शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सडक-अर्जुनी तालुका एमआयडीसीपासून वंचित

By admin | Updated: January 4, 2017 00:55 IST

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमें कॉर्पोरेशन) असणे बंधनकारक आहे.

सौंदड : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाअंतर्गत प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी (महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमें कॉर्पोरेशन) असणे बंधनकारक आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, देवरी, अर्जुनी-मोरगाव या सर्वच तालुक्यांत एमआयडीसी करिता शासनाने जागा उपलब्ध करुन तेथे काही उद्योगही सुरू आहेत. मात्र सडक-अर्जुनी तालुका मागील २० ते २५ वर्षापासून एमआयडीसीपासून वंचीत आहे. याकडे मात्र शासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. सडक-अर्जुनी तालुक्याची निर्मिती सुमारे २० ते १५ वर्षापुर्वी झाली. मात्र अजूनही या तालुक्याला शासनाने एमआयडीसी करिता जागा उपलब्ध करुन दिलेली नाही. आज तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व रेल्वेमार्ग असूनही या तालुक्याला शासनाकडून वंचित ठेवण्यात आले आहे. तालुक्यात २० वर्षापुर्वी एमआयडीसी उभारली गेली असली तर तालुक्यासह जिल्हा तसेच बाहेरील उद्योजकांनाही या जागेचा फायदा झाला असता. शिवाय यातून तालुक्यातील सुशीक्षीत बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाले असते. मात्र आज या तालुक्यातील बेरोजगार पोटाची खळगी भरण्याकरिता घरदार सोडून बाहेरगावी धाव घेत आहेत. तर कित्येकांना काम मिळत नसल्याने निराश होऊन घरी परतावे लागते. करिता संबंधित अधिकाऱ्यांनी सडक-अर्जुनी तालुक्यामध्ये एमआयडीसी करिता जागा उपलब्ध करुन दयावी व तेथे काही उद्योग सुरू करण्याची गरज आहे. यासाठी श्रीराम नगरच्या बाजूला एमआयडीसीची जागा शासनाने उपलब्ध करुन दयावी अशी मागणी माजी सभापती अशोक लंजे, हरिष कोहळे, गायत्री इरले यांनी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे. (वार्ताहर)