शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

बालकांच्या रस्त्यावर केरकचऱ्याचे ढीग

By admin | Updated: March 31, 2017 01:33 IST

येरंडी येथील अंगणवाडी केंद्र २ मध्ये पाण्याची अडचण होती. ती आता दूर झाली आहे.

कधी सुटणार समस्या? : येरंडीत अंगणवाडीला मिळाले बोअरवेलबाराभाटी : येरंडी येथील अंगणवाडी केंद्र २ मध्ये पाण्याची अडचण होती. ती आता दूर झाली आहे. नुकतीच बोअरवेल मिळाल्यामुळे कर्मचारी व शिकणारे बालके आनंदी झाले आहेत. मात्र ज्या मार्गाने बालके अंगणवाडीत येतात, तो मार्गावर केरकचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अर्जुनी-मोरगाव येथील पंचायत समिती बाल विकास कार्यालय अंतर्गत येणाऱ्या येरंडी येथील अंगणवाडी केंद्र २ मध्ये राज्याचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी माहिती दिली. सन २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षात लोकमत वृत्तपत्राची त्यांनी दखल घेतली आणि २०१७ मार्चला या केंद्राला बोअरवेल मिळाले. सदर अंगणवाडी केंद्राला अनेक समस्यांनी घेरले आहे. आता फक्त पिण्याच्या पाण्याची सोय झाली. परंतु सुरक्षाभिंत नाही. या केंद्रात बालकांना ये-जा करण्यासाठी स्वच्छ रस्ता राहत नाही. रस्त्यावर नागरिक दररोज शौच करतात. गावात एका माणसाने दोनदोनदा शौचालय निधीची उचल केली, तरी असा प्रकार घडत आहे. त्यामुळे बालकांना खूप त्रास होतो. या रस्त्यावर कचऱ्याचे ढिग मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच पावसाळा सुरू झाला की या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवागार कचरा उगवतो. त्यामुळे बालकांना सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते. अंगणवाडीच्या आजूबाजूला खड्डे असल्याने पावसाळ्यात सांडपाणी जमा होतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्यास धोका असतो. अशा अनेक समस्यांनी अंगणवाडी केंद्र-२ ग्रासले आहे. तरी बाल विकास अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. उर्वरित समस्या सुटणार की नाही, हेच कळत नाही. जवळपास दोन वर्षांनी पहिली समस्या सुटली. त्यामुळे पाण्याची सोय झाली. यात ग्रामपंचायत प्रशाननाचे कोणतेच हातभार नाही. समस्या कधीच ग्रामपंचायत प्रशासनाने सोडवल्या नाहीत. त्यामुळे गावचा विकास खुंटला, असे नागरिकांचे मत आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात लोकमतच्या पुढाकाराने येरंडी गावातील जलकुंभाचे पाणी नागरिकांना मिळाले व अंगणवाडी-२ ला बोअरवेल मिळाले. मात्र स्थानिक प्रशासन निद्रावस्थेतच आहे. सदर अंगणवाडी-२ च्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सेविका व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)