शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

सत्तारुढ सरकार ओबीसीविरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 21:02 IST

राज्यातील सत्तारुढ सरकार ओबीसींच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. अन्यायकारक अटी लागू करुन ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे.

ठळक मुद्देईश्वर बाळबुद्धे : राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील सत्तारुढ सरकार ओबीसींच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. अन्यायकारक अटी लागू करुन ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. ज्या ओबीसी समाजाच्या मतांवर हे सरकार निवडून आले त्याच ओबीसींचा आता सरकारला विसर पडला असून सत्तारुढ सरकार ओबीसी विरोधी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलेचे प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुध्दे यांनी केला.तसेच यासर्व समस्यांना घेवून मोठे आंदोलन उभारणार असल्याचे असल्याचे शनिवारी (दि.१७) येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.पत्रकार परिषदेला माजी आमदार दिलीप बन्सोड, रॉका जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर दोनोडे, प्रदेश महासचिव उमेंद्र भेलावे, दुर्गा तिराले, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष केतन तुरकर, युवक तालुका अध्यक्ष जितेश टेंभरे, अशोक शहारे, कुंदन कटारे उपस्थित होते.बाळबुद्धे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी सेलच्या वतीने राज्यस्तरीय जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. १९ डिसेंबर ते १४ एप्रिलपर्यंत हे अभियान चालेल. १४ एप्रिल रोजी बारामती येथे जनजागृती अभियानाचा समारोप होईल.यानंतर ओबीसींच्या समस्यांना घेवून मोठे आंदोलन करण्यात येईल. सतारुढ सरकार ओबीसी विरोधी आहे. सरकार ओबीसींच्या मतांवर निवडून आले. मात्र सत्तेवर येताच सरकारला ओबीसींचा विसर पडला असल्याचा आरोप बाळबुध्दे यांनी केला.ओबीसींची शिष्यवृत्ती ५०० कोटींवरून केवळ ५४ कोटींवर आणल्याचा जाब सरकारला विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकाºयांच्या नावे निवेदनओबीसी जनजागृती अभियानाच्या निमित्ताने गोंदियात आल्यावर त्यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेवून विविध मागण्याचे निवेदन दिले.निवेदनातून ओबीसी आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह तयार करण्यात यावे, ओबीसींसाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्यात यावी. क्रिमिलेयरचा नियम रद्द करावा,स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करण्यात याव्या आदी मागण्यांच समावेश होता.