शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

२२ वर्षांपासून ते करतात पाण्याची बचत

By admin | Updated: June 10, 2016 01:50 IST

पाण्याचे महत्व समजून घेऊन पाण्याची बचत करण्याची सुरूवात स्वत:पासून करणारे लोक फार कमी आहेत. लोकमतने जलमित्र अभियान सुरू केल्यानंतर ...

इतरांसाठी आदर्श : जलपुनर्भरणातून विहिरीत पाण्याचा सुकाळगोंदिया : पाण्याचे महत्व समजून घेऊन पाण्याची बचत करण्याची सुरूवात स्वत:पासून करणारे लोक फार कमी आहेत. लोकमतने जलमित्र अभियान सुरू केल्यानंतर पाण्याचे महत्व समजून घेऊन पाणी बचत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. मात्र सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोहन पवार यांनी २२ वर्षापूर्वीच या प्रयोगाची सुरूवात केली. लोकमत जलमित्र अभियानाच्या निमित्ताने पवार यांनाही आपला हा प्रयोग जनतेसमोर मांडण्याची इच्छा झाली. या निमित्ताने लोकांनी असे प्रयोग घरोघरी करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.सिव्हील लाईनमधील रहिवासी असलेले पवार दाम्पत्य व्यवसायाने शिक्षक. जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापक असताना मोहन पवार यांनी १९८५ मध्ये आपल्या शाळेतर्फे पाणी पुनर्भरणाचे (रेन वॉटर हार्वेस्टिंग) मॉडेल विज्ञान प्रदर्शनात सादर केले होते. ते मॉडेल राज्यस्तरापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी १९९४ मध्ये आपल्या घरातच छतावर पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे अंगणातील खड्ड्यात सोडून ते छोट्या विहिरीत झिरपेल अशी व्यवस्था त्यांनी केली. त्यामुळे आजपर्यंत त्या विहिरीचे पाणी कधी कमी पडले नाही, असे पवार सांगतात.पाणी बचतीचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पवार यांनी गोंदियाच्या हड्डीटोली मार्गावरील नवीन क्रीडा संकुलासमोरच्या असलेल्या आपल्या १.२० एकर जागेला वॉल कंपाऊंड करून तिथे पुढील बांधकाम व देखरेख करण्यासाठी दोन खोल्या बांधल्या. अंगणात सिमेंटचे फ्लोरिंग केले. पण त्या दोन खोल्यावरील आणि अंगणात पडणारे सर्व पाणी त्याच आवारातील एका चौकोनी खड्ड्यात जमा होईल अशी व्यवस्था केली. त्या खड्ड्यातून ते पाणी लागूनच असलेल्या छोटेखानी विहिरीत झिरपते. त्यामुळे भविष्यात कितीही बांधकाम केले तरी त्या छोट्या विहिरीचे पाणी तुटणार नाही, असा विश्वास पवार यांना आहे. (जिल्हा प्रतिनिधी)