शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
2
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
3
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
4
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
5
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
6
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
7
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
8
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
9
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली
10
स्थानिक निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी डाव टाकला; भाजपाच्या शत्रूशी केली हातमिळवणी, काय घडलं?
11
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
12
Asia Cup 2025 : 'बॅग'सह 'लक फॅक्टर' घेऊन दुबईला पोहचलाय कोच गंभीर! नेमकी काय आहे ही भानगड?
13
गोराई बीचवर मिनीबस भरतीच्या पाण्यात अडकली; चालकाचे जीवघेणं धाडस, तीन तासांनी...
14
WhatsApp Web Down : लॅपटॉप किंवा माऊस खराब झाला नाही तर WhatsApp Web आहे डाऊन; स्क्रोलिंगला येतोय प्रॉब्लेम
15
"नेपाळसाठी काळा दिवस...", देशातील हिंसक परिस्थिती पाहून मनीषा कोईरालाची भावुक पोस्ट
16
केसगळती, अपचनावर 'रामबाण' उपाय; तुळशीची ३-४ पानं खा, शरीरात होतील चमत्कारिक बदल
17
सोनं १३०० रुपये तर चांदी ३००० रुपयांनी महागली, तुमच्या शहरातील आजचा दर काय?
18
‘ऑफिसात जीव गेला तरी बेहत्तर, पण नोकरी सोडणार नाही’, तरुणाने मांडली EMI मध्ये अडकलेल्या मध्यमवर्गीयाची व्यथा 
19
Uddhav Thackeray: शिवसेनेच्या (यूबीटी) मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाही?
20
Apple iPhone : काय सांगता! प्रत्येक फोनवर अ‍ॅपल एवढा नफा मिळवते, आयफोन बनवण्यासाठी खर्च किती येतो?

माहितीचा अधिकार बनले पोट भरण्याचे साधन

By admin | Updated: June 22, 2015 00:42 IST

शासनाने चांगल्या उद्देशाने माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आणला.

दुरूपयोग : अधिकाऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकारगोंदिया : शासनाने चांगल्या उद्देशाने माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आणला. परंतु काही व्यक्तीव्दारे माहिती अधिकार कायद्याच्या उद्देशाला हरताळ फासून या कायद्याचा दुरूपयोग केला जात आहे. शासनाने उदात्त हेतू बाळगून शासन प्रणालीतील भ्रष्टाचारावर अंकुश बसावे आणि झालेला भ्रष्टाचार उघड व्हावा या हेतूने माहितीचा अधिकार सन २००५ साली अमंलात आणला. शासनाच्या वतीने सामान्य माणसाला शासनाच्या विविध विभागातील चालत आलेला कारभार माहित व्हावा तसेच शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्यावर वर्चस्व निर्माण व्हावे, कारभारात पारदर्शकता व सुसूत्रता यावी हा प्रामाणिक उद्देश बाळगून कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र काही नागरिक तसेच कार्यकर्ते या अधिकाराचा दुरूपयोग करून पैसे कमविण्याचा व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिणामी शासनाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासण्यात येत आहे. माहितीचा अधिकार हा कायद्याचा आधार घेत काही कार्यकर्त्याचे पोटभरण्याचे साधन झाले आहे. विनाकारण अधिकाऱ्यांना नाहक वेठीस धरून वेळप्रसंगी पैशांची मागणी करून माहिती अधिकार कायद्याला गालबोट लावण्याचे काम काही मंडळी करीत असल्याने चांगले काम करणाऱ्यांवरही दडपण येऊन त्यांच्या कार्यशैलीत परिणाम पडत आहे. सर्वसामान्य जनतेला माहिती मिळावी यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अविरत लढा देऊन माहितीचा अधिकार कायदा पास करण्यासाठी शासनाला भाग पाडले. या कायद्यामुळे अनेक सकारात्मक बदल घडून आला. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जनतेत समाधान तर भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली. माहिती अधिकार कायद्याचा उपयोग सार्वजनिक हितासाठी व शुध्द सकारात्मक हेतूने होणे आवश्यक आहे. परंतु सद्य:स्थितीत अनेकांकडून असे होताना दिसून येत नाही. काही कार्यकर्ते वगळले तर बहुतांश जणांकडून या कायद्याच दुरूपयोग होतांना दिसतो. (तालुका प्रतिनिधी)