शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धानाचे उत्पादन नसलेल्या जिल्ह्यातून येतोय तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST

अंकुश गुंडावार गोंदिया : धानाचे उत्पादन नसलेल्या जिल्ह्यांतून धानाची भरडाई होऊन तांदूळ थेट गोंदिया जिल्ह्यात येत आहे. वाचायला जरी ...

अंकुश गुंडावार

गोंदिया : धानाचे उत्पादन नसलेल्या जिल्ह्यांतून धानाची भरडाई होऊन तांदूळ थेट गोंदिया जिल्ह्यात येत आहे. वाचायला जरी हे नव्वल वाटले तरी हे शक्य आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध याेजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना वाटप केलेे जाणारे धान्य काही लाभार्थी विक्रेत्यांना विक्री करीत आहे. तर हा तांदूळ हे विक्रेत मोठ्या विक्रेत्यांना विक्री करीत असून ते या तांदळाची राईस मिलर्सला विक्री करीत असल्याची बाब पुढे आली. त्यामुळेच मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरील जिल्ह्यातील रेशनचा तांदूळ येत आहे. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही.

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांत सर्वाधिक धानाची लागवड केली जात आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. खरेदी केलेला धान राईस मिलर्ससह करार करून भरडाई केला जातो. त्यानंतर सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. त्यानंतर अन्न व पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार राज्यातील विविध स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत गोंदिया जिल्ह्यातून लातूर, परभणी, नाशिक, औरंगाबाद, नंदुरबार, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तांदूळ पाठविला जात आहे. ज्या जिल्ह्यात तांदूळ पाठविला जात आहे त्या जिल्ह्यातील एका गुणवत्ता नियंत्रकांना गोंदिया येथे पाठविले जाते. ते आपल्या जिल्ह्यात जाणारा तांदूळ चांगला आहे किंवा नाही याची तपासणी करतात. त्यानंतर गुदामातून हा तांदूळ रवाना केला जातो. ही सर्व प्रक्रिया अशी चालते. एवढी पारदर्शक प्रक्रिया सुरू असताना रेशनच्या तांदळाचे रिसायकलिंग कसे होते, हा संशोधनाचा विषय आहे.

......

असा उघडकीस आला प्रकार

धानाचे उत्पादन नसलेल्या वाशिम जिल्ह्यातून एक ट्रक तांदूळ दोन दिवसांपूर्वी सौंदड येथे दाखल झाला. त्या ट्रकचालकाला विचारणा केली असता वाशिम जिल्ह्यातून तांदूळ भरून आणल्याचे सांगितले. त्यामुळे आश्चर्य वाटले. गोंदिया जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात तांदूळ जात असताना वाशिम जिल्ह्यातून तांदूळ कसा येत आहे याची माहिती काढली तर हे रेशनचे तांदूळ असून हे तांदूळ काही राईस मिलर्स खरेदी करीत असल्याची बाब पुढे आली. १४ रुपये प्रतिकिलो दराने हा तांदूळ खरेदी केला जात असून, या तांदळाचे रिसायकलिंग करून तो नवीन कट्ट्यात भरून शासनाकडे जमा केला जात असल्याची माहिती आहे.

................

भरडाई केलेला तांदूळ जातो कुठे?

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलल्या धानाची राईस मिलर्ससह करार करून भरडाई करून तांदूळ जमा केला जातो. मात्र खरेदी केंद्रावरून ज्या धानाची उचल केली तोच धान भरडाई करून परत केला जातो का, याची पडताळणी होण्याची गरज आहे. तसे केल्यास बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. शिवाय केंद्रावरून उचल केलेला धान उष्णा राईस तयार करून बाहेर देशात पाठविला जात असल्याची माहिती आहे.

...........

कोट

बाहेरील जिल्ह्यांतून गोंदिया जिल्ह्यात रेशनचा तांदूळ येत असेल तर ही गंभीर बाब आहे. याची माहिती किवा तक्रार दिल्यास निश्चित कारवाई केली जाईल.

- डी. एस. वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया