शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
2
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
3
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
4
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
5
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
6
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
7
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
8
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   
9
IPL 2025 : ईडन गार्डन्सनंतर आता जयपूर स्टेडियमवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी
10
Video - अतिथी देवो भव! रिक्षा चालकाच्या कृतीने जिंकलं परदेशी महिलेचं मन, असं काय घडलं?
11
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
12
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विमानतळावरील 90 उड्डाणे रद्द, जाणून घ्या डिटेल्स..
13
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानची क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट, जम्मूपासून जैसलमेरपर्यंत मोठ्या घडामोडी
14
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
15
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
16
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
17
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
18
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
19
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
20
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS

पावसाअभावी रोवण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 01:47 IST

मागील पंधरा दिवसांपासून परिसरात पाऊस न झाल्याने रोवण्या खोळंबल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी देखील संपल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपावसाने मारली दडी : शेतातील कामे अर्धवटच

लोकमत न्यूज नेटवर्कमुंडीकोटा : मागील पंधरा दिवसांपासून परिसरात पाऊस न झाल्याने रोवण्या खोळंबल्या आहेत. पावसाने दडी मारल्याने शेतातील पाणी देखील संपल्याचे चित्र आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात रोवणीची कामे अर्धवटच आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत.यंदा पावसाने सुरूवातीपासूनच हुलकावणी दिली. त्यामुळे पेरणीची कामे उशीरा झाली. पेरणीनुसार रोवणीची कामे जुलै अखेर संपणे अपेक्षित होते. परंतु आॅगस्ट महिना सुरू होऊनही रोवणीची कामे आटोपली नाहीत. अनेक शेतकºयांच्या रोवण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्याच्या शेवटी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकºयांनी सर्व पिकांच्या पेरणी करीत भात रोवणीसाठी पºहे सुद्धा टाकले होते. त्यानुसार नर्सरीला एक ते सव्वा महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. सामान्यत: २० ते २५ दिवसांची नर्सरी रोवणीसाठी उत्तम मानली जाते. उशीरा रोवणी केल्यास त्याचा उत्पादनावर परिणाम होतो. सध्या वरथेंबी पावसावर शेतकरी अवलंबून आहेत. शेतात पाणी नसल्याने शेतकºयांनी रोवणीची कामे अर्ध्यावर आहेत.जिल्ह्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. ज्या शेतकºयांकडे सिंचनाची सोय आहे त्यांचे पीक समाधानकारक दिसत आहे. परंतु ज्या शेतकºयांनी कशीबशी रोवणी पूर्ण केली, ते पºहे मरत आहेत. रोपवाटिका वाळत असल्याचे चित्र आहे.उत्पादन होणार निम्म्यापेक्षा कमी१५ आॅगस्टपर्यंत हलक्या धानाची मुदत असते. मात्र १५ आॅगस्टनंतर केलेल्या रोवणीचा लाभ शेतकºयांना मिळणार नाही. त्यामुळे पुढे पाऊस आला तरी धानाचे उत्पादन निम्म्यापेक्षा कमी येईल, अशी शंका शेतकºयांंनी व्यक्त केली आहे. धान शेतात लावून अनेक शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. पण पावसाचा पत्ताच नाहीत. जो दिवस उगवतो तो सारखाच असतो. त्यामुळे या वेळी शेतकºयांचे बेहाल होत असल्याचे चित्र ग्रामीण भागात आहे. शेतकरी आसमानी संकटात सापडला आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे.नदी-नाले कोरडेचपावसाळा कोरडाच जात आहे. पावसाचे तीन ते चार नक्षत्र लोटूनही मुंडीकोटा परिसरात नदी, नाले कोरडे पडले आहेत. त्यामुळे पंप धारकांनी पावसाची वाट न बघता पºहे लावले व रोवणीलाही सुरुवात केली. मात्र वरथेंबी पावसावर अवलंबून असलेला शेतकरी पावसाची वाट पहात आहे. अनेक शेतकºयांचे लावलेले बियाणे वाया गेले. दुसरीकडे पंपधारकांनी जोमात पेरणीला सुरुवात केली. मात्र समाधानकारक पाऊस न पडल्याने विहीर, बोअरवेल, नदी, नाले कोरडे आहेत. कशीतरी पेरणी केली, परंतु रोवणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी निराश होत आहे. मात्र पावसावर अवलंबून असलेले शेतकरी मात्र चिंतेमध्ये आहेत. या परिसरात बहुतांश रोवण्या खोळंबल्या आहेत. अनेक शेतकºयांच्या पºहांना ४० ते ५० दिवसांचा कालावधी झाला आहे. त्यामुळे ते रोवण्यायोग्य नाही. रोपे वाळत चालले असून जमिनीला भेगा पडत आहेत. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.