शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची दुर्दशा

By admin | Updated: December 8, 2014 22:37 IST

तालुक्यातील प्रमुख सात-आठ गावाला जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त झाले आहेत. या मार्गांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. कोणतेही वाहन चालविण्यासाठी चालकाला मोठी कसरत करावी लागते.

आमगाव : तालुक्यातील प्रमुख सात-आठ गावाला जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त झाले आहेत. या मार्गांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. कोणतेही वाहन चालविण्यासाठी चालकाला मोठी कसरत करावी लागते. निधी नाहीच्या नावावर हात वर करून अधिकारी व नेते वेळकाढूपणाचे धोरण अवलंबवित असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. आमगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथे बाहेर गावावरून मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. वेळेवर जे मिळेल त्या साधनाने येऊन काम करून प्रत्येक जन निघून जातात. यात मोठी गैरसोय शाळकरी मुलांची होत आहे. मात्र प्रशासन व स्थानिक नेते मुकबधीर होऊन बसले आहेत. काही गावांना जाणारे मार्ग दहा ते वीस वर्षांपासून दुरूस्ती करणापासून वंचित आहेत. फक्त निधी नाही, नियोजनाअभावी कामे थांबली आहेत, अशी बतावणी करून वेळकाढूपणाचे धोरण सुरू आहे. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद गोंदिया येथे भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मग सतत ५ ते १० वर्षांपासून तालुक्याला रस्ते दुरूस्तीसाठी निधी शासनाकडून का पाप्त झाला नाही? किंवा निधीसाठी पाठपुरावा कधीच का केला गेला नाही किंवा निधी आला तर तालुक्यातील रस्त्यावर अन्याय का झाला, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. नागरिकांना नगरात येताना जो त्रास होतो त्याचा पाठपुरावा अजूनपर्यंत झाला नाही. आमगाव, कुंभारटोली, बिर्सी, जामखारी, तिगाव, कोपीटोला पुढे मांडोबाई, आमगाव, किडंगीपार, शिवणी, चिरचाळबांध, सितेपार, भजेपार, कालीमाटी-सुपलीपार, मोहगाव कार्तुली, कालीमाटी ते मुंडीपार, भोसा, करंजी, आमगाव, शंभुटोला, महारीटोला, सरकारटोला, ननसरीपुढे मुंडीपार अशाप्रकारे जवळपास २५ ते ३० गावांना जाणाऱ्या जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. तालुक्यात जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे निवासस्थान आहे. जिल्हा परिषद सदस्य टुंडीलाल कटरे, योगेश्वरी पटले, उषा हर्षे, संगीता दोनोडे यांच्या जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणारे रस्ते मोठ्या प्रमाणात खड्ड्यांनी भरून गेले आहेत. फक्त जिल्हा परिषदेचे कोणते लाभ आपणाला किंवा आपल्या चेलेचपाट्यांना कसे मिळतील, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहेत. बंधारे, खळीकरण, सिमेंट रस्ते, नाली बांधकाम मिळविण्याकरिता अनेक जि.प. सदस्य व्यस्त असतात. त्यांना त्यांच्या क्षेत्राचे कामे मिळतात. मात्र त्यांच्या क्षेत्रातील रस्त्यांचे डांबरीकरण होण्याकरिता ठोस उपाय अजूनपर्यंत झाले नाही. फक्त नगरातील कामठा चौकात आमगाव, शंभुटोला, ननसरी मार्गांचे डांबरीकरण व्हावे, याकरिता सर्वदलीय उपोषण करण्यात आले. मात्र तेथेसुध्दा काम पूर्णत्वास अजूनपर्यंत गेले नाही. एकंदरीत आज सत्ता संपूर्ण एका पक्षाची आहे. एक हाती सत्ता असल्यामुळे आता तरी तालुक्यातील ज्या प्रमुख गावांना जाणाऱ्या मार्गाची जी दुर्दशा झाली आहे, त्यांचे डांबरीकरण अत्यंत गरजेचे आहे. जवळच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत असल्याने आचार संहितेचा फटका नाकारता येणार नाही. त्यामुळे लवकर डांबरीकरण करणे आवश्यक आहे. (तालुका प्रतिनिधी)