शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

श्रमदानातून केली रस्त्याची दुरूस्ती ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

गोंदिया : ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही त्यांच्याकडून काहीच न झाल्याने अखेर नागरिकांनी श्रमदानातूनच रस्त्याची दुरूस्ती करून स्वत:ची सोय ...

गोंदिया : ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनही त्यांच्याकडून काहीच न झाल्याने अखेर नागरिकांनी श्रमदानातूनच रस्त्याची दुरूस्ती करून स्वत:ची सोय करून घेतली. लगतच्या ग्राम कारंजा येथील समर्थ कॉलनीतला हा प्रकार असून, कॉलनीवासीयांनी कुणाच्याही भरवशावर न राहण्याचा एक संदेशच यातून दिला आहे.

कारंजा येथील राजाभोज समर्थ कॉलनी ही मागील १५ वर्षांपासून वसली आहे. आतापर्यंत या कॉलनीकडे कुणीही लक्ष दिले नाही. परिणामी येथे रस्ते, नाली व पिण्याच्या पाण्याचा अभाव असल्याने कॉलनीवासीयांना खूपच त्रास सहान करावा लागत आहे. पावसाळ्यात सर्वत्र चिखल होत असल्याने कॉलनीवासीयांना घराबाहेर पडणे अवघड होत आहे. कवलेवाडा रोड ते राजाभोज चौक समर्थ कॉलनीत जाण्याकरिता रस्ताच नसून, खड्ड्यांमुळे कॉलनीवासीयांना ये-जा करताना जीव मुठीतच घ्यावा लागतो. कॉलनीवासीयांनी ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींना कित्येकदा रस्ता बांधकामासाठी निवेदन दिले. तरी आतापर्यंत कोणीही कॉलनीकडे ढुंकूनही बघितले नाही. केवळ आश्वासन दिले. अशात कॉलनीवासीयांनी पावसाळा बघता श्रमदानातून रस्त्यावरील ख़ड्ड्यांमध्ये दगड, विटा, रेती व मलमा टाकून खड्डे भरले व रस्ता ये-जा करण्याच्या सोयीचा केला. या श्रमदानात पोलीस हवालदार हॅवींद्र बडोले, मेजर रवींद्र पारधी, राजू शिंदे, शिवकुमार नागपुरे, आनंद पटले यांच्यासह अन्य कॉलनीवासीयांनी सहभाग घेतला.