शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

निमगाव प्रकल्पाचा मार्ग झाला मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 23:48 IST

तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे मागील ४० वर्षांपासून रखडले होते. यात वन विभागाची जमीन येत असल्याने हा प्रकल्प रेंगाळलेला होता. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत होते.

ठळक मुद्देवन विभागाची हिरवी झेंडी : शेतकऱ्यांना सिंचनासाठी होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यातील महत्त्वपूर्ण असलेल्या निमगाव सिंचन प्रकल्पाचे मागील ४० वर्षांपासून रखडले होते. यात वन विभागाची जमीन येत असल्याने हा प्रकल्प रेंगाळलेला होता. परिणामी या परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत होते. दरम्यान आ.विजय रहांगडाले यांनी या प्रकल्पाचा मुद्दा केंद्र आणि राज्य शासनाकडून लावून धरुन या प्रकल्पातील अडचणी दूर करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळाल्याने निमगाव प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.निमगाव प्रकल्प १९७२ ते ते २००६ पर्यंत रखडलेला होता. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी प्रयत्न केले होते. तसेच यासाठी भंडारा-नागपूर-भोपाल येथील कार्यालयात पत्रव्यवहार सुध्दा करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही या प्रकल्पाचे काम पुढे सरकत नव्हते. आ.रहांगडाले यांनी २०१५ पासून या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी कागदपंत्रासह पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वनमंत्री हर्षवर्धन, केंद्रीय वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, महाराष्ट्र वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडे वांरवार पाठपुरावा केला होता. महाराष्ट्र शासनाद्वारे वन विभागाला प्रकल्पाकरिता लागणाऱ्या जमिनीचे एफआरए निधी ३१ कोटी रुपये राज्य मंत्रीमंडळाद्वारे केंद्र शासनाकडे भरण्यात आले. ज्यामध्ये वनविभागाची जमीन व झाडाच्या किंमतीचा सुद्धा समावेश करण्यात आल्या नंतरच राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला. निमगाव प्रकल्प हा नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये असल्यामुळे १० कि.मी.अंतरातील प्रकल्पास वन्यजीव मंडळाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यामध्ये केंद्रीय वन्यजीव मंडळाचे प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरीकरिता चित्रफितीसह संपूर्ण अहवाल सादर करण्याकरिता प्रत्यक्ष राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाचे सचिव श्रीकांत कामडी यांनी आंबे नाल्याची २२ मे २०१९ रोजी पाहणी केली. निमगाव प्रकल्पाचे कार्य ६० टक्के पूर्ण झाले असून तलावाच्या सुरक्षा भिंतीला पिचिंग, वेस्ट वेअर, कालवा निर्मिती व अन्य कार्य पूर्ण झाले आहे. रहांगडाले यांनी १० जून २०१९ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पर्यावरण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांची दिल्ली येथे भेट घेऊन या प्रकल्पाच्या मार्गातील अडचणी दूर केल्या.पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणारबºयाच वर्षांपासून रखडलेला निमगाव सिंचन प्रकल्प मार्गी लागल्यामुळे या तालुक्यातील ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.याचा लाभक्षेत्रातील १८ गावातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शिवाय शेतकºयांना दुष्काळाशी दोन हात करण्यास याची मोठी मदत होणार आहे.वन्यप्राण्यांना पाण्याची सोयनिमगाव प्रकल्प हा बफर झोनमध्ये असल्यामुळे शेतीच्या सिंचनाव्यतिरिक्त नागझिरा वन्यजीव अभयारण्य अंतर्गत असलेल्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. १७ जुलै रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी मिळालेली असून हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी