शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
4
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
5
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
6
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
7
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
8
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
9
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
10
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
11
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
12
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
13
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
14
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
15
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
16
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
17
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
18
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
19
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
20
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

जिल्ह्यात रोहयोच्या कामांचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: June 16, 2014 23:35 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे

गोंदिया : रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे या योजनेंतर्गत रोजगारांना कामच मिळत नसल्याने ही योजना आता फक्त नावापुरतीच शिल्लक राहली असल्याची प्रतिक्रिया मजूर वर्गामधून उमटत आहे. जिल्ह्यात दरवर्षी या योजनेंतर्गत विविध कामे आहे. मात्र या कामांवर एकही मजूर काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधीची कामे करण्यात येतात. मात्र हे काम करताना किती लोकांना कामे मिळतात हा संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात या योजनेंतर्गत पंचायत समितीस्तरावर कामे करण्यात येत आहेत. यामध्ये रस्ते, सरकारी जमिनीमध्ये वृक्षारोपण, बांध, ग्राम पंचायत रोपवाटिकासह अनेक कामांचा समावेश आहे. मात्र ही सर्व कामे केवळ कागदोपत्रीच सुरू आहेत. या योजनांतर्गत काम करणाऱ्या मजूरांना वेळेवर मजूरी मिळत नसल्यान एकदा काम करणारा मजूर पुन्हा काम करण्यास धजावत नाही. परिणामी या योजनेंतर्गत काम करणारे कंत्राटदार हे यंत्राच्या सहाय्याने काम करीत आहेत. यामुळे अधिकारी व पदाधिकारीच संगनमताने या योजनेचा बट्याबोळ करीत आहेत. तालुकास्तरावर या योजनांतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, त्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी या योजनेंतर्गत तालुक्यात अनेक कामे करण्यात येत असले तरी या योजनांतर्गत विहीरींचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्यापासून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना रसद पुरविता पुरविता शेतकऱ्यांकडे फक्त ४० ते ५० टक्के रक्कम शिल्लक राहते. तर या अधिकारी पदाधिकाऱ्यांना रसद पुरविली नाही. तर त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करीत त्यांना लाभ दिल्या जात नाही. जवळपास ७० टक्केच्यावर को कागदोपत्रीच करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमुळे रोजगारांना काम मिळण्याऐवजी या योजनेतून अधिकारी व पदाधिकारीच मालामाल होत असल्याचे जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. आजमितीला जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे जवळपास ८० टक्के बंद आहेत. गोरगरीबांना कामाची आवश्यकता असताना जिल्ह्यात या योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे बंद असल्याने जिल्ह्यातील युवक वर्ग कामाच्या शोधात शहरच्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाला त्वरीत प्रारंभ करण्याची मागणी जिल्ह्यातील मजूरांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)