शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

बालकांच्या रस्त्यावर केरकचऱ्याचे ढीग

By admin | Updated: March 31, 2017 01:33 IST

येरंडी येथील अंगणवाडी केंद्र २ मध्ये पाण्याची अडचण होती. ती आता दूर झाली आहे.

कधी सुटणार समस्या? : येरंडीत अंगणवाडीला मिळाले बोअरवेलबाराभाटी : येरंडी येथील अंगणवाडी केंद्र २ मध्ये पाण्याची अडचण होती. ती आता दूर झाली आहे. नुकतीच बोअरवेल मिळाल्यामुळे कर्मचारी व शिकणारे बालके आनंदी झाले आहेत. मात्र ज्या मार्गाने बालके अंगणवाडीत येतात, तो मार्गावर केरकचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अर्जुनी-मोरगाव येथील पंचायत समिती बाल विकास कार्यालय अंतर्गत येणाऱ्या येरंडी येथील अंगणवाडी केंद्र २ मध्ये राज्याचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी माहिती दिली. सन २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षात लोकमत वृत्तपत्राची त्यांनी दखल घेतली आणि २०१७ मार्चला या केंद्राला बोअरवेल मिळाले. सदर अंगणवाडी केंद्राला अनेक समस्यांनी घेरले आहे. आता फक्त पिण्याच्या पाण्याची सोय झाली. परंतु सुरक्षाभिंत नाही. या केंद्रात बालकांना ये-जा करण्यासाठी स्वच्छ रस्ता राहत नाही. रस्त्यावर नागरिक दररोज शौच करतात. गावात एका माणसाने दोनदोनदा शौचालय निधीची उचल केली, तरी असा प्रकार घडत आहे. त्यामुळे बालकांना खूप त्रास होतो. या रस्त्यावर कचऱ्याचे ढिग मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच पावसाळा सुरू झाला की या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवागार कचरा उगवतो. त्यामुळे बालकांना सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते. अंगणवाडीच्या आजूबाजूला खड्डे असल्याने पावसाळ्यात सांडपाणी जमा होतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्यास धोका असतो. अशा अनेक समस्यांनी अंगणवाडी केंद्र-२ ग्रासले आहे. तरी बाल विकास अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. उर्वरित समस्या सुटणार की नाही, हेच कळत नाही. जवळपास दोन वर्षांनी पहिली समस्या सुटली. त्यामुळे पाण्याची सोय झाली. यात ग्रामपंचायत प्रशाननाचे कोणतेच हातभार नाही. समस्या कधीच ग्रामपंचायत प्रशासनाने सोडवल्या नाहीत. त्यामुळे गावचा विकास खुंटला, असे नागरिकांचे मत आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात लोकमतच्या पुढाकाराने येरंडी गावातील जलकुंभाचे पाणी नागरिकांना मिळाले व अंगणवाडी-२ ला बोअरवेल मिळाले. मात्र स्थानिक प्रशासन निद्रावस्थेतच आहे. सदर अंगणवाडी-२ च्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सेविका व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)