शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सिहोराकरांवर २० लाखांची थकबाकी

By admin | Updated: March 27, 2015 00:39 IST

तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दहा हजार लोकवस्तीच्या सिहोरा गावात नागरिकांवर २० लाखांची थकबाकी आहे.

चुल्हाड (सिहोरा) : तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दहा हजार लोकवस्तीच्या सिहोरा गावात नागरिकांवर २० लाखांची थकबाकी आहे. थकबाकीचा आकडा फुगत असल्याने गावातील विकास कामे प्रभावित होत आहेत. यामुळे ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सिहोरा गावात शासकीय अनुदान तथा योजनांचा निधी गावाच्या विकासाला तारणहार ठरला आहे. यामुळे गावात अनेक सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले आहे. परंतु या पलिकडे अन्य विकास कामे प्रभावित झाली आहेत. गावात नाविण्यपूर्ण विकास कामांना थकबाकीची अडचण समोर येत असल्याचे दिसून येत आहे. या गावात घरकरांचे नागरिकांवर १३ लाख ७५ हजार ५७५ रुपयांची थकबाकी असून डोकेदुखी ठरणारी आहे. एकूण १८ लाख ७६ हजार ९२५ रुपयाची थकबाकी असताना फक्त ५ लाख ६५ हजार ५६५ रुपयाची वसुली झाली आहे. या थकबाकीत बडे आसामी असल्याची माहिती मिळाली आहे. थकीत कराची वसूली करताना जप्तीची कारवाई होत नसल्याने थकबाकीचा आकडा वाढता आहे. सार्वजनिक दिवाबत्तीचे ४२ हजार ८१५ रुपये थकीत असल्याने ही दिवाबत्ती अडचणीत आली आहे. गावागावात थकीत कर विज बिलांचे देयक धारकांवर कनेक्शन कपातीचा दांडा महावितरण उगारला आहे. हीच भीती सार्वजनिक दिवाबत्तीला आडकाठी ठरणार आहे. या गावात उपकराची थकबाकी नाकी नऊ आणणारी आहे. ४३ हजार १०५ रुपयाची थकबाकी थक्क करणारी आहे. तर धंदा कर ५४९ रुपयाची थकबाकी आहे. धंदाकरांच्या वसुलीत प्रामाणिकपणा दिसून येत आहे. परंतु जीवन असणाऱ्या पाणी संदर्भात मोठी कंजुशी कर वसुलीत दिसून येत आहे. या गावात पाणी पुरवठा योजनेत सामान्य आणि खास अशी विभागणी करण्यात आली आहे. सामान्य पाणीपट्टी कराची वसुली झाली आहे. यात १ लाख २८ हजार ५४५ रुपयाची थकबाकी दिव्याखाली अंधार असा संदेश देत आहे.खास पाणी पुरवठा नळ योजनेची वसुली १ लाख २४ हजार ४४० रुपये झाली आहे. ३ लाख ५१० रुपयाची थकबाकी चिंता वाढविणारी आहे. वाढत्या थकबाकीने शुद्ध पाणीच दुषित होण्याची चिन्हे आहेत. पोाणी पट्टी आणि नळ योजनेची एकुण थकबाकी ४ लाख २९ हजार ५५ रुपये आहे. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही थकबाकीची वसुली महत्वपूर्ण ठरणारी आहे. गावात विविध कराची एकूण थकबाकी १८ लाख २६ हजार ८८४ रुपये आहे. ही थकबाकीची वसुली गावाच्या विकासात रामबाण ठरणार आहे. परंतु थकबाकी आजवर शुन्यावर आली नाही .गावाच्या विकासात गावकऱ्यांची महत्वाची भूमिका आहे. वाढती थकबाकी तथा टक्केवारी पूर्ण करण्यात येत नसल्याने शासन अनुदान वाटपात कात्री लावत आहे. अशा गावांना अनुदान राशी वाटपात ठेंगा दाखवत आहे. यामुळे गावात विकास कामे प्रभावित ठरत आहेत.याउलट गावात विकास कामे होत नसताना ग्रामपंचायतीला धारेवर धरण्यात येत आहे. अन्य गावातही हीच अवस्था आहे. गावाच्या विकासात गावकऱ्यांची सहकार्याची गरज आहे. (वार्ताहर)