शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांअभावी शाळांच्या समायोजनेची पाळी

By admin | Updated: July 19, 2016 02:15 IST

नगर परिषदेच्या प्राथमिकच नाही तर माध्यमिक शाळांतही घसरण होत आहे. यात दोन प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत

कपिल केकत ल्ल गोंदियानगर परिषदेच्या प्राथमिकच नाही तर माध्यमिक शाळांतही घसरण होत आहे. यात दोन प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत लाजीरवाणी झाली आहे. बोटांवर मोजण्याइतकेच विद्यार्थी या दोन शाळांत अनेक वर्षांपासून आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव नगर परिषद शिक्षण समितीने या दोन शाळांचे समायोजन करण्याचा ठराव घेतला आहे. समितीचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा असला तरीही नगर परिषदेसाठी अत्यंत दुर्भाग्यपूर्ण ठरणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या घसरणीचा आजार जडला आहे. कधी काळी विद्यार्थ्यांनी भरगच्च राहणाऱ्या एवढेच नव्हे तर बोर्डाचे टॉपर देणाऱ्या शाळा आता ओस पडल्या आहेत. परिणामी दरवर्षी झपाट्याने विद्यार्थी पटसंख्या खालावत चालली आहे. मोठ्या प्रमाणात उभ्या झालेल्या खाजगी शाळांची नजर नगर परिषदेच्या शाळांना लागली आहे. यामुळेच खाजगी शाळा जेथे विद्यार्थी सांभाळू शकत नाहीत. तेथे मात्र नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थ्यांची वाट बघावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक व माध्यमिक दोन्ही शाळांची हीच गत आहे. यात मात्र प्राथमिक विभागातील दोन शाळा अत्यंत लाजीरवाण्या स्थितीत चालविल्या जात आहेत. यात सिव्हील लाईन्स मराठी शाळा व हिंदी टाऊन शाळा आहे. यातील सिव्हील लाईन्स मराठी शाळेत या सत्रात दोन विद्यार्थी असून हिंदी टाऊन शाळेत फक्त एकच विद्यार्थी आहे. त्यामुळे या तीन विद्यार्थ्यांसाठी नगर परिषदेला दोन शाळा चालवाव्या लागत आहेत. अगोदरच आर्थीक स्थिती कमकुवत असलेल्या नगर परिषदेला हा मात्र जबर भुर्दडच ठरत आहे. ही स्थिती बघता नगर परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या दोन शाळांचे अन्य शाळांत समायोजन करण्याची मागणी केली.अस करायचेय समायोजन४यातील सिव्हील लाईन्स मराठी शाळेला इंजिनशेड शाळेत समायोजीत करण्याचा. तसेच हिंदी टाऊन शाळेला मालवीय शाळेत समायोजीत करण्याचा निर्णय शिक्षण विषय समितीने घेतला आहे. म्हणजे सिव्हील लाईन्स शाळेतील विद्यार्थी पुढे इंजिनशेड शाळेत पाठविले जाणार. तर हिंदी टाऊन शाळेतील विद्यार्थी मालवीय शाळेत पाठविले जाणार. या दोन्ही शाळा आजच्या शाळांपासून अंतरावर असल्याने भविष्यात या दोन्ही परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नगर परिषदेची शाळाच उरणार नाही. अशात आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या परिवारातील चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो.