शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

शालेय पोषण आहाराचा तांदूळ गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 00:42 IST

शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचा मागील महिन्याभरापासून पुरवठा झाला नसल्याने अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील निम्यापेक्षा अधिक शाळांत शालेय पोषण आहार तयार करणे बंद असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देनिम्याहून अधिक शाळांमध्ये आहार बंद : विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शालेय पोषण आहारांतर्गत तांदळाचा मागील महिन्याभरापासून पुरवठा झाला नसल्याने अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी तालुक्यातील निम्यापेक्षा अधिक शाळांत शालेय पोषण आहार तयार करणे बंद असल्याची माहिती आहे.विद्यार्थ्यांचे उत्तम पोषण व्हावे, प्राथमिक शाळेत पटनोंदणी वाढावी, विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती वाढावी, विद्यार्थ्यांनी शाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहावे, स्पृश्य-अस्पृश्य भेदभाव नष्ट व्हावा व शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी महाराष्टÑ शासनाने ही योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना ठराविक पद्धतीने आहार दिले जाते.गेल्या महिनाभरापासून शाळांना तांदळाचा पुरवठाच झाला नाही. शिल्लक असलेल्या तांदळाचा तसेच काही शाळांनी उसनवारी करुन आहार सुरु ठेवला मात्र आजघडीला निम्यापेक्षाही अधिक शाळातील तांदूळ संपलेला आहे. काही शाळांमध्ये साठा शिल्लक आहे. मात्र नेमकी हीच परिस्थिती राहिल्यास येत्या १५ दिवसात १०० टक्के शाळांमधील आहार बंद होण्याची शक्यता आहे. काही शाळांमध्ये तेल, तिखट, मिठ व कडधान्य सुद्धा नसल्याचे समजते. हा पुरवठा दिवाळीनंतर झालाच नसल्याचे काही मुख्याध्यापकांनी सांगितले. याप्रकारामुळे विविध शाळांतील विद्यार्थी महिनाभरापुर्वीपासून आहारापासून वंचित आहेत.पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून यासंदर्भात वारंवार पाठपुरावा सुरु आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्षच दिले जात नसल्याचे चित्र आहे. या साहित्याचा पुरवठा महाराष्टÑ स्टेट फेडरेशन मार्फत केला जातो. मात्र पुरवठाच होत नसल्याने सर्वत्र ओरड सुरु आहे. कमी अधिक प्रमाणात जिल्हाभरात अशीच परिस्थिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही.तरतुदीने खरेदीची अडचणतेल, तिखट, मिठ व कडधान्य आदि वस्तू आपल्या स्तरावर खरेदी करण्याची सवलत आहे. त्याचे बिल अदा केल्यानंतर राशी देण्याची तरतूद आहे. मात्र तांदूळ विकत घेऊन विद्यार्थ्यांचा आहार सुरळीत ठेवण्याची मुभा नाही. या अटीमुळे शाळा व्यवस्थापन समित्या व मुख्याध्यापकांची अडचण होत आहे. शाळांतील आहार बंद असल्याने ग्रामीण भागात ओरड सुरु आहे.पुरवठादाराला आदेशयासंदर्भात शालेय पोषण आहाराचे अधीक्षक एम.बी.लांडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एफ.सी.आय.मध्ये तांदळाचा साठा शिल्लक नाही. परवानगी अद्याप आलेली नाही. मात्र तांदळाचा पुरवठा करण्याचे पुरवठादाराला आदेश दिले आहे. सडक-अर्जुनी व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात अडचणी उद्भवत आहेत. इतर तालुक्यात स्थिती बरी आहे. केवळ तांदळाचा साठा नाही. इतर साहित्य मात्र सुरळीत आहेत. येत्या आठवडाभरात पुरवठा होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.