शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

पात्र सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 22:08 IST

जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी करीत ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ व ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देबबलू कटरे : जिल्हाधिकाºयांना दिले मागण्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी अशी मागणी करीत ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ व ओबीसी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले.निवेदनात, शैक्षणिक सत्र २०१७-१८ पासून ओबीसी, अनुसूचित जाती, जमाती, विशेष मागासवर्ग व वीजा-भज या प्रवर्गातील विद्यार्थ्याचे शिष्यवृत्तीचे आवेदन आॅनलाईन प्रक्रियेद्वारा सादर करुन आॅनलाईन करण्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार विद्यार्थी-पालकांची आहे, असे निर्देश शासनाने निर्गमित केले. आॅनलाईन अर्ज सादर करण्याची क्लीष्ट प्रक्रिया, साईट नियमितपणे न चालणे, आॅनलाईन अर्ज करण्यासाठी केंद्र ग्रामीण भागात उपलब्ध नसणे, यापूर्वीच्या मागील तीन वर्षाच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्याना अद्याप न मिळणे या व अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थी-पालकांत त्रासाला कंटाळून असहकार्याची भावना निर्माण झाला आहे. कदाचित शासनाला सुध्दा हेच हवे आहे, असे एकंदर लक्षात येते. यामुळे निरुत्साह निर्माण होऊन इमाव, अजा, अजमाती आणि इतर मागास समाजाचे विद्यार्थी पुढील शिष्यवृत्तीपासून म्हणजेच शिक्षणापासून सुध्दा वंचीत होणार असल्याचे नमूद आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचा लाभ सर्व पात्र विद्यार्थ्यांना मिळावा व कुणीही वंचित राहणार नाही यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात यावी, थकीत असलेली शिष्यवृत्ती व शिक्षण प्रतिपूर्ती शुल्क तत्काळ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. हे निवेदन ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना देण्यता आले.निवेदन देताना कोषाध्यक्ष अमर वराडे, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बी.एम.करमकर, ओबीसी महासंघाचे खेमेंद्र कटरे आणि उपाध्यक्ष कैलाश भेलावे, महासचिव शिशिर कटरे, बंटी पंचबुध्दे, राजेश कापसे, डॉ. संजीव रहांगडाले, सुनिल भोंगाडे, सुनिल रहांगडाले, सावन डोये, जितु पारधी, संतोष यादव, राहुल खोब्रागडे, रवि भांडारकर व अन्य उपस्थित होते.