शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या आगमनाने पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:39 IST

मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावल्याने संकटातील पिकांना संजीवनी मिळाली आहे.

ठळक मुद्देआठ महसूल मंडळात अतिवृष्टी : बळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पाठ फिरविलेल्या पावसाने गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र हजेरी लावल्याने संकटातील पिकांना संजीवनी मिळाली आहे.आॅगस्ट महिन्यातील चार आठवडे कोरडे गेल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी जवळपास ५० टक्के रोवण्या खोळंबल्या होत्या. तर ज्या रोवण्या झाल्या त्या देखील संकटात आल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांमध्ये नैराश्याचे वातावरण होते. संकटातील पिके वाचविण्यासाठी सिंचन प्रकल्पांमधील पाणी सोडण्यात आले. त्यांच्या मदतीने धानाचे पºहे वाचविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू होती. पावसाअभावी रोवणी लांबल्याने उत्पादनात घट होणे निश्चित आहे. मात्र केलेला लागवड खर्च तरी भरुन निघावा यासाठी शेतकºयांचे प्रयत्न सुरू होते. गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात थोड्या फार प्रमाणात झालेल्या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली. त्यामुळे बळीराजा सुखावल्याचे चित्र आहे. सोमवारी आठ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण ३३ महसूल मंडळापैकी आठ मंडळामध्ये अतिवृष्टिची नोंद झाली.तिरोडा तालुक्यातील परसवाडा ६६.६ मिमी., तिरोडा १२४.४ मिमी., मुंडीकोटा ८० मिमी., अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध ७२ मिमी., बोंडगावदेवी ८७ मिमी., अर्जुनी मोरगाव १२६.४ मिमी., महागाव १३५.४ मिमी., सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड येथे ६२.४ मिमी. पावसाची नोंद झाली.पाणी साठ्यात वाढगेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे पुजारीटोला, कालीसरार,सिरपूरबांध, इटियाडोह जलाशयातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.