शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

जोरदार पावसाच्या आगमनाने वरथेंबी पिकांना नवजीवन

By admin | Updated: September 19, 2015 03:03 IST

दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना अनेक दिवसांनी दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले.

शेतकऱ्यांची आशा बळावली : हातून जाणारे पीक काही प्रमाणात मिळणारआमगाव : दुष्काळी परिस्थितीचे सावट असताना अनेक दिवसांनी दडी मारलेल्या पावसाचे आगमन झाले. शेतकऱ्यांच्या वरथेंबी जमिनीत हलक्या धानाची स्थिती गंभीर होती. बुधवारी झालेल्या पाऊस वरथेंबी जमिनीसाठी वरदान ठरले आहे. त्यामुळे हातातून जात असलेल्या उत्पन्नाची आशा शेतकऱ्यांना लागली आहे.पावसाने दडी मारल्यामुळे संपूर्ण तालुक्यात वरथेंबी शेतजमिनीतील धान पीक धोक्यात आले होते. पाणी नसल्याने धानाला वाचविणार कसे? हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. जे होते ते शेतात लावून पाण्याची आस शेतकऱ्यांना होती. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या होत्या. त्यातच हलक्या धानाची रोपे वाळण्यास सुरूवात झाली होती. वाळलेल्या रोपट्यांना वाचविण्याकरिता शेतकऱ्यांनी आटापिटा सुरू केला होता. लांब अंतरावरून पाईपद्वारे धानपिकांना पाणी देण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र हव्या त्या प्रमाणात पाणी मिळत नव्हते.कडक उन्हामुळे शेतकरी हैरान झाले होते. मात्र १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी आलेल्या पावसामुळे वरथेंबी पिकांना जीवनदान मिळाले. हातातून निघून जात असलेले धानाचे पीक काही प्रमाणात शेतकऱ्यांना मिळणार, अशी आशा आता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. ते तडी-बोडी मागील पंधरा दिवसांपूर्वी खाली होते, ते काही प्रमाणात भरल्याने आता वरथेंबी शेतीत उभे असलेल्या हलक्या धानांना आता जीवदान मिळणार, अशी परिस्थिती पावसाच्या आगमनाने निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)