शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

सिहोराकरांवर २० लाखांची थकबाकी

By admin | Updated: March 27, 2015 00:39 IST

तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दहा हजार लोकवस्तीच्या सिहोरा गावात नागरिकांवर २० लाखांची थकबाकी आहे.

चुल्हाड (सिहोरा) : तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दहा हजार लोकवस्तीच्या सिहोरा गावात नागरिकांवर २० लाखांची थकबाकी आहे. थकबाकीचा आकडा फुगत असल्याने गावातील विकास कामे प्रभावित होत आहेत. यामुळे ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सिहोरा गावात शासकीय अनुदान तथा योजनांचा निधी गावाच्या विकासाला तारणहार ठरला आहे. यामुळे गावात अनेक सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले आहे. परंतु या पलिकडे अन्य विकास कामे प्रभावित झाली आहेत. गावात नाविण्यपूर्ण विकास कामांना थकबाकीची अडचण समोर येत असल्याचे दिसून येत आहे. या गावात घरकरांचे नागरिकांवर १३ लाख ७५ हजार ५७५ रुपयांची थकबाकी असून डोकेदुखी ठरणारी आहे. एकूण १८ लाख ७६ हजार ९२५ रुपयाची थकबाकी असताना फक्त ५ लाख ६५ हजार ५६५ रुपयाची वसुली झाली आहे. या थकबाकीत बडे आसामी असल्याची माहिती मिळाली आहे. थकीत कराची वसूली करताना जप्तीची कारवाई होत नसल्याने थकबाकीचा आकडा वाढता आहे. सार्वजनिक दिवाबत्तीचे ४२ हजार ८१५ रुपये थकीत असल्याने ही दिवाबत्ती अडचणीत आली आहे. गावागावात थकीत कर विज बिलांचे देयक धारकांवर कनेक्शन कपातीचा दांडा महावितरण उगारला आहे. हीच भीती सार्वजनिक दिवाबत्तीला आडकाठी ठरणार आहे. या गावात उपकराची थकबाकी नाकी नऊ आणणारी आहे. ४३ हजार १०५ रुपयाची थकबाकी थक्क करणारी आहे. तर धंदा कर ५४९ रुपयाची थकबाकी आहे. धंदाकरांच्या वसुलीत प्रामाणिकपणा दिसून येत आहे. परंतु जीवन असणाऱ्या पाणी संदर्भात मोठी कंजुशी कर वसुलीत दिसून येत आहे. या गावात पाणी पुरवठा योजनेत सामान्य आणि खास अशी विभागणी करण्यात आली आहे. सामान्य पाणीपट्टी कराची वसुली झाली आहे. यात १ लाख २८ हजार ५४५ रुपयाची थकबाकी दिव्याखाली अंधार असा संदेश देत आहे.खास पाणी पुरवठा नळ योजनेची वसुली १ लाख २४ हजार ४४० रुपये झाली आहे. ३ लाख ५१० रुपयाची थकबाकी चिंता वाढविणारी आहे. वाढत्या थकबाकीने शुद्ध पाणीच दुषित होण्याची चिन्हे आहेत. पोाणी पट्टी आणि नळ योजनेची एकुण थकबाकी ४ लाख २९ हजार ५५ रुपये आहे. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही थकबाकीची वसुली महत्वपूर्ण ठरणारी आहे. गावात विविध कराची एकूण थकबाकी १८ लाख २६ हजार ८८४ रुपये आहे. ही थकबाकीची वसुली गावाच्या विकासात रामबाण ठरणार आहे. परंतु थकबाकी आजवर शुन्यावर आली नाही .गावाच्या विकासात गावकऱ्यांची महत्वाची भूमिका आहे. वाढती थकबाकी तथा टक्केवारी पूर्ण करण्यात येत नसल्याने शासन अनुदान वाटपात कात्री लावत आहे. अशा गावांना अनुदान राशी वाटपात ठेंगा दाखवत आहे. यामुळे गावात विकास कामे प्रभावित ठरत आहेत.याउलट गावात विकास कामे होत नसताना ग्रामपंचायतीला धारेवर धरण्यात येत आहे. अन्य गावातही हीच अवस्था आहे. गावाच्या विकासात गावकऱ्यांची सहकार्याची गरज आहे. (वार्ताहर)