शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांनी नाकारली

By admin | Updated: July 3, 2014 23:38 IST

शालेय पोषण आहार बचत गटाला देण्यासंबंधी शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकावरून मुख्याध्यापक आणि शिक्षकांत काही काळाकरिता आनंद होते. त्याच बरोबर काही बचत गटाच्या

काचेवानी : शालेय पोषण आहार बचत गटाला देण्यासंबंधी शिक्षण मंत्रालयाने काढलेल्या परिपत्रकावरून मुख्याध्यापक आणि शिक्षकांत काही काळाकरिता आनंद होते. त्याच बरोबर काही बचत गटाच्या कार्यकर्त्यांना कामे हाती घेण्याची लालसा होती. मात्र जबाबदारी अधिक व लाभ कसलाही नाही, त्यामुळे जिल्ह्यात अपवाद वगळता कोणत्याही बचत गटांनी पोषण आहार घेण्याचे नाकारले. यामुळे मुख्याध्यापकांना यापूर्वी पोषण आहार शिजविणाऱ्यांपुढे हात जोडण्याची पाळी आली आहे. एप्रिल २०१४ ला शासनाने शैक्षणीक सत्र २०१४-१५ मध्ये वर्ग १ ते ८ करिता शालेय पोषण आहार पुरविण्याची (शिजविण्याची) संपूर्ण जबाबदारी बचत गटांकडे देण्याचे ठरविले होते. यामुळे पोषण शिजविण्याचा ताण कमी होणार हे बघून मुख्याध्यापकांत आनंद निर्माण झाला होता. तर पोषणआहाराची जबाबदारी मिळात असल्याने शासनाचे आमच्याकडेही लक्ष आहे हे बघून बचत गटांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण दिसून येत होते. शेवटी सत्र २०१४-१५ गेल्या २६ जून पासून सुरू झाला. परंतु अपवाद वगळता जिल्ह्यात कोणत्याही बचत गटाने ठामपणे कामे घेतल्याचे वृत्त हाती लागले नाही. अधिक तर ९९ टक्के शाळेत मागील शैक्षणिक सत्रात पोषण आहार शिजविणाऱ्यांची स्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे.परिपत्रकामध्ये बचत गटाला जबाबदाऱ्या सोपविल्या परंतु त्यांना आर्थिक लाभ कसा व कोणता दिला जाणार याचा उल्लेख केला नसल्याने फुकट सेवा कशी करणार असा प्रश्न बचत गटांसमोर उद् भवला. परिणामी कोणत्याही गावात बचत गटाने तयारी दर्शविली नाही. त्यात शासनाने शाळेच्या पहिल्या दिवशी पोषण आहार देण्यात यावे असे आदेश दिले. यामुळे मात्र सुटकेच नि:श्वास घेणारे मुख्याध्यापक पुन्हा जाळ््यात अडकले. शेवटी मुख्याध्यापकांना गेल्या सत्रात पोषण आहार शिजविणाऱ्या महिलांना ताई-मावशी करून बोलावून पोषण आहार शिजवून घेण्याची पाळी आली. पुन्हा त्याच भानगडीत गळा अडकल्याने मुख्याध्यापकांत नाराजी पसरली आहे. विशेष म्हणजे शालेय पोषण आहाराचे काम मुख्याध्यापकांकडून काढून स्थानिक संस्थांकडे देण्याची मागणी अनेक वर्षांपासून शासना समक्ष होती. त्यावर शासनाने निर्णय घेवून पोषण आहारातून मुख्याध्यापकांचा ताण कमी केल्याचे वरवर दर्शविले होते. तर शासनाने घेतलेले निर्णय चुकीचे असून संघटनेला आणि मुख्याध्यापकाला दिलासा देवून तात्पूरते समाधान करण्याचे प्रयत्न होते, असे स्पष्ट मत शिक्षण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. (वार्ताहर)