शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

तालुक्यातील नदी-नाले पडले काेरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:30 IST

राजेश मुनीश्वर सडक अर्जुनी : तालुक्यातील आत्ता सर्वच नदी नाले कोरडे पडले असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. तालुक्यातील ...

राजेश मुनीश्वर

सडक अर्जुनी : तालुक्यातील आत्ता सर्वच नदी नाले कोरडे पडले असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

तालुक्यातील दल्ली, रेंगेपार, सौंदड, पांढरी, घाटबोरी, डव्वा, कोकणा जमी, कोहमारा, सालेधरणी, पुतडी, जांभळी, कोदामेढी, सडक अर्जुनी, वडेगाव, आदी ठिकाणांवर आलेलले नदी नाले पूर्ण कोरडे पडले आहेत. प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात बंधाऱ्यांना पाट्या लावल्या असत्या तर तालुक्यात भरपूर पाणीसाठा शिल्लक राहिला असता मात्र अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले.

तालुक्यात बांधलेले कोल्हापुरी बंधारे आत्ता निकामी झाले आहेत. वडेगाव, दल्ली, रेंगेपार, कनेरी, केसलवाडा, डव्वा, पांढरी, माउली, राका, येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. या बंधाऱ्यांची डागडुजी केल्यास लाखों लिटर पाणी जलसाठा तालुक्याला उपलब्ध होऊ शकतो. पाणीसाठा उपलब्ध झाल्यास वन्य व पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय हमखास होईल. तसेच शेतीला सिंचनाची सोय होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती करण्यास हातभार लागेल. तालुक्यातील सडक अर्जुनी गावाजवळून वाहणाऱ्या उमरझरी नाल्याला मध्यम प्रकल्पाचे पाणी सोडण्याची नितांत गरज आहे. नदीला पाणी सोडल्याने वन्य व पाळीव प्राण्यांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय होईल. सडक अर्जुनी तालुक्याला लागून नवेगाव-नागझिरा अभयारण्य असल्यामुळे वनातील प्राणी आत्ता गावाच्या दिशेने पाण्याचे शोधात भटकंती करीत आहेत. नदी-नाल्यांना पाण्याची सोय असती, तर प्राणी गावाकडे आले नसते.

सडक अर्जुनी तालुक्यातील कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी लाखों रुपये खर्च करण्यात आले. आलेल्या पावसाचे पाण्याने फुटलेल्या बंधाऱ्याची डागडुजी करण्याची गरज आहे. यासाठी अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची वेळ आली आहे. पण कोणताही अधिकारी या समस्येकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत नसतील तर नाही ना, असाही सवाल होत आहे.

.....

विविध पिकांची लागवड

सडक अर्जुनी तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र ५५४६१.६३ हेक्टर असून, पिकाखाली क्षेत्र २५७८७ हेक्टर आहे. तर सिंचनाखाली एकूण क्षेत्र १२७०१ हेक्टर आर आहे. त्यात धान, उस, केळी, टरबूज, काकडी, भाजीपाला आदी पिके घेतली जातात.

.....

तालुक्यातील बंधाऱ्यात पाणीसाठा राहिला, असता तर हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन विविध नगदी पिके हमखास घेतली जातात त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती उंचावेल. वाहणाऱ्या नाल्यांवर बंधारे बांधण्याची गरज आहे.

- एफ.आर.टी. शहा, किसान आघाडी

सडक अर्जुनी

.....

सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली परीसरात सिंचनाची सोय नाही. कोहमाराजवळून वाहणाऱ्या सशिकरन नाल्यावर बंधारा बांधून उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित केल्यास चिखली परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.

संगीता भरत ब्राह्मणकर, सामजिक कार्यकर्त्या

....