शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

शालेय पोषण आहाराचा तांदूळ गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:42 IST

शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचा मागील महिन्याभरापासून पुरवठा झाला नसल्याने अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील निम्यापेक्षा अधिक शाळांत शालेय पोषण आहार तयार करणे बंद असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देनिम्याहून अधिक शाळांमध्ये आहार बंद : विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचा मागील महिन्याभरापासून पुरवठा झाला नसल्याने अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील निम्यापेक्षा अधिक शाळांत शालेय पोषण आहार तयार करणे बंद असल्याची माहिती आहे.विद्यार्थ्यांचे उत्तम पोषण व्हावे, प्राथमिक शाळेत पटनोंदणी वाढावी, विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती वाढावी, विद्यार्थ्यांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहावे, स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव नष्ट व्हावा व शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी महाराष्टÑ शासनाने ही योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना ठराविक पद्धतीने आहार दिले जाते.गेल्या महिनाभरापासून शाळांना तांदळाचा पुरवठाच झाला नाही. शिल्लक असलेल्या तांदळाचा तसेच काही शाळांनी उसनवारी करुन आहार सुरु ठेवला मात्र आजघडीला निम्यापेक्षाही अधिक शाळातील तांदूळ संपलेला आहे. काही शाळांमध्ये साठा शिल्लक आहे. मात्र नेमकी हीच परिस्थिती राहिल्यास येत्या १५ दिवसात १०० टक्के शाळांमधील आहार बंद होण्याची शक्यता आहे. काही शाळांमध्ये तेल, तिखट, मिठ व कडधान्य सुद्धा नसल्याचे समजते. हा पुरवठा दिवाळीनंतर झालाच नसल्याचे काही मुख्याध्यापकांनी सांगितले. याप्रकारामुळे विविध शाळांतील विद्यार्थी महिनाभरापुर्वीपासून आहारापासून वंचित आहेत.पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून यासंदर्भात वारंवार पाठपुरावा सुरु आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्षच दिले जात नसल्याचे चित्र आहे. या साहित्याचा पुरवठा महाराष्टÑ स्टेट फेडरेशन मार्फत केला जातो. मात्र पुरवठाच होत नसल्याने सर्वत्र ओरड सुरु आहे. कमी अधिक प्रमाणात जिल्हाभरात अशीच परिस्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरतुदीने खरेदीची अडचणतेल, तिखट, मिठ व कडधान्य आदि वस्तू आपल्या स्तरावर खरेदी करण्याची सवलत आहे. त्याचे बिल अदा केल्यानंतर राशी देण्याची तरतूद आहे. मात्र तांदूळ विकत घेऊन विद्यार्थ्यांचा आहार सुरळीत ठेवण्याची मुभा नाही. या अटीमुळे शाळा व्यवस्थापन समित्या व मुख्याध्यापकांची अडचण होत आहे. शाळांतील आहार बंद असल्याने ग्रामीण भागात ओरड सुरु आहे.पुरवठादाराला आदेशयासंदर्भात शालेय पोषण आहाराचे अधीक्षक एम.बी.लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एफ.सी.आय.मध्ये तांदळाचा साठा शिल्लक नाही. परवानगी अद्याप आलेली नाही. मात्र तांदळाचा पुरवठा करण्याचे पुरवठादाराला आदेश दिले आहे. सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अडचणी उद्भवत आहेत. इतर तालुक्यात स्थिती बरी आहे. केवळ तांदळाचा साठा नाही. इतर साहित्य मात्र सुरळीत आहेत. येत्या आठवडाभरात पुरवठा होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.