शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

सरपंच, उपसरपंचांना मानधन पण सदस्यांना मिळते केवळ चहापान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:30 IST

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी महिन्यात पार पडल्या. त्यानंतर १२ फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंचाची निवडणूक पार पडली. ...

गोंदिया : जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जानेवारी महिन्यात पार पडल्या. त्यानंतर १२ फेब्रुवारीला सरपंच व उपसरपंचाची निवडणूक पार पडली. सरपंच व उपसरपंचपदी निवडून आलेल्या महिन्याकाठी मानधन दिले जाते. यात सरपंचांना ३ हजार रुपये तर उपसरपंचांना हजार रुपये मानधन दिले जाते. पण निवडून आलेल्या सदस्यांना कुठलेच मानधन मिळत नसून मासिक भत्ता व चहापान म्हणून शंभर रुपये दिले जातात. त्यामुळे सदस्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. सरपंच आणि उपसरपंच यांना महिन्याकाठी जसे मानधन दिले जाते. तसेच मानधन सदस्यांनासुध्दा देण्यात यावे सूर आहे. तर निवडून आलेले सरपंच आणि उपसरपंचसुध्दा सदस्यांच्या मताशी अनुकूल असून ग्रामपंचायत सदस्यांनासुध्दा महिन्याकाठी किमान हजार रुपये तरी मानधन देण्यात यावे असे सांगितले. ग्रामपंचायत सदस्यसुध्दा पदाधिकाऱ्यांप्रमाणेच गावकऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे काम करीत असतात. अनेकदा त्यांच्या समस्यांकरिता ते तालुका स्तरावरसुध्दा जात असतात. तर कधी गावातील उपक्रमासाठी स्वत:च्या खिशातून खर्च करीत असतात. त्यामुळे या सदस्यांना सन्मान तरी शासनाने मानधन देण्याची गरज असल्याचे सांगितले.

....

निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती

१८९

निवडून आलेले सदस्य

१,६९३

निवडून आलेले सरपंच

१८९

...........

चहापान मिळतात शंभर रुपये

ग्रामपंचायत सदस्यांना मानधन देण्याची तरतूद अद्यापही ग्रामविकास विभागाने केलेली नाही. त्यामुळे त्यांना मासिक मीटिंग भत्ता म्हणून चहापान शंभर रुपये दिले जातात. ग्रामपंचायत सदस्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. पण ग्रामविकास विभागाने चहापान म्हणून दिल्या जाणाऱ्या रक्कमेत केवळ शंभर रुपयांनी वाढ केली असल्याचे सदस्यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना केवळ मानच मिळत असून मानधन मिळत नसल्याची नाराजी सदस्यांनी व्यक्त केली.

.......

कोट

ग्रामविकास विकास विभागाकडे सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ करून सदस्यांनासुध्दा किमान १ हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी केली होती. मात्र अद्यापही त्यावर कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. सदस्यांनासुध्दा मानधन मिळायला हवे.

प्रतिमा बोरगाव, बोंडगाव

.......

सरपंच आणि उपसरपंच यांच्याप्रमाणेच गाव विकासात ग्रामपंचायत सदस्यांची भूमिकासुध्दा महत्त्वपूर्ण असते. तेदेखील गावकऱ्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी तालुका व जिल्हा मुख्यालयी बरेचदा जात येत असतात. त्यामुळे त्यांनासुध्दा शासनाने मानधन द्यायला हवे.

-

.....

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनासुध्दा शासनाकडून मानधन दिले जाते. मग ग्रामपंचायत सदस्यांना मानधन देण्यात शासनाला काय अडचण आहे. शासनाने त्यांनासुध्दा मानधन दिल्यास त्यांचादेखील सन्मान केल्यासारखे होईल.

-