ग्रामपंचायत सरपंच सेवा महासंघ अर्जुनी मोरगावच्यावतीने तालुका स्तरावरील संबंधित अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना दिलेल्या निवेदनानुसार मागील तीन महिन्यांपासून गावातील पथदिवे बंद आहेत. गावस्तरावर सर्वत्र काळोखाचे सावट पसरल्याने गावात भीती निर्माण झाल्याचे चित्र तालुक्यात आहे. पथदिवे सुरू करण्यासंबंधी सरपंच महासंघाच्यावतीने राज्य शासन व लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले; परंतु यावर अद्यापही समाधानकारक तोडगा काढण्यात आला नाही. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय तालुक्यातील सरपंचांनी बैठकीत घेतला. याप्रसंगी सरपंच सेवा महासंघाचे हेमकृष्ण संग्रामे, अशोक कापगते, संजय खरवडे, प्रकाश शिवणकर, होमराज पुस्तोडे, नंदकुमार गहाणे, लक्ष्मीकांत नाकाडे, विश्वनाथ बाळबुद्धे, प्रतिमा बोरकर, कुंदा डोंगरवार, अजय अंबादे, भोजराज लोगडे, लीलेश्वर खुणे, सरिता लंजे, किशोर ब्राम्हणकर, भगवान नाकाडे उपस्थित होते.
पथदिवे सुरू करण्यासाठी सरपंचाचे धरणे आंदोलन आजपासून ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:32 IST