शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

जिल्ह्यात रोहयोच्या कामांचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: June 16, 2014 23:35 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे

गोंदिया : रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे या योजनेंतर्गत रोजगारांना कामच मिळत नसल्याने ही योजना आता फक्त नावापुरतीच शिल्लक राहली असल्याची प्रतिक्रिया मजूर वर्गामधून उमटत आहे. जिल्ह्यात दरवर्षी या योजनेंतर्गत विविध कामे आहे. मात्र या कामांवर एकही मजूर काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधीची कामे करण्यात येतात. मात्र हे काम करताना किती लोकांना कामे मिळतात हा संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात या योजनेंतर्गत पंचायत समितीस्तरावर कामे करण्यात येत आहेत. यामध्ये रस्ते, सरकारी जमिनीमध्ये वृक्षारोपण, बांध, ग्राम पंचायत रोपवाटिकासह अनेक कामांचा समावेश आहे. मात्र ही सर्व कामे केवळ कागदोपत्रीच सुरू आहेत. या योजनांतर्गत काम करणाऱ्या मजूरांना वेळेवर मजूरी मिळत नसल्यान एकदा काम करणारा मजूर पुन्हा काम करण्यास धजावत नाही. परिणामी या योजनेंतर्गत काम करणारे कंत्राटदार हे यंत्राच्या सहाय्याने काम करीत आहेत. यामुळे अधिकारी व पदाधिकारीच संगनमताने या योजनेचा बट्याबोळ करीत आहेत. तालुकास्तरावर या योजनांतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, त्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी या योजनेंतर्गत तालुक्यात अनेक कामे करण्यात येत असले तरी या योजनांतर्गत विहीरींचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्यापासून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना रसद पुरविता पुरविता शेतकऱ्यांकडे फक्त ४० ते ५० टक्के रक्कम शिल्लक राहते. तर या अधिकारी पदाधिकाऱ्यांना रसद पुरविली नाही. तर त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करीत त्यांना लाभ दिल्या जात नाही. जवळपास ७० टक्केच्यावर को कागदोपत्रीच करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमुळे रोजगारांना काम मिळण्याऐवजी या योजनेतून अधिकारी व पदाधिकारीच मालामाल होत असल्याचे जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. आजमितीला जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे जवळपास ८० टक्के बंद आहेत. गोरगरीबांना कामाची आवश्यकता असताना जिल्ह्यात या योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे बंद असल्याने जिल्ह्यातील युवक वर्ग कामाच्या शोधात शहरच्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाला त्वरीत प्रारंभ करण्याची मागणी जिल्ह्यातील मजूरांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)