शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

तांदूळ उद्योग होरपळतोय

By admin | Updated: May 22, 2015 01:59 IST

मागील सात वर्षांपासून विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे योग्य दर मिळत नाही.

गोंदिया : मागील सात वर्षांपासून विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे योग्य दर मिळत नाही. यामागे शासकीय समर्थन दरावर शासनाद्वारे खरेदी धानाची मिलिंग न होणे, हे कारण आहे. त्यामुळे राज्य शासनाला दरवर्षी २० कोटी रूपयांचे नुकसान सहन करावे लागते. या वर्षांत जवळपास २०० कोटी रूपयांचे धान सडले, त्याला लिलावाद्वारे ३५ कोटी रूपयांत विक्री करण्यात आले. त्यामुळे शासनाने तांदूळ उद्योगाला चालना द्यावी, अशी मागणी गोंदियाच्या राईस मिलर्स असोसिएशनने केला आहे.मिलिंग न होणे झाल्यावरही अत्यंत कमी दर व कमी परिवहन दरामुळे राईस मिलर्सचे मोठेच नुकसान होत होते. मागील शासनाने कधीकधी मिलिंग दरात वाढ केली होती, परंतु ते अपयशी ठरले. भारतीय जनता पक्ष सत्तेत नसताना भाजप नेत्यांनी मागील सात वर्षांत राज्य शासन व प्रसार माध्यमांचे या प्रकाराकडे लक्ष वेधले होते. सन २०१४-१५ मध्ये भाजपचे शासन आले. ज्या नेत्यांनी हे विषय विपक्षात राहून उचलून धरले होते, तेच आता सत्तेत आहेत. त्यामुळे राईस मिलर्स असोसिएशनने आपल्या मागण्या त्यांच्याकडे पाठविल्या आहेत. राईस मिलर्स असोसिएशनच्या प्रसिद्धीपत्रानुसार, नवीन शासनाने तत्काल अन्न व नागरी पुरवठा विभागात सतत राईस मिलर्स, सेवा सहकारी संस्था, शासकीय एजंसी व फूड कार्पोरेशनसह बैठका घेवून शेतकरी व उद्योगाच्या हितात कार्य केले. धान मिलिंग दर ४० रूपये प्रतिक्विंटल केले, शेतकऱ्यांना २५० रूपये प्रतिक्विंटल बोनस घोषित केले व धान खरेदी सुरू ठेवली, धान मिलिंग कामाचे परिवहन दर जिल्हाधिकाऱ्यांद्वारे निविदेद्वारे प्राप्त दरांना मान्यतेसाठी प्रस्तावित केले. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्याला नुकसान होणार नसून शेतकीर व उद्योग-मजूर लाभान्वित होतील. मिलिंग व परिवहन दर सात वर्षांपासून विवादास्पद आहेत. उच्च न्यायालयात दावा दाखल आहे. मागील अनेक दिवसांपासून या विषयांवर अशा प्रकारच्या निराधार चर्चा केली जात आहेत. परंतु राईस मिलर्सकडील तांदूळ मागील १६ वर्षांपूर्वीचे आहे. ते सदर तांदूळ द्यायला तयार आहेत, परंतु फूड कोर्पोरेशनच्या असहयोगामुळेच सदर तांदूळ बाकी आहेत. (प्रतिनिधी)राईस मिसर्लकडे २.७५ लाख क्विंटल तांदूळ बाकीचराज्य शासनाने धान व तांदळाला डी-सेंट्रलाईझ प्रोक्युरमेंट (डीसीपी) केले. त्यामुळे छत्तीसगड राज्याप्रमाणे येणाऱ्या सीझनमध्ये राज्य शासन स्वत: धान व तांदळाची खरेदी करेल. त्यात एफसीआयची गरज भासणार नाही. हे शेतकरी व उद्योगाच्या हिताचे ठरेल. राज्यात एफसीआयद्वारे राज्य शासनाला तांदूळ गुण नियंत्रक न दिल्यामुळे मागील वर्षी जवळपास २.७५ लाख क्विंटल तांदूळ (४८.१५ कोटींचे) राईस मिलर्सच्या जवळच असून स्वीकृत होवू शकले नाही. डीसीपी प्रक्रियेमुळे सदर तांदूळ निश्चितच राज्य शासन स्वीकृत करेल, अशी आशा असोसिएशनला आहे.