शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पशुपालन व्यवसाय ठप्प होण्याच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 00:14 IST

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी गाई व म्हशी पाळतात. परंतु सध्या चाऱ्याची टंचाई व दुधाचे अत्यल्प भाव यामुळे परिसरातील..

समस्या चाऱ्याची : पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड रावणवाडी : शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी गाई व म्हशी पाळतात. परंतु सध्या चाऱ्याची टंचाई व दुधाचे अत्यल्प भाव यामुळे परिसरातील अनेक गावात पशुपालन व्यवसाय डबघाईस आला आहे. दूध उत्पादनाचा खर्चाच्या तुलनेत दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे पाठ फिरविण्यास सुरूवात केल्याचे चित्र दिसून येत आहे. पशुपालनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या दैनंदिन गरजांचा खर्च भागवितात. मात्र सध्या गाई-म्हशींच्या किंमती ३० ते ६० हजार रूपयांपर्यंत आहेत. दुष्काळ व महागाईच्या संकटाचा फटका या मुक्या जनावरांनाही बसत आहे. पशुखाद्य, वैरण-चारा, जनावरांचे आजार, शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या अनुपस्थितीत खासगी डॉक्टरांकडून उपचार करणे आदी समस्यांमुळे दुग्ध उत्पादक शेतकरी त्रस्त होवून गेले आहेत. या समस्यांमुळे दुग्ध उत्पादनात मोठ्याने घट झाली आहे. हवे तसे दूध नागरिकांना उपलब्ध होत नाही. भेसळ दुधाने दैनंदिन गरजा भागवावे लागत आहे. मागील वर्षाच्या कोरड्या दुष्काळामुळे व यावर्षी विलंबाने आलेल्या मान्सूनमुळे सध्या जनावरांच्या चाऱ्याची समस्या गंभीर रूप धारण करीत आहे. शासनाच्या अनेक योजना आहेत. त्यामधून पशुपालक दुग्ध उत्पादकांना कवडीची मदत मिळत नाही. अनेक योजनांपासून शेतकरी अनभिज्ञच आहेत. अनेक योजनांची त्यांना माहितीच होत नाही. दुधाळ जनावरांसाठी लागणाऱ्या पौष्टीक आहाराचे दर गगणाला भिडले आहेत. त्या तुलनेत दुधाचे दर मात्र फारच कमी आहेत. अशात हा पिढोनपिढ्यांचा व्यवसाय करावा तरी कसा? असा प्रश्न दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. (वार्ताहर)