शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

गोंदियात लवकरच राईस पार्क; देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 11:36 IST

गोंदिया-भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत होईल यादृष्टीने लवकरच राईस पार्कला मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात केली.

ठळक मुद्देवर्ग २ च्या जमिन वर्ग करण्यासाठी अर्जाची गरज नाही

संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात राईस क्लस्टरला मान्यता मिळाल्याने आता गोंदिया जिल्ह्यात संशोधनात्मक काम होऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत होईल आणि यादृष्टीने लवकरच राईस पार्कला मान्यता देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे आयोजित कार्यक्रमात केली. अर्जुनी मोरगाव येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर भूमि स्वामी ऐवजी भूमिधारी अशा नोंदी आहेत. वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी यापुढे कुठल्याही शेतकऱ्याला अर्ज करावा लागणार नाही.असा निर्णय शासनाने घेतला असून जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांवर रोजच एक संकट येते, कधी गारपिटीचे तर कधी दुष्काळाचा सामना करावा लागतो. यात मोठे नुकसान होते. ही परिस्थिती केवळ वातावरणाच्या बदलामुळे उद्भवते. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... हे आम्हाला संतानी सांगितले होते. वृक्ष, जलस्त्रोत व तलावांचे नुकसान केले तर निसर्ग हा कोपणारच. गोंदिया जिल्ह्यात रोवणी झाली नाहीत. जिथे धानाची लागवड व रोवणी झाली तिथे तुडतुड्याने ग्रासले. नुकतीच गारपीट झाली. प्रत्येक शेतकऱ्याला शासनाने मदत देण्याचे ठरविले तरी देखील शेतकरी समृध्द होऊ शकत नाही. त्यांना समृध्द करायचे असेल तर शेती शाश्वत करावी लागेल. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. गोंदिया जिल्ह्यात जवळ-जवळ ४२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहचत आहेत. शेतीत शाश्वतत्ता नसल्यामुळेच आमच्यावर कर्जमाफीची वेळ येते. निसर्गाची साधर्म्य राखाल तर आमचेवर ही वेळ येणार नाही. जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख आहे. अनेक संकट येतात तरी येथील एकही शेतकरी आत्महत्या करत नाही. तो संकटाचा सामना करतो ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अशा शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे काम राज्य शासनाच्या वतीने करीत असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांसाठी मजुरांनी दिले १ लाख रुपयेदुष्काळामुळे जिल्ह्यात एक लाख मजूर रोहयोच्या कामावर आहेत. पण येथील मजूरांची श्रीमंती बघा, त्यांनी मजुरीतून प्रत्येकी एक रुपया शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचे पत्र मला दिले. खरोखरच ही गौरवाची बाब असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मजुरांचे कौतुक केले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्याचा गौरवमहाराष्ट्रात अमूल्य कार्य केल्याबद्दल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मोझरी यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला. तो पुरस्कार तुकडोजी महाराजांचे सचिव जनार्धन बोथे यांनी स्वीकारला.वारकरी संप्रदायच्या विशेष सेवेसाठी संत गाडगे महाराज मिशन नागरवाडी (जि.अमरावती) यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्रात व राज्याबाहेर वारकरी संप्रदायचा प्रसार व प्रचाराचे कार्य करणारे हभप बाबा महाराज राशनकर पंढरपूर यांना प्रदान करण्यात आला. तर राज्यात संप्रदायाचा प्रसार व प्रचाराचे विशेष कार्य केल्याबद्दल भक्त पुंडलिक फडचे प्रमुख हभप माधव महाराज शिवणीकर यांना गाडी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस