शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
2
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
3
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
4
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
5
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
6
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
7
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
8
मनाविरुद्ध गोष्टी घडल्या की राग राग होतो? त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या सोप्या टिप्स!
9
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
10
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
11
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
12
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
13
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
14
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
15
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
16
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
17
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
18
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."
19
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
20
चिकनच्या किमतीपेक्षा अंडी झाली महाग, भाज्यांचे दरही गगनाला; बांगलादेशात सगळाच गोंधळ

सडक-अर्जुनी तालुका एमआयडीसीपासून वंचित

By admin | Updated: January 4, 2017 00:55 IST

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमें कॉर्पोरेशन) असणे बंधनकारक आहे.

सौंदड : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमें कॉर्पोरेशन) असणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, देवरी, अर्जुनी-मोरगाव या सर्वच तालुक्यांत एमआयडीसी करिता शासनाने जागा उपलब्ध करुन तेथे काही उद्योगही सुरू आहेत. मात्र सडक-अर्जुनी तालुका मागील २० ते २५ वर्षापासून एमआयडीसीपासून वंचीत आहे. याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. सडक-अर्जुनी तालुक्याची निर्मिती सुमारे २० ते १५ वर्षापुर्वी झाली. मात्र अजूनही या तालुक्याला शासनाने एमआयडीसी करिता जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. आज तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व रेल्वेमार्ग असूनही या तालुक्याला शासनाकडून वंचित ठेवण्यात आले आहे. तालुक्यात २० वर्षापुर्वी एमआयडीसी उभारली गेली असली तर तालुक्यासह जिल्हा तसेच बाहेरील उद्योजकांनाही या जागेचा फायदा झाला असता. शिवाय यातून तालुक्यातील सुशीक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाले असते. मात्र आज या तालुक्यातील बेरोजगार पोटाची खळगी भरण्याकरिता घरदार सोडून बाहेरगावी धाव घेत आहेत. तर कित्येकांना काम मिळत नसल्याने निराश होऊन घरी परतावे लागते. करिता संबंधित अधिकाऱ्यांनी सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये एमआयडीसी करिता जागा उपलब्ध करुन दयावी व तेथे काही उद्योग सुरू करण्याची गरज आहे. यासाठी श्रीराम नगरच्या बाजूला एमआयडीसीची जागा शासनाने उपलब्ध करुन दयावी अशी मागणी माजी सभापती अशोक लंजे, हरिष कोहळे, गायत्री इरले यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. (वार्ताहर)