शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सरपंचपद आरक्षण सोडतीत गदारोळ

By admin | Updated: August 1, 2015 02:09 IST

अर्जुनी मोरगाव : सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत अन्याय झाल्याची अपिल केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले होते.

आरक्षण निघालेच नाही : जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कार्यवाहीअर्जुनी मोरगाव : सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत अन्याय झाल्याची अपिल केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश दिले होते. मात्र जनतेने नवीन आरक्षण सोडत अमान्य करत गदारोळ केल्याने शुक्रवारी (दि.३१) आयोजित सभा बारगळली. हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला जाणार असल्याचे समजते. याबाबत ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाला जणू ग्रहणच लागले आहे. सर्वप्रथम सरपंचपदाची आरक्षण सोडत २ जुलै रोजी काढण्यात आली होती. मात्र चुकीच्या नियोजनामुळे सभा तहकूब होऊन ३ जुलै रोजी ७० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. भरनोली (तुकुमनारायण), येरंडी-देव, अरततोंडी (दाभना) व बाराभाटी येथील नागरिकांनी आक्षेप नोंदविले होते. या आक्षेपांची दखल घेत ३१ जुलै रोजी नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार शुक्रवारी (३१) पंचायत समितीच्या बचत भवनात दुपारी २ वाजता आरक्षण सोडतीसाठी मोठ्या संख्येने राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित झाले. तहसीलदार एच.जे. रहांगडाले यांनी आरक्षण सोडतीच्या कार्यवाहीला सुरुवात केली. त्यावेळी उपस्थित जनसमूदायाने एकच गदारोळ केला. ३ जुलै रोजी जाहीर केल्याप्रमाणेच आरक्षण कायम ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आम्हाला मान्य नाही. आरक्षण बदलवायचे असेल तर परत ग्रा.पं.च्या निवडणुका नव्याने घ्या, ज्या ग्रा.पं.च्या सरपंचपदाचे आक्षेप आहेत केवळ तेवढीच आरक्षण सोडत काढण्याची मागणी नागरिकांनी केली.२५ जुलै रोजी तालुक्यातील २८ ग्रामपंचायतच्या निवडणुका पार पडल्या. ग्रा.पं. निवडणुकीपूर्वी सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक राजकीय पक्षाने आपल्या पक्षाचा सरपंच व्हावा यासाठी आरक्षित जागेवर संपूर्ण ताकद लावून उमेदवार निवडून आणला. मात्र आता सरपंचपदाचे आरक्षण बदलणार असल्याच्या वार्तेने त्यांच्यात नैराश्य आले. अनेक ठिकाणी सरपंचपदाच्या आरक्षित उमेदवारांवर मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करण्यात आले. नवीन आरक्षण सोडतीमुळे आपले पैसे वाया जाणार या भीतीमुळे गावागावातून नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांना घेवून येथे एकच गर्दी झाली होती. पंचायत समिती बचत भवनाचा हॉल खचाखच गर्दीने भरला होता. अनेक लोकं बाहेर उभी होती. अपुऱ्या बैठक व्यवस्थेमुळे उपस्थितांनी तालुका प्रशासनाविषयी तिव्र नाराजी व्यक्त केली. तालुका प्रशासनाकडून आरक्षण सोडतीला घेऊन वारंवार चुका केल्या जात आहेत, याचा मनस्ताप प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. आरक्षणाचा तिढा अद्यापही सुटला नसून गुडघ्याला बाशिंग बांधून सरपंचपदाची माळ आपल्या गळ्यात पडते की नाही यासाठी नवनिर्वाचित सदस्य आतूर झाले आहेत. प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतला तरी दावेदार न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची शक्यता आहे. (तालुका प्रतिनिधी)