शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
2
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
3
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
4
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
5
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
6
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
7
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
8
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
9
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
10
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
11
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
12
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
13
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
14
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
15
"ब्लड टेस्ट करायला गेल्यावर १० मिनिटांनी.."; अंशुमन विचारेच्या पत्नीने सांगितला धक्कादायक अनुभव, काय घडलं?
16
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
17
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
18
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
19
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
20
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली

सिहोराकरांवर २० लाखांची थकबाकी

By admin | Updated: March 27, 2015 00:39 IST

तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दहा हजार लोकवस्तीच्या सिहोरा गावात नागरिकांवर २० लाखांची थकबाकी आहे.

चुल्हाड (सिहोरा) : तुमसर बपेरा राज्य मार्गावरील दहा हजार लोकवस्तीच्या सिहोरा गावात नागरिकांवर २० लाखांची थकबाकी आहे. थकबाकीचा आकडा फुगत असल्याने गावातील विकास कामे प्रभावित होत आहेत. यामुळे ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ४७ गावांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या सिहोरा गावात शासकीय अनुदान तथा योजनांचा निधी गावाच्या विकासाला तारणहार ठरला आहे. यामुळे गावात अनेक सिमेंट रस्त्याचे बांधकाम झाले आहे. परंतु या पलिकडे अन्य विकास कामे प्रभावित झाली आहेत. गावात नाविण्यपूर्ण विकास कामांना थकबाकीची अडचण समोर येत असल्याचे दिसून येत आहे. या गावात घरकरांचे नागरिकांवर १३ लाख ७५ हजार ५७५ रुपयांची थकबाकी असून डोकेदुखी ठरणारी आहे. एकूण १८ लाख ७६ हजार ९२५ रुपयाची थकबाकी असताना फक्त ५ लाख ६५ हजार ५६५ रुपयाची वसुली झाली आहे. या थकबाकीत बडे आसामी असल्याची माहिती मिळाली आहे. थकीत कराची वसूली करताना जप्तीची कारवाई होत नसल्याने थकबाकीचा आकडा वाढता आहे. सार्वजनिक दिवाबत्तीचे ४२ हजार ८१५ रुपये थकीत असल्याने ही दिवाबत्ती अडचणीत आली आहे. गावागावात थकीत कर विज बिलांचे देयक धारकांवर कनेक्शन कपातीचा दांडा महावितरण उगारला आहे. हीच भीती सार्वजनिक दिवाबत्तीला आडकाठी ठरणार आहे. या गावात उपकराची थकबाकी नाकी नऊ आणणारी आहे. ४३ हजार १०५ रुपयाची थकबाकी थक्क करणारी आहे. तर धंदा कर ५४९ रुपयाची थकबाकी आहे. धंदाकरांच्या वसुलीत प्रामाणिकपणा दिसून येत आहे. परंतु जीवन असणाऱ्या पाणी संदर्भात मोठी कंजुशी कर वसुलीत दिसून येत आहे. या गावात पाणी पुरवठा योजनेत सामान्य आणि खास अशी विभागणी करण्यात आली आहे. सामान्य पाणीपट्टी कराची वसुली झाली आहे. यात १ लाख २८ हजार ५४५ रुपयाची थकबाकी दिव्याखाली अंधार असा संदेश देत आहे.खास पाणी पुरवठा नळ योजनेची वसुली १ लाख २४ हजार ४४० रुपये झाली आहे. ३ लाख ५१० रुपयाची थकबाकी चिंता वाढविणारी आहे. वाढत्या थकबाकीने शुद्ध पाणीच दुषित होण्याची चिन्हे आहेत. पोाणी पट्टी आणि नळ योजनेची एकुण थकबाकी ४ लाख २९ हजार ५५ रुपये आहे. वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ही थकबाकीची वसुली महत्वपूर्ण ठरणारी आहे. गावात विविध कराची एकूण थकबाकी १८ लाख २६ हजार ८८४ रुपये आहे. ही थकबाकीची वसुली गावाच्या विकासात रामबाण ठरणार आहे. परंतु थकबाकी आजवर शुन्यावर आली नाही .गावाच्या विकासात गावकऱ्यांची महत्वाची भूमिका आहे. वाढती थकबाकी तथा टक्केवारी पूर्ण करण्यात येत नसल्याने शासन अनुदान वाटपात कात्री लावत आहे. अशा गावांना अनुदान राशी वाटपात ठेंगा दाखवत आहे. यामुळे गावात विकास कामे प्रभावित ठरत आहेत.याउलट गावात विकास कामे होत नसताना ग्रामपंचायतीला धारेवर धरण्यात येत आहे. अन्य गावातही हीच अवस्था आहे. गावाच्या विकासात गावकऱ्यांची सहकार्याची गरज आहे. (वार्ताहर)