शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

जिल्हा परिषद शाळांमध्ये येणार क्रांती

By admin | Updated: February 16, 2017 00:50 IST

जिल्हा परिषद शाळासुद्धा आता खासगी संस्थांच्या शाळांशी टक्कर देण्याच्या तयारीत आहेत.

सी.एल. पुलकुंडवार : व्यवस्थापन समितीच्या १० हजार सदस्यांना पाठविले पत्र गोंदिया : जिल्हा परिषद शाळासुद्धा आता खासगी संस्थांच्या शाळांशी टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक क्रांती घडविण्याचे प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात डिजिटल स्कूल, अध्ययन कुटी व प्रगतीशील अभियानानंतर आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवारद्वारे जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापन समितीच्या १० हजार सदस्यांना पत्र पाठविण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार यांच्यानुसार, गावातील मुलांची शंभर टक्के नोंदणी, शंभर टक्के उपस्थिती, शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांना टिकवून ठेवणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, शाळा निर्माण व दुरूस्तीदेखभाल करणे, शिक्षकांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे आदी महत्वपूर्ण कामांची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीद्वारे सांभाळली जात आहे. जिल्हा परिषद शिक्षकांद्वारे विविध नवीन उपक्रम आयोजित केले जात आहेत. यापैकीच एक म्हणजे लोकसहभागातून शाळा डिजिटल अभियान सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अधिकतर शाळा फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत डिजिटल होत आहेत. अनेक शिक्षकांद्वारे व्ययक्तीक स्तरावर, विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबत आवड निर्माण करण्यासाठी नवीन उपक्रम राबविले जात आहेत. डॉ. पुलकुंडवार यांच्यानुसार, जिल्ह्यातील शाळांच्या निरीक्षणप्रसंगी अनेक शाळांतील विद्यार्थी योग्यरित्या पाठ्यपुस्तके वाचू शकत नाही, ही बाब समोर आली. विद्यार्थी ज्या वर्गात शिकतात, त्या वर्गाच्या पुस्तके त्यांना योग्यरिता वाचता येणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना बेरीज-वजाबाकी यायला हवी. लहान बालकांमध्ये जर भाषा विषयाचे आकलन करण्यात आले नाही तर इतर सर्व विषयांचे आकलन करण्यात समस्या होवू शकते, सर्व विद्यार्थी शैक्षणिक दृष्टीने सक्षम होण्यात बाधा येवू शकते. आपल्या बालकांना चांगले शिक्षण देवून त्यांना सक्षम बनविणे, मुलगा आपल्या पायांवर उभा राहून आपल्या कुटुंबाचा आधार बनावा, अशी सर्व आई-वडिलांची अपेक्षा असते. परंतु बालकांच्या शैक्षणिक विकासाविना कोणत्याही प्रकारच्या भौतिक विकासाचे महत्व नाही. यासाठी आई-वडिलांनी आपल्या बालकांच्या अभ्यासाप्रती जागृत राहणे गरजेचे आहे, असे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पुलकुंडवार म्हणाले. (प्रतिनिधी)