शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

निर्माणाधीन रस्ता देतो अपघातांना आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:26 IST

सडक-अर्जुनी : कोहमारा-नवेगावबांध राज्यमार्ग क्रमांक - २७९ चे काम मागील दोन वर्षांपासून मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गाने ...

सडक-अर्जुनी : कोहमारा-नवेगावबांध राज्यमार्ग क्रमांक - २७९ चे काम मागील दोन वर्षांपासून मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे काम चालू असल्याने अर्धा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा सोडण्यात आला आहे. मात्र, मार्ग अरुंद असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे. या मार्गाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

या रस्ता बांधकामांतर्गत अर्ध्या रस्त्याचे काम सुरू असून, अर्धा रस्ता वाहतुकीसाठी सोडण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. अशात ग्राम चिखली येथे नवेगावबांधकडून कोहमाराकडे येणारी बस व कोहमाराकडून नवेगाव बांधकडे जाणाऱ्या ट्रकची आपसांत धडक झाली. सुदैवाने या अपघातात काही हानी झाली नाही. मात्र, या मार्गावर मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर सिमेंट नाला व मार्गाचे काम चालू आहे. अशात संबंधितांकडून या बांधकामावर पाणी टाकले जात नसल्याची ओरड आहे. रस्त्यांच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. मात्र, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जाते व ते अल्पकाळात जमीनदोस्त होतात. काही महिन्यांपूर्वी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी या मार्गाच्या अभियंता व कंत्राटदाराला समज दिली होती. त्यानंतरही काहीच सुधारणा झाल्याचे दिसत नाही. याच मार्गावरील चिखली गावाजवळ मुख्य मार्गावर खोदकाम केल्यामुळे काही ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. अशात रात्रीला वाहनधारक पडल्याच्या अनेक घटना घडल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य युवराज वालदे यांनी सांगितले. त्यामुळे या मार्गाचे काम लवकर करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.