ महाविद्यालय डोंगरगाव या शाळेमधून परीक्षेस बसणार आहेत. त्या विद्यार्थ्यांना टी.सी. सुध्दा डोंगरगाव शाळेमधूनच मिळणार आहे. ही आश्चर्यचकीत करणारी बाब असून यासाठी प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी कारणीभूत असल्याचे बोलले जाते.सुकडी-डाकराम येथील जि.प. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ११ वी व बारावीच्या कला शाखेला शासनाची मान्यता आहे. पण विज्ञान शाखा सुरु केली तेव्हा विज्ञान शाखेला शासनाची कोणत्याच प्रकारची मान्यता नव्हती. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली.सदर विज्ञान शाखेची तुकडी स्थानिक जि.प. शाळेमध्ये सुरु करण्यात आली. तशा प्रकारचा प्रस्ताव तत्कालीन प्राचार्य ए.झेड. नंदेश्वर यांनी जि.प. गोंदियाच्या शिक्षण विभागाला पाठविला होता. त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी यांनी पदभार सांभाळला. पण त्यांनी जि.प. गोंदियाकडे कोणतीच विचारपूस किंवा पाठपुरावा न केल्यामुळे तो प्रस्ताव जि.प. शिक्षण विभागात पडून राहिला.दरम्यान अकरावीनंतर बारावी विज्ञान शाखेचे वर्ग सुरु झाले. दोन वर्ष लोटून सुध्दा विज्ञान शाखेची परवानगी मिळाली नव्हती. ही बाब प्रभारी प्राचार्य यू.बी. पारधी यांना माहीत होती. पण काहीतरी करून विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून नागपूर बोर्डात जावून विचारपूस केली.त्यावेळी बारावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान न करता तुम्ही जवळच्या शाळेच्या नावाने विद्यार्थी परीक्षेला बसवा, असा सल्ला देण्यात आला. तेव्हा शिक्षण उपसंचालक नागपूर व शिक्षण संचालक पुणे यांना पत्र व्यवहार करुन बारावी विज्ञान शाखेच्या मुलांना तात्पुरती परीक्षा देण्यासाठी मंजुरी देण्यात आली.विद्यार्थ्यांच्या नुकसानीसाठी प्रभारी प्राचार्य जवाबदार असल्याचा आरोप आहे. शाळेमध्ये गटबाजी करणे, मी करेन तो कायदा अशा भूमिकेतून वावरणारे प्रभारी प्राचार्य पारधी यांच्या धोरणामुळे सुकडी-डाकराम येथील विद्यार्थ्यांना डोंगरगाव शाळेच्या नावाने परीक्षा देण्याची वेळ आल्याचा आरोप आहे.बारावीच्या परीक्षा केंद्रासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष विलास मेश्राम, पत्रकार जांभूळकर व प्राचार्य ए.झेड. नंदेश्वर, प्रा.एस.ए. कापगते यांनी मेहनत घेतली. मात्र आता या शाळेला विज्ञान शाखेची परवानगी नसल्यामुळे विज्ञान शाखेचे विद्यार्थ्यांना डोंगरगाव शाळेच्या नावाने परीक्षा बसण्याची वेळ आली आहे.