शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांनी नाकारली

By admin | Updated: July 3, 2014 23:38 IST

शालेय पोषण आहार बचत गटाला देण्यासंबंधी शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकावरून मुख्याध्यापक आणि शिक्षकांत काही काळाकरिता आनंद होते. त्याच बरोबर काही बचत गटाच्या

काचेवानी : शालेय पोषण आहार बचत गटाला देण्यासंबंधी शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकावरून मुख्याध्यापक आणि शिक्षकांत काही काळाकरिता आनंद होते. त्याच बरोबर काही बचत गटाच्या कार्यकर्त्यांना कामे हाती घेण्याची लालसा होती. मात्र जबाबदारी अधिक व लाभ कसलाही नाही, त्यामुळे जिल्ह्यात अपवाद वगळता कोणत्याही बचत गटांनी पोषण आहार घेण्याचे नाकारले. यामुळे मुख्याध्यापकांना यापूर्वी पोषण आहार शिजविणाऱ्यांपुढे हात जोडण्याची पाळी आली आहे. एप्रिल २०१४ ला शासनाने शैक्षणीक सत्र २०१४-१५ मध्ये वर्ग १ ते ८ करिता शालेय पोषण आहार पुरविण्याची (शिजविण्याची) संपूर्ण जबाबदारी बचत गटांकडे देण्याचे ठरविले होते. यामुळे पोषण शिजविण्याचा ताण कमी होणार हे बघून मुख्याध्यापकांत आनंद निर्माण झाला होता. तर पोषणआहाराची जबाबदारी मिळात असल्याने शासनाचे आमच्याकडेही लक्ष आहे हे बघून बचत गटांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण दिसून येत होते. शेवटी सत्र २०१४-१५ गेल्या २६ जून पासून सुरू झाला. परंतु अपवाद वगळता जिल्ह्यात कोणत्याही बचत गटाने ठामपणे कामे घेतल्याचे वृत्त हाती लागले नाही. अधिक तर ९९ टक्के शाळेत मागील शैक्षणिक सत्रात पोषण आहार शिजविणाऱ्यांची स्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे.परिपत्रकामध्ये बचत गटाला जबाबदाऱ्या सोपविल्या परंतु त्यांना आर्थिक लाभ कसा व कोणता दिला जाणार याचा उल्लेख केला नसल्याने फुकट सेवा कशी करणार असा प्रश्न बचत गटांसमोर उद् भवला. परिणामी कोणत्याही गावात बचत गटाने तयारी दर्शविली नाही. त्यात शासनाने शाळेच्या पहिल्या दिवशी पोषण आहार देण्यात यावे असे आदेश दिले. यामुळे मात्र सुटकेच नि:श्वास घेणारे मुख्याध्यापक पुन्हा जाळ््यात अडकले. शेवटी मुख्याध्यापकांना गेल्या सत्रात पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना ताई-मावशी करून बोलावून पोषण आहार शिजवून घेण्याची पाळी आली. पुन्हा त्याच भानगडीत गळा अडकल्याने मुख्याध्यापकांत नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे शालेय पोषण आहाराचे काम मुख्याध्यापकांकडून काढून स्थानिक संस्थांकडे देण्याची मागणी अनेक वर्षांपासून शासना समक्ष होती. त्यावर शासनाने निर्णय घेवून पोषण आहारातून मुख्याध्यापकांचा ताण कमी केल्याचे वरवर दर्शविले होते. तर शासनाने घेतलेले निर्णय चुकीचे असून संघटनेला आणि मुख्याध्यापकाला दिलासा देवून तात्पूरते समाधान करण्याचे प्रयत्न होते, असे स्पष्ट मत शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. (वार्ताहर)