शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

२२ वर्षांपासून ते करतात पाण्याची बचत

By admin | Updated: June 10, 2016 01:50 IST

पाण्याचे महत्व समजून घेऊन पाण्याची बचत करण्याची सुरूवात स्वत:पासून करणारे लोक फार कमी आहेत. लोकमतने जलमित्र अभियान सुरू केल्यानंतर ...

इतरांसाठी आदर्श : जलपुनर्भरणातून विहिरीत पाण्याचा सुकाळगोंदिया : पाण्याचे महत्व समजून घेऊन पाण्याची बचत करण्याची सुरूवात स्वत:पासून करणारे लोक फार कमी आहेत. लोकमतने जलमित्र अभियान सुरू केल्यानंतर पाण्याचे महत्व समजून घेऊन पाणी बचत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. मात्र सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहन पवार यांनी २२ वर्षापूर्वीच या प्रयोगाची सुरूवात केली. लोकमत जलमित्र अभियानाच्या निमित्ताने पवार यांनाही आपला हा प्रयोग जनतेसमोर मांडण्याची इच्छा झाली. या निमित्ताने लोकांनी असे प्रयोग घरोघरी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सिव्हील लाईनमधील रहिवासी असलेले पवार दाम्पत्य व्यवसायाने शिक्षक. जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असताना मोहन पवार यांनी १९८५ मध्ये आपल्या शाळेतर्फे पाणी पुनर्भरणाचे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) मॉडेल विज्ञान प्रदर्शनात सादर केले होते. ते मॉडेल राज्यस्तरापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी १९९४ मध्ये आपल्या घरातच छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे अंगणातील खड्ड्यात सोडून ते छोट्या विहिरीत झिरपेल अशी व्यवस्था त्यांनी केली. त्यामुळे आजपर्यंत त्या विहिरीचे पाणी कधी कमी पडले नाही, असे पवार सांगतात.पाणी बचतीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पवार यांनी गोंदियाच्या हड्डीटोली मार्गावरील नवीन क्रीडा संकुलासमोरच्या असलेल्या आपल्या १.२० एकर जागेला वॉल कंपाऊंड करून तिथे पुढील बांधकाम व देखरेख करण्यासाठी दोन खोल्या बांधल्या. अंगणात सिमेंटचे फ्लोरिंग केले. पण त्या दोन खोल्यावरील आणि अंगणात पडणारे सर्व पाणी त्याच आवारातील एका चौकोनी खड्ड्यात जमा होईल अशी व्यवस्था केली. त्या खड्ड्यातून ते पाणी लागूनच असलेल्या छोटेखानी विहिरीत झिरपते. त्यामुळे भविष्यात कितीही बांधकाम केले तरी त्या छोट्या विहिरीचे पाणी तुटणार नाही, असा विश्वास पवार यांना आहे. (जिल्हा प्रतिनिधी)