शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

तांदूळ प्रक्रिया प्रकल्प मार्गी

By admin | Updated: August 25, 2016 00:03 IST

गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या परंतू जागा व निधीअभावी रखडलेला तांदूळ प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

देवरीत तीन एकर जागा उपलब्ध : मशीन खरेदीसाठी ७.५० कोटी मंजूरगोंदिया : गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या परंतू जागा व निधीअभावी रखडलेला तांदूळ प्रक्रिया प्रकल्प मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी ५ एकर जागेची मागणी असताना सध्या ३ एकर जागा देवरी औद्योगिक वसाहतीत उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ७.५० कोटींचा निधीही मंजूर झाल्याचे समजते.या उद्योगामुळे अनेक दिवसांपासून ओस पडलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील देवरी एमआयडीसीत उद्योगाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून भविष्यात आणखी काही उद्योग येण्याची शक्यता आहे. देवरी एमआयडीसीमध्ये या उद्योगासाठी सध्या केवळ ३ एकर जागा मिळाली असली तरी त्या जागेलगत जवळपास ४ एकरची जागा अजून उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोंदिया उद्योग केंद्राचे तत्कालीन जिल्हा महाव्यवस्थापक जी.ओ. भारती यांनी या प्रकल्पासाठी विशेष प्रयत्न केले होते. अजूनही त्यांचे या प्रकल्पाच्या कामावर लक्ष आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर देवरी एमआयडीसी मध्ये इतर प्रकल्प येणे सोयीस्कर होईल, अशी आशा भारती यांनी व्यक्त केली. (जिल्हा प्रतिनिधी)- गोंदियातील तांदूळ विदेशातविशेष म्हणजे हा तांदूळ प्रक्रिया प्रकल्प शेतकऱ्यांच्या सहभागातून चालविला जाणार आहे. त्यासाठी सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव आणि देवरी तालुक्यातील ५० शेतकऱ्यांचा या उद्योगात सहभाग राहणार आहे. या प्रकल्पात दररोज ८ टन तांदळावर प्रक्रिया केली जाणार आहे. याच ठिकाणी तांदळाची पॅकेजिंग केली जाईल. तसेच येथील तांदळात गुणवत्ता जपून तो तांदूळ विदेशात पाठविला जाणार आहे. या प्रक्रिया उद्योगासाठी गेल्यावर्षी शेतकऱ्यांना बंगलोर येथील प्रदर्शन पाहण्यासाठी तसेच म्हैसूर व तंजावर येथील तांदूळ प्रक्रिया उद्योग पाहण्यासाठी पाठविण्यात आले होते. दोन जिल्ह्यांचा कारभार पाहतात दोन अधिकारीउद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीकडे अधिकारीच नाहीत. गोंदिया आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमधील औद्योगिक वसाहतींचा संपूर्ण कारभार नागपूर येथील उद्योग विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातूनच पाहिल्या जातो. केवळ आवंटित केलेल्या प्लॉट्समधील बांधकामावर देखरेख ठेवण्यासाठी आणि उद्योगांना सुरळीतपणे पाणी पुरवठा करण्यासाठी दोन्ही जिल्हे मिळून गोंदियात एकमेव कार्यालय आहे. या कार्यालयातही केवळ एक उपअभियंता आणि एक सहायक अभियंता असे दोन अधिकारी आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील औद्योगिक विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.