शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

तालुक्यातील नदी-नाले पडले काेरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

राजेश मुनीश्वर सडक अर्जुनी : तालुक्यातील आत्ता सर्वच नदी नाले कोरडे पडले असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील ...

राजेश मुनीश्वर

सडक अर्जुनी : तालुक्यातील आत्ता सर्वच नदी नाले कोरडे पडले असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

तालुक्यातील दल्ली, रेंगेपार, सौंदड, पांढरी, घाटबोरी, डव्वा, कोकणा जमी, कोहमारा, सालेधरणी, पुतडी, जांभळी, कोदामेढी, सडक अर्जुनी, वडेगाव, आदी ठिकाणांवर आलेलले नदी नाले पूर्ण कोरडे पडले आहेत. प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात बंधाऱ्यांना पाट्या लावल्या असत्या तर तालुक्यात भरपूर पाणीसाठा शिल्लक राहिला असता मात्र अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले.

तालुक्यात बांधलेले कोल्हापुरी बंधारे आत्ता निकामी झाले आहेत. वडेगाव, दल्ली, रेंगेपार, कनेरी, केसलवाडा, डव्वा, पांढरी, माउली, राका, येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. या बंधाऱ्यांची डागडुजी केल्यास लाखों लिटर पाणी जलसाठा तालुक्याला उपलब्ध होऊ शकतो. पाणीसाठा उपलब्ध झाल्यास वन्य व पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय हमखास होईल. तसेच शेतीला सिंचनाची सोय होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती करण्यास हातभार लागेल. तालुक्यातील सडक अर्जुनी गावाजवळून वाहणाऱ्या उमरझरी नाल्याला मध्यम प्रकल्पाचे पाणी सोडण्याची नितांत गरज आहे. नदीला पाणी सोडल्याने वन्य व पाळीव प्राण्यांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय होईल. सडक अर्जुनी तालुक्याला लागून नवेगाव-नागझिरा अभयारण्य असल्यामुळे वनातील प्राणी आत्ता गावाच्या दिशेने पाण्याचे शोधात भटकंती करीत आहेत. नदी-नाल्यांना पाण्याची सोय असती, तर प्राणी गावाकडे आले नसते.

सडक अर्जुनी तालुक्यातील कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी लाखों रुपये खर्च करण्यात आले. आलेल्या पावसाचे पाण्याने फुटलेल्या बंधाऱ्याची डागडुजी करण्याची गरज आहे. यासाठी अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची वेळ आली आहे. पण कोणताही अधिकारी या समस्येकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत नसतील तर नाही ना, असाही सवाल होत आहे.

.....

विविध पिकांची लागवड

सडक अर्जुनी तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र ५५४६१.६३ हेक्टर असून, पिकाखाली क्षेत्र २५७८७ हेक्टर आहे. तर सिंचनाखाली एकूण क्षेत्र १२७०१ हेक्टर आर आहे. त्यात धान, उस, केळी, टरबूज, काकडी, भाजीपाला आदी पिके घेतली जातात.

.....

तालुक्यातील बंधाऱ्यात पाणीसाठा राहिला, असता तर हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन विविध नगदी पिके हमखास घेतली जातात त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती उंचावेल. वाहणाऱ्या नाल्यांवर बंधारे बांधण्याची गरज आहे.

- एफ.आर.टी. शहा, किसान आघाडी

सडक अर्जुनी

.....

सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली परीसरात सिंचनाची सोय नाही. कोहमाराजवळून वाहणाऱ्या सशिकरन नाल्यावर बंधारा बांधून उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित केल्यास चिखली परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.

संगीता भरत ब्राह्मणकर, सामजिक कार्यकर्त्या

....