शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रामधून बोगस बियाणांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:19 IST

केशोरी : यावर्षी मृग नक्षत्र लागल्यापासूृन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घाईघाईने शेतकऱ्यांनी मिळेल त्या किंमतीमध्ये कृषी केंद्रामधून धान बियाणे ...

केशोरी : यावर्षी मृग नक्षत्र लागल्यापासूृन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे घाईघाईने शेतकऱ्यांनी मिळेल त्या किंमतीमध्ये कृषी केंद्रामधून धान बियाणे खरेदी करून खरीप हंगामातील धान पेरणी आटोपली. परंतु धान बियाणे ७० टक्केच उगवल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. कृषी केंद्रामधून बोगस बियाणे विक्री केली जात असल्याची शंका बळावली आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर धाडी टाकून कारवाई करण्याची मागणी केशोरी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात मानसून दाखल होताबरोबर केशोरी परिसरात मृग नक्षत्र लागल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी केल्याबरोबर पऱ्हे टाकले होते. त्यांची धानाची पऱ्हे उगवली नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी पावसामुळे पऱ्हे टाकणे जगत नसल्यामुळे घाई-घाईने कृषी केंद्रामधून धानाची बियाणे घेऊन पऱ्हे भरून पेरणी आटोपली. यादरम्यान कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत होती. पेरणीची घाई न करता बियाणांची उगवण क्षमता पडताळून बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांनी अपेक्षित होते. बियाणे कंपन्याच्या जाहिरातीवर आकर्षित न होता बियाणांची खात्री करूनच बियाणे खरेदी करणे आवश्यक असताना पेरणीचे हंगाम आटोपण्याच्या घाई-घाईने बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी केंद्रामधून खरेदी केलेली बियाणे १०० टक्के उगवली नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची ओरड होत आहे.

...........

आंध्र व मध्य प्रदेशातून आले बियाणे

या परिसरातील अनेक कृषी केंद्रांनी आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशामधून कमी किमतीच्या बोगस बियाणे आणून शेतकऱ्यांना जास्त किमतीमध्ये बियाणे विकण्याचा गोरखधंदा सुरू केल्याचे बाेलल्या जाते. त्या बियाणांची उगवण क्षमता योग्य नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी बियाणे विकत घेतली त्या शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अशा कृषी केंद्रामधून शेतकऱ्यांना पक्के बिल दिले जात नाही. शासनाने ठरवून दिलेल्या दराने बियाणांची विक्री केली जात नाही. अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. कृषी विभागाने अशी बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्रावर धाडी टाकून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.