शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीचा पेपर दीड तास उशिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 22:30 IST

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि.२४) घेण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वी चे ७ हजार ४०३ तर इयत्ता ८ वीतील ५ हजार ५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परंतु गोंदिया तालुक्याच्या रावणवाडी केंद्रावरील ११९ विद्यार्थ्यांना तब्बल दीड तास पेपर क्र.२ मिळाला नाही.

ठळक मुद्देरावणवाडी केंद्रावरील घटना : पेपर काठीला गेल्याने ११९ विद्यार्थी बसले ताटकळत

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीपरीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीपरीक्षा रविवारी (दि.२४) घेण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ५ वी चे ७ हजार ४०३ तर इयत्ता ८ वीतील ५ हजार ५३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परंतु गोंदिया तालुक्याच्या रावणवाडी केंद्रावरील ११९ विद्यार्थ्यांना तब्बल दीड तास पेपर क्र.२ मिळाला नाही. त्यामुळे पेपर सुटण्याच्या वेळेवर या केंद्रावर दुसऱ्या पेपरला सुरूवात झाली. त्यामुळे परीक्षा केंद्रावर काही वेळ गोंधळ उडाला होता.इयत्ता ५ वी करिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेला जिल्ह्यातील ७२ शाळांमधील ७ हजार ४०३ विद्यार्थी बसले होते. त्यांच्यासाठी जिल्ह्याभरात ५८ केंद्र असून सडक-अर्जुनी तालुक्यात ८, अर्जुनी-मोरगाव ९, देवरी ४, तिरोडा ५, गोंदिया १६, गोरेगाव ४, आमगाव ७, सालेकसा येथे ५ केंद्र आहेत. तर इयत्ता ८ वीचे ३५१ शाळांमधून ५ हजार ५३ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यांच्यासाठी जिल्ह्याभरात ३९ परीक्षा केंद्र ठेवण्यात आले होते. सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव ४, देवरी ४, तिरोडा ३, गोंदिया १३, गोरेगाव ३, आमगाव ४ व सालेकसा येथे ३ केंद्र होते. पेपर क्रमांक-१ मध्ये दुपारी १ ते २.३० वाजता दरम्यान भाषा व गणिताची परीक्षा घेण्यात आली. पेपर क्रमांक- २ दुपारी ३.३० ते ५ वाजतादरम्यान तृतीय भाषा व बुद्धीमत्ता चाचणी घेण्यात येणार होता. या पेपरला रावणवाडी केंद्रावर ११९ विद्यार्थी हिंदी माध्यमाचे होते. त्या विद्यार्थ्यांच्या पेपरचा गठ्ठा काटी येथे नेण्यात आला. त्यामुळे या केंद्रावरील ११९ विद्यार्थ्यांना तब्बल दीड तास उशीराने पेपर द्यावा लागला. सायंकाळी ५ वाजता दरम्यान पेपर सुटण्याची वेळ होती. परंतु ही वेळ निघून गेल्यावर ५ वाजतानंतर या केंद्रावर पेपर सुरू करण्यात आले. रावणवाडीचे पेपर काटीला गेल्यामुळे शिक्षण विभागाची बरीच तारांबळ उडाली होती.पेपर दुसºया केंद्रावर चुकीने गेल्यामुळे ते पेपर परत मागविण्यात आले. पेपरला दीड तास उशीर झाल्याने तेवढा वेळ विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आला.-लोकेश मोहबंशी, गटशिक्षणाधिकारी गोंदिया.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा