शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

निर्माणाधीन रस्ता देतो अपघातांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST

सडक-अर्जुनी : कोहमारा-नवेगावबांध राज्यमार्ग क्रमांक - २७९ चे काम मागील दोन वर्षांपासून मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गाने ...

सडक-अर्जुनी : कोहमारा-नवेगावबांध राज्यमार्ग क्रमांक - २७९ चे काम मागील दोन वर्षांपासून मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे काम चालू असल्याने अर्धा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा सोडण्यात आला आहे. मात्र, मार्ग अरुंद असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे. या मार्गाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

या रस्ता बांधकामांतर्गत अर्ध्या रस्त्याचे काम सुरू असून, अर्धा रस्ता वाहतुकीसाठी सोडण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. अशात ग्राम चिखली येथे नवेगावबांधकडून कोहमाराकडे येणारी बस व कोहमाराकडून नवेगाव बांधकडे जाणाऱ्या ट्रकची आपसांत धडक झाली. सुदैवाने या अपघातात काही हानी झाली नाही. मात्र, या मार्गावर मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर सिमेंट नाला व मार्गाचे काम चालू आहे. अशात संबंधितांकडून या बांधकामावर पाणी टाकले जात नसल्याची ओरड आहे. रस्त्यांच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. मात्र, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जाते व ते अल्पकाळात जमीनदोस्त होतात. काही महिन्यांपूर्वी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी या मार्गाच्या अभियंता व कंत्राटदाराला समज दिली होती. त्यानंतरही काहीच सुधारणा झाल्याचे दिसत नाही. याच मार्गावरील चिखली गावाजवळ मुख्य मार्गावर खोदकाम केल्यामुळे काही ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. अशात रात्रीला वाहनधारक पडल्याच्या अनेक घटना घडल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य युवराज वालदे यांनी सांगितले. त्यामुळे या मार्गाचे काम लवकर करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.