शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

धानाचे उत्पादन नसलेल्या जिल्ह्यातून येतोय तांदूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST

अंकुश गुंडावार गोंदिया : धानाचे उत्पादन नसलेल्या जिल्ह्यांतून धानाची भरडाई होऊन तांदूळ थेट गोंदिया जिल्ह्यात येत आहे. वाचायला जरी ...

अंकुश गुंडावार

गोंदिया : धानाचे उत्पादन नसलेल्या जिल्ह्यांतून धानाची भरडाई होऊन तांदूळ थेट गोंदिया जिल्ह्यात येत आहे. वाचायला जरी हे नव्वल वाटले तरी हे शक्य आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध याेजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना वाटप केलेे जाणारे धान्य काही लाभार्थी विक्रेत्यांना विक्री करीत आहे. तर हा तांदूळ हे विक्रेत मोठ्या विक्रेत्यांना विक्री करीत असून ते या तांदळाची राईस मिलर्सला विक्री करीत असल्याची बाब पुढे आली. त्यामुळेच मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरील जिल्ह्यातील रेशनचा तांदूळ येत आहे. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही.

पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांत सर्वाधिक धानाची लागवड केली जात आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. खरेदी केलेला धान राईस मिलर्ससह करार करून भरडाई केला जातो. त्यानंतर सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. त्यानंतर अन्न व पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार राज्यातील विविध स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत गोंदिया जिल्ह्यातून लातूर, परभणी, नाशिक, औरंगाबाद, नंदुरबार, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तांदूळ पाठविला जात आहे. ज्या जिल्ह्यात तांदूळ पाठविला जात आहे त्या जिल्ह्यातील एका गुणवत्ता नियंत्रकांना गोंदिया येथे पाठविले जाते. ते आपल्या जिल्ह्यात जाणारा तांदूळ चांगला आहे किंवा नाही याची तपासणी करतात. त्यानंतर गुदामातून हा तांदूळ रवाना केला जातो. ही सर्व प्रक्रिया अशी चालते. एवढी पारदर्शक प्रक्रिया सुरू असताना रेशनच्या तांदळाचे रिसायकलिंग कसे होते, हा संशोधनाचा विषय आहे.

......

असा उघडकीस आला प्रकार

धानाचे उत्पादन नसलेल्या वाशिम जिल्ह्यातून एक ट्रक तांदूळ दोन दिवसांपूर्वी सौंदड येथे दाखल झाला. त्या ट्रकचालकाला विचारणा केली असता वाशिम जिल्ह्यातून तांदूळ भरून आणल्याचे सांगितले. त्यामुळे आश्चर्य वाटले. गोंदिया जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात तांदूळ जात असताना वाशिम जिल्ह्यातून तांदूळ कसा येत आहे याची माहिती काढली तर हे रेशनचे तांदूळ असून हे तांदूळ काही राईस मिलर्स खरेदी करीत असल्याची बाब पुढे आली. १४ रुपये प्रतिकिलो दराने हा तांदूळ खरेदी केला जात असून, या तांदळाचे रिसायकलिंग करून तो नवीन कट्ट्यात भरून शासनाकडे जमा केला जात असल्याची माहिती आहे.

................

भरडाई केलेला तांदूळ जातो कुठे?

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलल्या धानाची राईस मिलर्ससह करार करून भरडाई करून तांदूळ जमा केला जातो. मात्र खरेदी केंद्रावरून ज्या धानाची उचल केली तोच धान भरडाई करून परत केला जातो का, याची पडताळणी होण्याची गरज आहे. तसे केल्यास बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. शिवाय केंद्रावरून उचल केलेला धान उष्णा राईस तयार करून बाहेर देशात पाठविला जात असल्याची माहिती आहे.

...........

कोट

बाहेरील जिल्ह्यांतून गोंदिया जिल्ह्यात रेशनचा तांदूळ येत असेल तर ही गंभीर बाब आहे. याची माहिती किवा तक्रार दिल्यास निश्चित कारवाई केली जाईल.

- डी. एस. वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया