शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

By admin | Updated: June 12, 2016 01:37 IST

साखरीटोला-सातगाव-गांधीटोला रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असून सदर बांधकाम बंद करुन कामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी....

गांधीटोला रस्ता : अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराला पाठबळ साखरीटोला : साखरीटोला-सातगाव-गांधीटोला रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असून सदर बांधकाम बंद करुन कामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सातगाव व गावकऱ्यांनी वरिष्ठांकडे निवेदनातून केली आहे.भारत निर्माण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्थेद्वारा साखरीटोला-सातगाव-गांधीटोला ते तिरखेडी रामा ३६३ (आर.टी.१०) रस्ता डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. सदर कामाची लांबी ६ हजार ५४० मी. आहे. सदर कामाची अंदाजपत्रकीय किंमत २५१.६३ लक्ष रुपये असून निविदेची किंमत २०५.६७ लक्ष आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारामार्फत ५ वर्षापर्यंत देखभाल व दुरुस्तीची हमी घेण्यात आली असून काम पूर्ण करण्याची तारीख २४ सप्टेंबर २०१५ ते २३ सप्टेंबर २०२० पर्यंत आहे.सदर बांधकाम गोरेगाव येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला असून सदर मार्गाचे बरेच काम पूर्णत्वाला आले असून बांधकामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यासंबंधी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली. सध्या रस्त्यावर डांबराचा थर देणे सुरु आहे. प्रस्तावित कामाच्या तपशिलानुसार इमलसन कोट (एस.एच.१) २०.७७ में. टन इमलसन कोट (रु) १२.२२ में टन पुर्वीच निधीत कारपेट २० मि.मि. जाड ६६० घन.मी. तर प्रिमीक्स सिलकोट १४७ घन मी. आहे. मात्र प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार काम होत नाही. असे प्रत्यक्ष काम पाहिल्यानंतर लक्षात येते, ग्रा.पं.चे पदाधिकारी, सदस्य व गावकऱ्यांनी प्रत्यक्ष सदर कामाला भेट देऊन निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची माहिती उपअभियंता कापगते यांना दिली. त्यांनी काम पाहिल्यानंतर निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे मान्य केले. तरी कंत्राटदाराला काम सुरु ठेवण्यास परवानगी दिली व गावकऱ्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही असा आरोप ग्रा.पं. तसेच गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सदर बांधकामाची योग्य तपासणी करुन उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी ग्रा.पं.सातगाव व गावकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रकांत पाटील, राज्य परिवहन मंत्री, पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार संजय पुराम, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपअभियंता कापगते यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. प्रधानमंत्र्याच्याच योजनेला डच्चूप्रधानमंत्र्यांच्या नावानेच सुरू असलेल्या सडक योजनेंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्याचेच काम निकृष्ट होत आहे. यातून बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार प्रधानंत्र्यांच्याच योजनेला डच्चू देत असल्याचा हा प्रकार दिसून येत आहे. रस्त्यांचा विकास करणे सोडून रस्त्यांचे थातूरमातूर काम करून आपला विकास साधण्याचे काम अधिकारी व कंत्राटदार करीत असल्याचेही गावकरी बोलत आहेत.