शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात रोहयोच्या कामांचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: June 16, 2014 23:35 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे

गोंदिया : रोजगार हमी योजनेंतर्गत रोजगारांना हक्काचे काम व काम नसेल तर ठराविक काळात मजूरी देण्याची तरतूद आहे. मात्र ही योजना राबविण्यास जिल्ह्यातील अधिकारी व पदाधिकारी उदासीन असल्यामुळे या योजनेंतर्गत रोजगारांना कामच मिळत नसल्याने ही योजना आता फक्त नावापुरतीच शिल्लक राहली असल्याची प्रतिक्रिया मजूर वर्गामधून उमटत आहे. जिल्ह्यात दरवर्षी या योजनेंतर्गत विविध कामे आहे. मात्र या कामांवर एकही मजूर काम करीत नसल्याचे दिसून येत आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात दरवर्षी कोट्यवधीची कामे करण्यात येतात. मात्र हे काम करताना किती लोकांना कामे मिळतात हा संशोधनाचा विषय आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात या योजनेंतर्गत पंचायत समितीस्तरावर कामे करण्यात येत आहेत. यामध्ये रस्ते, सरकारी जमिनीमध्ये वृक्षारोपण, बांध, ग्राम पंचायत रोपवाटिकासह अनेक कामांचा समावेश आहे. मात्र ही सर्व कामे केवळ कागदोपत्रीच सुरू आहेत. या योजनांतर्गत काम करणाऱ्या मजूरांना वेळेवर मजूरी मिळत नसल्यान एकदा काम करणारा मजूर पुन्हा काम करण्यास धजावत नाही. परिणामी या योजनेंतर्गत काम करणारे कंत्राटदार हे यंत्राच्या सहाय्याने काम करीत आहेत. यामुळे अधिकारी व पदाधिकारीच संगनमताने या योजनेचा बट्याबोळ करीत आहेत. तालुकास्तरावर या योजनांतर्गत शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, त्याची आर्थिक स्थिती सुधारावी यासाठी विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. दरवर्षी या योजनेंतर्गत तालुक्यात अनेक कामे करण्यात येत असले तरी या योजनांतर्गत विहीरींचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्यापासून अधिकारी व पदाधिकाऱ्यांना रसद पुरविता पुरविता शेतकऱ्यांकडे फक्त ४० ते ५० टक्के रक्कम शिल्लक राहते. तर या अधिकारी पदाधिकाऱ्यांना रसद पुरविली नाही. तर त्यांच्या कामामध्ये अडथळे निर्माण करीत त्यांना लाभ दिल्या जात नाही. जवळपास ७० टक्केच्यावर को कागदोपत्रीच करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांमुळे रोजगारांना काम मिळण्याऐवजी या योजनेतून अधिकारी व पदाधिकारीच मालामाल होत असल्याचे जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. आजमितीला जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे जवळपास ८० टक्के बंद आहेत. गोरगरीबांना कामाची आवश्यकता असताना जिल्ह्यात या योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे बंद असल्याने जिल्ह्यातील युवक वर्ग कामाच्या शोधात शहरच्या ठिकाणी स्थलांतरीत होत आहे. जिल्ह्यात रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाला त्वरीत प्रारंभ करण्याची मागणी जिल्ह्यातील मजूरांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)