शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

जोरदार पावसाच्या आगमनाने वरथेंबी पिकांना नवजीवन

By admin | Updated: September 19, 2015 03:03 IST

दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना अनेक दिवसांनी दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले.

शेतकऱ्यांची आशा बळावली : हातून जाणारे पीक काही प्रमाणात मिळणारआमगाव : दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना अनेक दिवसांनी दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांच्या वरथेंबी जमिनीत हलक्या धानाची स्थिती गंभीर होती. बुधवारी झालेल्या पाऊस वरथेंबी जमिनीसाठी वरदान ठरले आहे. त्यामुळे हातातून जात असलेल्या उत्पन्नाची आशा शेतकऱ्यांना लागली आहे.पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण तालुक्यात वरथेंबी शेतजमिनीतील धान पीक धोक्यात आले होते. पाणी नसल्याने धानाला वाचविणार कसे? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. जे होते ते शेतात लावून पाण्याची आस शेतकऱ्यांना होती. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या होत्या. त्यातच हलक्या धानाची रोपे वाळण्यास सुरूवात झाली होती. वाळलेल्या रोपट्यांना वाचविण्याकरिता शेतकऱ्यांनी आटापिटा सुरू केला होता. लांब अंतरावरून पाईपद्वारे धानपिकांना पाणी देण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र हव्या त्या प्रमाणात पाणी मिळत नव्हते.कडक उन्हामुळे शेतकरी हैरान झाले होते. मात्र १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी आलेल्या पावसामुळे वरथेंबी पिकांना जीवनदान मिळाले. हातातून निघून जात असलेले धानाचे पीक काही प्रमाणात शेतकऱ्यांना मिळणार, अशी आशा आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ते तडी-बोडी मागील पंधरा दिवसांपूर्वी खाली होते, ते काही प्रमाणात भरल्याने आता वरथेंबी शेतीत उभे असलेल्या हलक्या धानांना आता जीवदान मिळणार, अशी परिस्थिती पावसाच्या आगमनाने निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)