शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सरपंचाला जि.प. सदस्याची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:07 IST

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडीकोटा येथील सरपंचपदावर निवडून आलेले कमलेश आतीलकर यांना रेतीघाटाच्या वादावरुन एका जिल्हा परिषद सदस्यांनी मारहाण केल्याची घटना...

ऑनलाईन लोकमत तिरोडा : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुंडीकोटा येथील सरपंचपदावर निवडून आलेले कमलेश आतीलकर यांना रेतीघाटाच्या वादावरुन एका जिल्हा परिषद सदस्यांनी मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) रोजी घडली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.आतीलकर हे मागील दोन वर्षापासून रेतीघाटावर कंत्राटदार अवैध पटेल यांच्याकडे दिवानजी म्हणून काम पाहतात. मंगळवारी (दि.२१) जि.प.सदस्य मनोज डोंगरे व कृष्णा भांडारकर यांनी घाटकुरोडा येथील रेतीघाटावर येवून त्यांना ५ लाख रुपयांची मागणी केली. मात्र ती पूर्ण न केल्यामुळे त्यांनी बुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप सरपंच आतीलकर यांनी केला आहे. आतीलकर सध्या तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतिलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ते नियमितपणे कामावर गेले असता जि.प.सदस्य मनोज डोंगरे व कृष्णा भांडारकर यांनी रेतीघाट चालू ठेवायचा असेल तर ५ लाख रुपये दयावे लागतील असे सांगत ५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आतीलकर यांनी केला. मात्र ते न दिल्याने बाचाबाची झाली यावरुन त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. त्याच दिवशी मुंडीकोटा येथे ग्रामपंचायतमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. पण कोरम अभावी स्थगीत करण्यात आली. तेवढ्यात छातीत दुखल्याने मला मुंडीकोटा प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.मंगळवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. याची पोलिसात तक्रार केल्याचे आतीलकर यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ११ पैकी भाजपाचे सात सदस्य व सरपंच निवडून आले.त्यात एका पक्षाला अपयश आले. त्यातूनच हा वाद झाल्याची चर्चा आहे. मात्र पोलिसांच्या चौकशीनंतर यातील खरे सत्य बाहेर येईल.पैशाच्या मागणीचा आरोप बिनबुडाचायासंदर्भात जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांच्याशी संपर्क साधला असता या रेतीघाटावर अवैध रेतीचे उत्खनन होत आहे. याबाबत मला कार्यकर्त्यांचे फोन आले असता मी घाटकुरोडा रेती घाटावर चौकशीकरिता गेलो होतो. तिथे याबाबत विचारणा केली. वरिष्ठांसह मोबाईलवर बोलत असताना कृष्णा भांडारकर व इतर लोकात भांडण झाले. ५ लाख रुपयांची मागणी कुणीही कुठेही केली नाही. आतीलकर यांनी लावलले सर्व आरोप बिनबुडाचे आहेतत. त्यांनी ही मागणी सिद्ध करुन दाखवावी अन्यथा आपण अबू्र नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले.