शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

पूर्णावधी लोटूनही तो रस्ता ब्रम्हचारीच ! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:28 IST

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी-रेंगेपार- शेंडा या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम गेल्या पावणे तीन वर्षांपासून सुरू आहे. निकृष्ट ...

सडक अर्जुनी : सडक अर्जुनी-रेंगेपार- शेंडा या प्रमुख जिल्हा मार्गाचे काम गेल्या पावणे तीन वर्षांपासून सुरू आहे. निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याची जनतेची तक्रार आहे. मात्र एका बड्या राजकारण्याशी संबंधित कंपनीला हे काम असल्याने एकही अधिकारी ढुंकून पाहात नाही. दिलेल्या मुदतीत रस्त्याचे बांधकाम तर पूर्ण झाले नाहीच याउलट पाच कोटींच्या अतिरिक्त बाबीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. स्वतंत्र अधिकारी नेमून या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी माजी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

सडक अर्जुनी पासून १० किमी अंतरावर शेंडा हे गाव आहे. यादरम्यान प्रजिमा क्र. २९ वर सहा किमी रस्ता बांधकामासाठी २८ कोटी ७३ लक्ष ८७ हजार १०२ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक होते. याचा करारनामा २२ कोटी ४ लक्ष ६० हजार ६६५ रुपयांमध्ये नागपूरच्या अताशा आशीर्वाद बिल्डर्स यांना १३ नोव्हेंबर २०१८ रोजी झाला. लगेच दुसऱ्या दिवशी कार्यारंभ आदेश देण्यात आला. रस्ता बांधकाम पूर्ण होण्याची मुदत १३ नोव्हेंबर २०२० ही होती. अगदी कार्यारंभ झाल्यापासूनच हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची जनता व लोकप्रतिनिधींची तक्रार होती. मात्र हे कंत्राट गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या राजकारणाशी संबंधित नागपूरच्या एका बड्या राजकारण्याशी निगडित बांधकाम कंपनीला आहे. यामुळेच कुणीही अधिकारी जनतेच्या तक्रारी व रस्त्याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जुन्या मंजूर अंदाजपत्रकात काँक्रिट रस्त्याची जाडी ४५० मिमी होती. कंत्राटदाराने राजकीय बळाचा वापर करून नावीन्यपूर्ण बाब म्हणून व्हाइट टॉपिंग काँक्रिट या संकल्पनेनुसार २५० मिमी एवढी तयार केली. सदर रस्त्याची जाडी २०० मिमी कमी करून पावसाळ्यात घरात पाणी शिरू नये हे चुकीचे कारण दर्शवून अतिरिक्त बाबीचा प्रस्ताव दाखल केला. या ५ कोटी ८ लक्ष ५९ हजार ९३९ रुपयांच्या अतिरिक्त बाबीच्या प्रस्तावास नागपूरच्या साबां (प्रादेशिक) विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी १९ जानेवारी रोजी मान्यता दिली. विशेष उल्लेखनीय म्हणजे घरात पाणी शिरते अशी कुणाचीही तक्रार नव्हती. कंत्राटदाराने स्वतःच्या आर्थिक लाभासाठी हे केल्याचा आरोप आहे.

...........

५० टक्केही काम पूर्ण नाही

हे बांधकाम सुमारे पावणे तीन वर्षांपासून सुरू आहे. यावर कुठल्याच प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन नाही. हे बांधकाम गोंदियाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र २ यांचे अखत्यारित सुरू आहे. बांधकामाची गुणवत्ता नाही. काम अत्यंत कासव गतीने सुरू आहे. कासवानेही पावणे तीन वर्षांत हा सहा किमीचा प्रवास पूर्ण केला असता मात्र एवढ्या कालावधीत रस्त्याचे अद्याप ५० टक्केही काम पूर्ण होऊ शकले नाही. कंत्राटदाराच्या या कासव गतीचा जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने हा रस्ता पूर्ण झाला नाही तर, जनता आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. राज्य सरकारने चौकशी समिती नेमून या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी परशुरामकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली आहे.

300721\img-20210730-wa0002.jpg

हाच तो अपूर्णअवस्थेत असलेला सडक अर्जुनी-रेंगेपार-शेंडा रस्ता