शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

तालुका मुख्यालयाचे रस्ते अंधारातच

By admin | Updated: November 18, 2015 01:52 IST

सालेकसा हे तालुका मुख्यालयाचे स्थळ असूनसुध्दा येथील जवळपास सर्वच रस्ते व चौक रात्रभर अंधारात असतात.

वाली कोणीच नाही : प्रशासकांचे दुर्लक्षसालेकसा : सालेकसा हे तालुका मुख्यालयाचे स्थळ असूनसुध्दा येथील जवळपास सर्वच रस्ते व चौक रात्रभर अंधारात असतात. त्यामुळे येथे रात्री बेरात्री ये-जा करणाऱ्या लोकांना त्रास तर होतोच, तसेच नेहमी धोक्याची शक्यता असते. आदिवासी, नक्षलग्रस्त व मागासलेला तालुका म्हणून सालेकसाची सर्वत्र ओळख आहे. या तालुक्यात मागासलेले लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास असून येथे सोमवारला आठवडी बाजार भरत असतो. तो बाजार रात्रीपर्यंत चालतो. त्यामुळे बाजारात येणाऱ्या ग्राहकांना तसेच दुकानदारांना विद्युत खांबावरील दिव्यांचा लाभ मिळत नाही. कारण येथील रस्त्यावरील खांबावर एक तर पथदिवे नाही किंवा काही ठिकाणी आहेत ते बंद पडून आहेत. त्यामुळे रस्त्यावर किंवा चौकात सर्वत्र अंधार पसरेला असतो. सालेकसा हे मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर असून येथे रेल्वे स्टेशनची सोय आहे. या रेल्वेस्टेशनवर सर्व लोकल गाड्या तसेच शालीग्राम एक्सप्रेस आणि छत्तीसगड एक्सप्रेस या गाड्यांचा सुध्दा थांबा आहे. त्यामुळे या रेल्वे स्टेशनवरून २४ तास रेल्वे प्रवाशांचा ये-जा सुरू असते. ते रेल्वे प्रवासी रात्री-बेरात्री सुध्दा ये-जा करतात. परंतु रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्रीला भयमुक्त वातावरण निर्माण होते. रस्त्यावरून चालत असताना काही खासगी दुकानदारान्ांी लावलेले दिवे थोडा दिलासा देणारे ठरतात. सालेकसावरून राज्य महामार्ग क्रमांक २४९ गेला असून हा मार्ग महाराष्ट्राला छत्तीसगड राज्याशी जोडण्याचे काम करतो. तसेच उत्तरेकडे मध्यप्रदेशला जोडतो. त्यामुळे या मार्गावरून २४ तास सतत वाहने चालतात. परंतु तालुक्याचे ठिकाण असताना येथे पथदिवे नसल्याने अनेक अपघात सुध्दा घडतात. हा सर्व प्रकार थांबविण्यासाठी पथदिवे व्यवस्थीत असणे आवश्यक आहे. सध्या नगर पंचायतचे काम थंडबस्त्यात असून प्रशासकांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. (तालुका प्रतिनिधी)