शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियात लवकरच राईस पार्क; देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 11:36 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत होईल यादृष्टीने लवकरच राईस पार्कला मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात केली.

ठळक मुद्देवर्ग २ च्या जमिन वर्ग करण्यासाठी अर्जाची गरज नाही

संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात राईस क्लस्टरला मान्यता मिळाल्याने आता गोंदिया जिल्ह्यात संशोधनात्मक काम होऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत होईल आणि यादृष्टीने लवकरच राईस पार्कला मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात केली. अर्जुनी मोरगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर भूमि स्वामी ऐवजी भूमिधारी अशा नोंदी आहेत. वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी यापुढे कुठल्याही शेतकऱ्याला अर्ज करावा लागणार नाही.असा निर्णय शासनाने घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांवर रोजच एक संकट येते, कधी गारपिटीचे तर कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो. यात मोठे नुकसान होते. ही परिस्थिती केवळ वातावरणाच्या बदलामुळे उद्भवते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... हे आम्हाला संतानी सांगितले होते. वृक्ष, जलस्त्रोत व तलावांचे नुकसान केले तर निसर्ग हा कोपणारच. गोंदिया जिल्ह्यात रोवणी झाली नाहीत. जिथे धानाची लागवड व रोवणी झाली तिथे तुडतुड्याने ग्रासले. नुकतीच गारपीट झाली. प्रत्येक शेतकऱ्याला शासनाने मदत देण्याचे ठरविले तरी देखील शेतकरी समृध्द होऊ शकत नाही. त्यांना समृध्द करायचे असेल तर शेती शाश्वत करावी लागेल. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. गोंदिया जिल्ह्यात जवळ-जवळ ४२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहचत आहेत. शेतीत शाश्वतत्ता नसल्यामुळेच आमच्यावर कर्जमाफीची वेळ येते. निसर्गाची साधर्म्य राखाल तर आमचेवर ही वेळ येणार नाही. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख आहे. अनेक संकट येतात तरी येथील एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. तो संकटाचा सामना करतो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे काम राज्य शासनाच्या वतीने करीत असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांसाठी मजुरांनी दिले १ लाख रुपयेदुष्काळामुळे जिल्ह्यात एक लाख मजूर रोहयोच्या कामावर आहेत. पण येथील मजूरांची श्रीमंती बघा, त्यांनी मजुरीतून प्रत्येकी एक रुपया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचे पत्र मला दिले. खरोखरच ही गौरवाची बाब असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मजुरांचे कौतुक केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा गौरवमहाराष्ट्रात अमूल्य कार्य केल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला. तो पुरस्कार तुकडोजी महाराजांचे सचिव जनार्धन बोथे यांनी स्वीकारला.वारकरी संप्रदायच्या विशेष सेवेसाठी संत गाडगे महाराज मिशन नागरवाडी (जि.अमरावती) यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रात व राज्याबाहेर वारकरी संप्रदायचा प्रसार व प्रचाराचे कार्य करणारे हभप बाबा महाराज राशनकर पंढरपूर यांना प्रदान करण्यात आला. तर राज्यात संप्रदायाचा प्रसार व प्रचाराचे विशेष कार्य केल्याबद्दल भक्त पुंडलिक फडचे प्रमुख हभप माधव महाराज शिवणीकर यांना गाडी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस