वृंदावनधाम (गोंदिया) : संन्याशी संतच नव्हे तर शिपाई देखील होते. संताचे काम सद्विचारांचे शिक्षण देण्याबरोबर सुरक्षा करणे देखील आहे. संतासाठी मातृभूमीपेक्षा मोठे काहीच नाही, असे उदगार साध्वी ऋतंभरादेवी यांनी काढले. स्थानिक मोक्षधाम मार्गावरील वृंदावनधाम येथे आयोजित श्रीमद् भागवत ज्ञान सप्ताहात दुसऱ्या दिवशी प्रवचन करतांना त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या आम्ही जाती-धर्माच्या नावावर गट पाडत आहोत. आपसात भांडत आहोत.यामुळे सतत दुर्बल होत आहोत. आता आमचा छोटा शेजारी डोळे वटारत आहे. पण आम्ही काही करू शकत नाही. कुणी आम्हाला विचारतो तर आम्ही आपल्या जाती सांगतो. परंतु हिंदुस्तानात राहणारा हिंदू आहे असे सांगितले जात नाही. जर कुणी मरे पर्यंत दान करीत नाही तर तो कर्णासारखा दानी कसा? आगीत तापल्यावरच सोन्याला चमक येते. संधी मिळाली तापायला घाबरू नका. याने आत्मनिर्भर होता येते. संस्कारासंदर्भात एक उदाहरण देतांना म्हणाल्या एक वडली मरणासन्न पडले होते. त्यांचे मूल अंत्यसंस्काराची तयारी करीत होते. एक व्यक्ती म्हणाला पार्थिव रथावर बँड वाज्यासोबत जाईल. दुसरा म्हणाला एवढा खर्च करण्याची गरज नाही. नगर परिषदेचे वाहन बोलावू, तिसरा म्हणाला हातठेल्यावर पार्थिेव नेऊ. ते वाक्य त्या वडीलाने ऐकल्यावर ते म्हणाले तुम्ही काहीही करू नका मीच स्वत: मोक्षधामात स्वत:हून जाईल ही संस्काराची गोष्ट आहे.ज्यांना जसे संस्सकार मिळतील त्यांच्यावर तसा प्रभाव पडेल. यावेळी घनश्यामदास मसानी, संजयसिंह मसानी, मधू अग्रवाल, राजू वालिया, सुनील केलंका, बाबू गुप्ता, ललीत शर्मा यांनीे महाआरतीत भाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)
सद्विचारांचे शिक्षण देणे संतांचे काम
By admin | Updated: November 6, 2016 00:59 IST