शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

प्रशासकांच्या काळात रस्त्यांची दुर्दशा

By admin | Updated: July 13, 2015 01:36 IST

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पाणी ठिकठिकाणी तुडंूब भरले आहे.

आमगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात पाणी ठिकठिकाणी तुडंूब भरले आहे. या साचलेल्या पाण्याच्या निकासीसाठी नाल्या नाहीत. जुन्या मोडकळीस आलेल्या नाल्यांची साफसफाई होत नाही. रस्त्यावर घाण पसरली असून तेथूनच नागरिक ये-जा करीत आहेत. प्रशासकांच्या काळात हे चित्र असल्याने सर्वांना आश्चर्य व्यक्त करण्याची पाळी आली आहे. बाजाराच्या दिवशी जडवाहनांकरिता प्रतिबंध आवश्यक आहे. विशेष म्हणजे ही मागील अनेक वर्षांपासूनची मागणी असूनही त्याची पूर्तता झालेली नाही. तसेच दोन जड वाहने समोरासमोर आल्यास बाजारातील अख्खी वाहतूकच तासनतास ठप्प पडते. वाहनांच्या या गर्दीत मग दुुचाकी किंवा सायकलस्वारच काय एखादी पायदळ व्यक्तीही त्यातून मार्ग काढून पुढे जाऊ शकत नाही. एवढी गंभीर अवस्था चारचाकी व जड वाहनांच्या आवागमनातून होत आहे. बाजारातील रस्त्यांवरच पाणी साचले असून भर रस्त्यांवरच पाण्याचे डबके तयार झाले आहेत. त्याच घाणीची भर पडत असून अशा या गलिच्छ वातावरणातून नागरिकांना वावरावे लागत आहे. पाय ठेवण्यास किळस येणार अशी स्थिती असूनही उपाय नसल्याने त्यातूनच लोकांना आपली वाट काढावी लागत आहे. यातही कहर करणारी बाब अशी की, या रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांमुळे खड्ड्यांतील घाण पाणी नागरिकांच्या अंगावर उडून त्यांचे कपडे खराब होत आहे. यातूनच कित्येकदा भांडणाला कळ मिळत आहे. मात्र एवढ्यावरही बाजार समिती प्रशासनाकडून सफाई तर दुरच मात्र खड्यांत साधे मुरुम टाकण्याचेही औचित्य दाखवित नाही. प्रशासकांच्या राजवटीत असलेल्या या अव्यवस्थेमुळे नागरिक मात्र रोष व्यक्त करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)