शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

विद्यार्थ्यांअभावी शाळांच्या समायोजनेची पाळी

By admin | Updated: July 19, 2016 02:15 IST

नगर परिषदेच्या प्राथमिकच नाही तर माध्यमिक शाळांतही घसरण होत आहे. यात दोन प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत

कपिल केकत ल्ल गोंदियानगर परिषदेच्या प्राथमिकच नाही तर माध्यमिक शाळांतही घसरण होत आहे. यात दोन प्राथमिक शाळांची अवस्था अत्यंत लाजीरवाणी झाली आहे. बोटांवर मोजण्याइतकेच विद्यार्थी या दोन शाळांत अनेक वर्षांपासून आहेत. त्यामुळे नाईलाजास्तव नगर परिषद शिक्षण समितीने या दोन शाळांचे समायोजन करण्याचा ठराव घेतला आहे. समितीचा हा निर्णय त्यांच्यासाठी फायद्याचा असला तरीही नगर परिषदेसाठी अत्यंत दुर्भाग्यपूर्ण ठरणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थी पटसंख्या घसरणीचा आजार जडला आहे. कधी काळी विद्यार्थ्यांनी भरगच्च राहणाऱ्या एवढेच नव्हे तर बोर्डाचे टॉपर देणाऱ्या शाळा आता ओस पडल्या आहेत. परिणामी दरवर्षी झपाट्याने विद्यार्थी पटसंख्या खालावत चालली आहे. मोठ्या प्रमाणात उभ्या झालेल्या खाजगी शाळांची नजर नगर परिषदेच्या शाळांना लागली आहे. यामुळेच खाजगी शाळा जेथे विद्यार्थी सांभाळू शकत नाहीत. तेथे मात्र नगर परिषदेच्या शाळांना विद्यार्थ्यांची वाट बघावी लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. प्राथमिक व माध्यमिक दोन्ही शाळांची हीच गत आहे. यात मात्र प्राथमिक विभागातील दोन शाळा अत्यंत लाजीरवाण्या स्थितीत चालविल्या जात आहेत. यात सिव्हील लाईन्स मराठी शाळा व हिंदी टाऊन शाळा आहे. यातील सिव्हील लाईन्स मराठी शाळेत या सत्रात दोन विद्यार्थी असून हिंदी टाऊन शाळेत फक्त एकच विद्यार्थी आहे. त्यामुळे या तीन विद्यार्थ्यांसाठी नगर परिषदेला दोन शाळा चालवाव्या लागत आहेत. अगोदरच आर्थीक स्थिती कमकुवत असलेल्या नगर परिषदेला हा मात्र जबर भुर्दडच ठरत आहे. ही स्थिती बघता नगर परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने या दोन शाळांचे अन्य शाळांत समायोजन करण्याची मागणी केली.अस करायचेय समायोजन४यातील सिव्हील लाईन्स मराठी शाळेला इंजिनशेड शाळेत समायोजीत करण्याचा. तसेच हिंदी टाऊन शाळेला मालवीय शाळेत समायोजीत करण्याचा निर्णय शिक्षण विषय समितीने घेतला आहे. म्हणजे सिव्हील लाईन्स शाळेतील विद्यार्थी पुढे इंजिनशेड शाळेत पाठविले जाणार. तर हिंदी टाऊन शाळेतील विद्यार्थी मालवीय शाळेत पाठविले जाणार. या दोन्ही शाळा आजच्या शाळांपासून अंतरावर असल्याने भविष्यात या दोन्ही परिसरातील विद्यार्थ्यांसाठी नगर परिषदेची शाळाच उरणार नाही. अशात आर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या परिवारातील चिमुकल्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो.