शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

दुकानदारांना आरटीपीसीआर बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST

गोरेगाव : प्रशासनाने टाळेबंदी काळात नवनवे नियम लागू केल्याने मोठ्या व्यापाऱ्यांसह लघू उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे. यातच ...

गोरेगाव : प्रशासनाने टाळेबंदी काळात नवनवे नियम लागू केल्याने मोठ्या व्यापाऱ्यांसह लघू उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे. यातच आता पुन्हा भर पडली असून, आरटीपीसीआर चाचणी करणे दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे, अन्यथा दुकानाला कुलूप ठोकण्याचा इशारा नगरपंचायतने दिला आहे.

टाळेबंदीच्या नियमानुसार व्यापाऱ्यांना ४ तास दुकान उघडावे लागते. त्यातच प्रशासनाचे नवनवे नियम पुढे येत असल्याने व्यापाऱ्यांकरिता एकापुढे एक समस्या निर्माण होत आहे. एकीकडे व्यापार करता येत नाही, तर दुसरीकडे प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास रोजगार जाण्याची भीती या व्यावसायिकांना भेडसावत आहे. या नियमात फेरबदल करून सवलत देण्याची गरज आहे. सर्व व्यावसायिक ठरावीक दिवशी वेळेत आरटीपीसीआर चाचणी करू शकणार नाहीत. त्यातच ४ तास दुकान उघडावे लागत असल्याने, व्यापार व ग्राहकांना वस्तूंची विक्री व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. प्रशासनाने दुकानदारांना नोटीस बजावल्याने शारीरिक त्रासाबरोबर मानसिक ताण निर्माण झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यात सवलत देण्यात आल्यास व्यापाऱ्यांना दिलासा मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान बंद करण्याचा इशारा निरर्थक आहे, पण नियमानुसार पालन करण्याची तयारी व्यावसायिकांनी दाखविली आहे.

प्रशासनाने आवश्यक सेवेमध्ये दवाखाने व मेडिकल स्टोअर्स यांना सवलत दिली आहे, परंतु इतरांना सवलत देण्यात आली नसल्याची खंतही या व्यावसायिकांना आहे. प्रशासनाने प्रत्येक व्यावसायिकांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केल्याने, नगरपंचायतने शनिवारी शहरात सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. यात दुकानदार व दुकानात काम करणाऱ्या कामगारांचीही माहिती विचारली जाणार आहे. शहरातील दुकानदारांना माहितीसाठी शुक्रवारी (ता.२१) नगरपंचायतीने लाउडस्पीकरद्वारे या संदर्भात माहिती दिली. मात्र, प्रत्यक्षात लिखित स्वरूपात पत्र दिले नसल्याचे बोलले जात असून, चाचणीची वेळ निश्चित दिली गेली नाही. त्यामुळे नियमानुसार सकाळी दुकान उघडावे की नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.