शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दुर्मिळ वृक्षांचे रोपवाटिकेत जतन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 20:51 IST

दिवसेंदिवस सिंमेटची जंगल वाढत चालली असून पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. अनेक दुर्मिळ व औषधीयुक्त वनस्पतींची झाडे सुध्दा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच या वृक्षांचे जतन न केल्यास भविष्यात या झाडांची चित्र केवळ पुस्तकांमध्ये पाहयला मिळतील.

ठळक मुद्देकरुच्या वृक्षांची करणार लागवड : अभिमन्यू काळे यांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवसेंदिवस सिंमेटची जंगल वाढत चालली असून पर्यावरणाची गंभीर समस्या निर्माण होत आहे. अनेक दुर्मिळ व औषधीयुक्त वनस्पतींची झाडे सुध्दा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच या वृक्षांचे जतन न केल्यास भविष्यात या झाडांची चित्र केवळ पुस्तकांमध्ये पाहयला मिळतील. ही वेळ येऊ नये यासाठी जिल्ह्यातील दुर्मिळ प्रजातींच्या वृक्षांच्या बिया संकलीत करुन त्यांचे रोपटे तयार करण्याचे काम गोरेगाव तालुक्यातील मुरदोली येथील रोपवाटीकेत केले जात आहे.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या पुढाकाराने व वनविभागाच्या सहकार्याने दुर्मिळ वृक्षांचे जतन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी काळे हे निर्सगप्रेमी असून त्यांनी मागील वर्षीपासून जिल्ह्यात सेंद्रीय शेतीची मोहीम सुध्दा सुरू केली आहे.गोंदिया जिल्ह्यावर निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. नवेगावबांध, नागझिरा अभयारण्य, सारस संवर्धन मोहीमेमुळे बाहेरील पर्यटकांना जिल्हाकडे आकर्षीत करण्यास या सर्व गोष्टींची मदत होत आहे. हीच बाब ओळखून काळे यांनी जिल्ह्याचे पूर्ण भ्रमण केले.या दरम्यान बऱ्याच ठिकाणी जुनी वृक्ष आढळली. यानंतर त्यांनी या शंभर वर्षे जुन्या झाडांचे संवर्धन करण्यासाठी संबंधीत शेतकºयाला वर्षाला १ हजार रुपये पेशंन देण्यास सुरूवात केली. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो जुन्या वृक्षांचे जतन करण्यास मदत झाली.ही मोहीम राबवित असतानाच त्यांनी दुर्मिळ होत चाललेल्या अनेक वृक्षांचे जतन कसे करता येईल. यासाठी प्रयत्न सुरू केले. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची मदत घेवून दुर्मिळ होत चाललेल्या वृक्षांच्या बियांचे संकलन करण्यास सांगितले. हे बियाणे गोळा केल्यानंतर त्यांचे रोपटे तयार करण्याचे काम सध्या मुरदोली येथील रोपवाटीकेत सुरू आहे.बेल, मोहा, सिवन, कवट, आंजन, बीजा, जांभुळ, पुत्रजिवा, चिंच, बेहडा, अमलतास, रिठा, पांढरा शिरस, मोहई, आपटा, चार, साजा, उंबर, तेंदू, सिसम, वड, पिंपळ या वृक्षांचे रोपटे तयार करण्याचे काम सुरू केले. सध्या या रोपवाटीकेत ४२ प्रकारच्या प्रजातीचे २ लाख ७२ हजार ११५ रोपटे तयार करण्यात आले आहे.आधुनिक तंत्रज्ञानाची मदतवनविभागाची मुरदोली येथील रोपवाटीकेची विशेष ओळख आहे. रोपवाटीकेत मिसचेंबर, हार्डलिंग चेंबर, लोखंडी स्टॅन्ड, रुट ट्रेनर आदी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे. या रोपवाटीकेला हॉयटेक रोपवाटीका तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपवनसंरक्षक एस.युवराज यांनी सांगितले.करुने बहरणार गोंदिया-कोहमारा मार्गकरुचे झाड पांढºया रंगाचे असून या झाडाचा रंग त्रृतुनुसार बदल असतो. हे वृक्ष दुर्मिळ समजले जाते. या दुर्मिळ वृक्षाचे जतन करुन पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी गोंदिया-कोहमारा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा करुच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे हा मार्ग करुच्या वृक्षांनी बहरणार आहे.जिल्ह्यात अनेक दुर्मिळ वनस्पतींची झाडे आहेत. मात्र त्यांचे संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने बºयाच वृक्षांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या वृक्षांचे संवर्धन करण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे या सर्व वृक्षांचे जतन कसे करता येईल या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू आहे.अभिमन्यू काळे, जिल्हाधिकारी गोंदिया.

टॅग्स :forest departmentवनविभाग