शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

परवानगी न घेता रद्दीची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 23:54 IST

रद्दी विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता परस्पर कार्यालयातील शेकडो क्विंटल रद्दीची विक्री करण्यात आल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. ही रद्दी नेमकी कुठे विक्री झाली याचे उत्तर मिळत नसल्याने गुढ आणखीच वाढले आहे.

ठळक मुद्देतहसील कार्यालयाचा प्रताप : रद्दीचे वजन व आलेली रक्कम किती हे गुलदस्त्यात

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : रद्दी विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता परस्पर कार्यालयातील शेकडो क्विंटल रद्दीची विक्री करण्यात आल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. ही रद्दी नेमकी कुठे विक्री झाली याचे उत्तर मिळत नसल्याने गुढ आणखीच वाढले आहे.स्थानिक तहसील कार्यालयात अनेक वर्षापासून दस्तावेज संग्रहित होते. यात जुने उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर, डोमीसाईल प्रमाणपत्र व विविध कामाकाजासाठी अर्जदारांकडून प्राप्त झालेल्या दस्तावेजांचा समावेश आहे. नव्याने रुजू झालेले तहसीलदार धनंजय देशमुख यांनी कार्यालयात अस्ताव्यस्त असलेल्या या दस्तावेजांची विल्हेवाट लावण्याचे ठरविले.ही रद्दी विक्री करण्यापुर्वी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली नाही. कार्यालय स्वच्छ करण्याच्या नादात त्यांनी बाहेरगावावरुन वाहन बोलावून त्यात ही रद्दी कोंबली. सतत चार दिवस हा प्रकार चालला. सामसूम झाल्यानंतर ही रद्दी वाहनात भरण्यात आली.१९ जुलै रोजी येथील जय बमलेश्वरी धरमकाट्यावर एम एच ३५-के ४६१९ हे वाहन सुमारे ८.३० वाजता उभे झाले. त्याचे वजन करण्यात आले. रद्दीचे वजन २२३५ किलो अशी पावती क्र. नमूद आहे.ही रद्दी १२ ते १९ जुलै दरम्यान तीन ते चारदा विक्रीसाठी पाठविण्यात आल्याच्या चर्चा आहेत. या कालावधीत नेमकी किती रद्दी विक्री करण्यात आली याचा तपशील नसला तरी १९ जुलै रोजी धरमकाट्यावर वजनकाटा केल्याची पावती ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.या संदर्भात तहसीलदार धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा केली असता कार्यालयीन रद्दी विक्री करण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या परवानगीची आवश्यकता नाही व यासाठी निविदा मागविण्याचीही आवश्यकता नसल्याचे सांगितले.तहसील कार्यालयात कार्यालयीन सुधारणा केल्या जात आहेत. खलीना पॅटर्न राबवायचे आहे. शिवाय आयएसओ नामांकनासाठी तयारी करायची आहे. कार्यालयात सर्वत्र अस्तवयस्त दस्तावेज होते. स्वच्छता करण्याच्या दृष्टीने व रेकार्ड व्यवस्थित ठेवायचा असल्याने रद्दीची विक्री करण्याची गरज होती. ती आपण विक्री केली. विक्रीतून मिळणारे पैसे शासकीय खजिन्यात जमा करण्यात येतील अशी माहिती दिली. मात्र विक्री केलेल्या रद्दीचे नेमके वजन किती व त्यामधून किती राशी प्राप्त झाली याबाबद त्यांनी नंतर माहिती देण्यात येईल असे सांगितले.हा अर्जुनी-मोरगाव येथे चर्चेचा विषय आहे. अशा साहित्य विक्रीसाठी सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र व मुल्यांकन प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याचे समजते. मात्र स्थानिक तहसील कार्यालयाने असे कुठलेही प्रमाणपत्र घेतल्याची कबूली देण्यात आली आहे. याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.