शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
3
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
4
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
5
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
6
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
7
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
8
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
9
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
10
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
11
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
12
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
13
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
14
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
15
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
16
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
17
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
18
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
19
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
20
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला

वाहतूक नियम तोडणाऱ्यांचे १.२८ लाख रूपये वर्षभरापासून थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 05:00 IST

वाहतूक अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियम तोडणाऱ्यांवर विविध कलमांतर्गत कारवाया केल्या जात असून, यात अधिकांश प्रकरणांत दंडात्मक कारवाया केल्या जातात. जिल्ह्यात त्यानुसार, वाहतूक नियंत्रण शाखेने सन २०२१ मध्ये विविध प्रकारांत १३२०० दंडात्मक कारवाया केल्या आहेत. 

ठळक मुद्देसन २०२१ मध्ये ठोठावला २९ लाखांचा दंड : २८ लाखांचा दंड झाला वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे असून, नियम तोडल्यास त्याचे परिणाम कधी-कधी अंगलट येतात. मात्र, याही पेक्षा दु:खाची बाब म्हणजे एखाद्या बेजबाबदार व्यक्तीच्या चुकीची शिक्षा निरपराध व्यक्तीला भोगावी लागते. वाहतूक अपघातांतील बहुतांश प्रकरणांतील हीच स्थिती असते. यामुळेच वाहतूक अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेला नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार वाहतूक नियंत्रण शाखेकडून नियम तोडणाऱ्यांवर विविध कलमांतर्गत कारवाया केल्या जात असून, यात अधिकांश प्रकरणांत दंडात्मक कारवाया केल्या जातात. जिल्ह्यात त्यानुसार, वाहतूक नियंत्रण शाखेने सन २०२१ मध्ये विविध प्रकारांत १३२०० दंडात्मक कारवाया केल्या आहेत. यातील १२६७५ कारवायांतील २७ लाख ५६ हजार ०५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर ५२५ कारवायांतील एक लाख २८ हजार १०० रुपयांचा दंड अद्यापही संबंधितांवर थकून आहे. 

परवाना नसलेल्यांवरच सर्वाधिक कारवाया - सध्या विद्यार्थ्यांच्या सकाळपासूनच ट्यूशन क्लासेस सुरू होत असून, त्यांना दिवसभर धावपळ करावी लागते. अशात  पालक आपल्या पाल्यांच्या सोयीसाठी वाहन खरेदी करून त्यांना देत आहेत. मात्र, हे करताना त्यांचा परवाना आहे की नाही याकडे लक्ष देत नाहीत.- सध्या विद्यार्थ्यांच्या सकाळपासूनच ट्यूशन क्लासेस सुरू होत असून, त्यांना दिवसभर धावपळ करावी लागते. अशात  पालक आपल्या पाल्यांच्या सोयीसाठी वाहन खरेदी करून त्यांना देत आहेत. मात्र, हे करताना त्यांचा परवाना आहे की नाही याकडे लक्ष देत नाहीत.- परवाना नसल्यास वाहतूक पोलिसांकडून जास्तीत जास्त १०० रुपयांचे चलन होत असल्याचा समज आजही कित्येक नागरिकांत आहे. त्यामुळे परवाना काढण्याची भानगड पाळण्यापेक्षा १०० रुपये दिलेले बरे अशा तोऱ्यात ते वागतात.

लवकर दंड न भरल्यास...- वाहतूक नियंत्रण शाखेने एखाद्या वाहनावर कारवाई केल्यानंतर त्याने दंडाची रक्कम कित्येक दिवस भरली नसली तरीही त्यावर व्याज लावता येत नही. आहे ती रक्कमच नियमानुसार घ्यावी लागते.- एखाद्या व्यक्तीने दंडात्मक कारवाई झाल्यावर पैसे न भरल्यास वाहतूक नियंत्रण शाखा दंडाची रक्कम वाढवू शकत नाही. यामुळेही कित्येकांकडून दंड थकविला जातो.- मात्र, दंडाची रक्कम थकवून असलेली व्यक्ती दुसऱ्यांदा वाहतूक पोलिसांच्या हाती लागल्यास त्याची माहिती मशीनद्वारे उपलब्ध होते व अशात वाहन जप्त केले जाते. जुनी रक्कम वसूल झाल्यावर ते वाहन सोडले जाते.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस